शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

बिहारमध्ये घड्याळाचा गजर वाजलाच नाही, राष्ट्रवादीला नोटापेक्षा कमी मतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 15:57 IST

बिहार निवडणुकांत सद्यपरिस्थितीनुसार (दुपारी 3.00 वाजता) निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकड्यांनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागत आहे.

पाटणा : बिहार विधानसभा निवडणूक निकालाची मतमोजणी सुरू झाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून राज्यात सत्तापरिवर्तनाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आज मतमोजणीचे कल समोर येऊ लागल्यापासून या सुरुवातीच्या कलांमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने आघाडी घेतली आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये एनडीए 130 तर महाआघाडी 102 जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीला बिहार निवडणुकांत नोटापेक्षाही कमी मतदान झाले आहे.  बिहार निवडणुकांत सद्यपरिस्थितीनुसार (दुपारी 3.00 वाजता) निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकड्यांनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागत आहे. कारण, शिवसेना आणि राष्ट्रवादीला अद्याप एकाही जागेवर आघाडी घेत आली नाही. शिवसेनेनं उभा केलेल्या 23 पैकी 21 जागांवर तर शिवसेनेच्या वाट्याला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. शिवसेनेने 50 उमेदवार देण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात 23 जागांवरच निवडणूक लढवली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनंही स्वतंत्रपणे बिहार निवडणुका लढवल्या होत्या. विशेष म्हणजे राष्ट्रवादीकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये, शरद पवार हे राष्ट्रवादीचे प्रमुख स्टार प्रचारक होते. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे त्यांनी बिहारमध्ये प्रचारसभा घेतल्या नसल्याचं सांगण्यात येतं.  

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकडेवाडीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसला 0.22 टक्के मतं मिळाली आहेत. तर, शिवसेनेला 0.05 टक्के मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांच्या मतांपैकी नोटाला पडलेली मतं अधिक आहेत. विधानसभा निवडणुकीत 1.74 टक्के नागरिकांनी नोटाला पसंती दिली आहे. नोटाला एकूण 3 लाख 18 हजार 34 मते मिळाली आहेत. तर एमआयएमला 1.08 टक्के मते मिळाली असून त्यांचे तीन उमेदवार आघाडीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दर्शविणाऱ्या आघाडी आणि पिछाडीच्या आकडेवारीत राष्ट्रवादीचा एकही उमेदवार दिसून येत नाही. यावरुन राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर वाजलाच नाही, असे म्हणता येईल. 

2015 मध्ये शिवसेनेनं लढवल्या 80 जागा

सन 2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 243 जागांपैकी 80 जागा लढवल्या होत्या. त्यात शिवसेनेचा एकही उमेदवार निवडणूक आला नाही. मात्र, शिवसेनेला एकूण 2 लाख 11 हजार 131 मते मिळाली होती. त्यात हयाघाट, बोचहा, दिनारा जमालपूर, कुम्हरार, पटनासाहिब आणि मोरवा या सात विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. विशेष म्हणजे एकूण 35 जागांवर शिवसेनेला भाजपपेक्षाही अधिक मते मिळाली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेलाही ‘नोटा’पेक्षाही अधिक मतदान झालं नाही. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकSharad Pawarशरद पवार