शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

बिहार निवडणूक : निकालापूर्वीच काँग्रेसला धास्ती, आमदार फुटण्याची भीती; 'हे' दोन बडे नेते पाटण्यात

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 09, 2020 9:57 AM

एक्झिटपोलनंतर सक्रीय झालेल्या काँग्रेसने मतमोजणीनंतर आमदारांना एकत्रित ठेवण्यासाठी दोन वरिष्ठ नेत्यांना पाटना येथे पाठवले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नेत्यांना खास जबाबदारी सोपवली आहे.

ठळक मुद्देबिहारमध्ये 243 विधानसभा जागांसाठी मतदान प्रक्रियी पार पडली. उद्या म्हणजेच 10 नोव्हेंबरला निवडणूक निकाल येणार आहेत.एक्झिट पोलच्या निकालामुळे आनंदात असूनही काँग्रेसची झोप उडाली असल्याचे दिसत आहे. काँग्रेसला आता आमदार फुटण्याची भीती वाटू लागली आहे.

पाटणा :बिहारमध्ये 243 विधानसभा जागांसाठी मतदान प्रक्रियी पार पडली. उद्या म्हणजेच 10 नोव्हेंबरला निवडणूक निकाल येणार आहेत. मतदानानंतर आलेल्या एक्झिटपोलमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांना टाटा-बाय-बाय होणार आणि राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) नेतृत्वाखालील सरकार येणार, असे संकेत मिळत आहेत. मात्र, या एक्झिट पोलच्या निकालामुळे आनंदात असूनही काँग्रेसची झोप उडाली असल्याचे दिसत आहे. त्यांना आता आमदार फुटण्याची भीती वाटू लागली आहे.

एक्झिटपोलनंतर सक्रीय झालेल्या काँग्रेसने मतमोजणीनंतर आमदारांना एकत्रित ठेवण्यासाठी दोन वरिष्ठ नेत्यांना पाटना येथे पाठवले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाचे महासचिव अविनाश पांडेय आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांना पाटणा येथे पाठवून, निवडणूक निकालानंतरच्या परिस्थितीचे व्यवस करण्याची जबाबदारी दिली आहे.

एक्झिट पोलनुसार, बिहार निवडणुकीत काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे. अशात घोडेबाजारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या दोन्ही नेत्यांना पाटणा येथे पाठवण्यात आले आहे. हे दोन्ही नेते बिहारमध्ये राहतील. तसेच आघाडीतील सहकाऱ्यांसोबत समन्वय ठेवण्याचे काम करतील. महा आघाडीमध्ये आरजेडीसोबत काँग्रेस आणि डावा पक्षही सहभागी आहे. तर एनडीएमध्ये जेडीयू, भारतीय जनता पक्ष (भाजप), जीतनराम मांझींचा पक्ष, मुकेश सहनी यांचा (व्हीआयपी) देखील सहभागी आहे. ही लढाई काट्याची झाली आणि आणि एनडीए बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 122 या जादूई आकड्याच्या जवळपास पोहोचला तर घोडेबाजार होऊ शकतो. यामुळे कमी जागां जिंकणारा पक्ष अधिक दुर्बल होईल. 

यामुळे काँग्रेस आधीच सतर्क झाली आहे. तसेच काँग्रेसने आपल्या सर्व उमेदवारांना, विजयानंतर विजयी मिरवणुका न काढता प्रमाणपत्र घेऊन सरळ पाटण्याला यावे, असे सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या सर्व आमदारांना पाटण्याच्या एखाद्या हॉटेलमध्ये ठेवण्याची काँग्रेसची योजना आहे. आलेल्या एक्झिटपोलनुसार, निकाल आले, तर राज्यात महा आघाडी सरकार येणे निश्चित आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीBiharबिहार