शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बिहार निवडणूक : निकालापूर्वीच काँग्रेसला धास्ती, आमदार फुटण्याची भीती; 'हे' दोन बडे नेते पाटण्यात

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 9, 2020 10:01 IST

एक्झिटपोलनंतर सक्रीय झालेल्या काँग्रेसने मतमोजणीनंतर आमदारांना एकत्रित ठेवण्यासाठी दोन वरिष्ठ नेत्यांना पाटना येथे पाठवले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नेत्यांना खास जबाबदारी सोपवली आहे.

ठळक मुद्देबिहारमध्ये 243 विधानसभा जागांसाठी मतदान प्रक्रियी पार पडली. उद्या म्हणजेच 10 नोव्हेंबरला निवडणूक निकाल येणार आहेत.एक्झिट पोलच्या निकालामुळे आनंदात असूनही काँग्रेसची झोप उडाली असल्याचे दिसत आहे. काँग्रेसला आता आमदार फुटण्याची भीती वाटू लागली आहे.

पाटणा :बिहारमध्ये 243 विधानसभा जागांसाठी मतदान प्रक्रियी पार पडली. उद्या म्हणजेच 10 नोव्हेंबरला निवडणूक निकाल येणार आहेत. मतदानानंतर आलेल्या एक्झिटपोलमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांना टाटा-बाय-बाय होणार आणि राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) नेतृत्वाखालील सरकार येणार, असे संकेत मिळत आहेत. मात्र, या एक्झिट पोलच्या निकालामुळे आनंदात असूनही काँग्रेसची झोप उडाली असल्याचे दिसत आहे. त्यांना आता आमदार फुटण्याची भीती वाटू लागली आहे.

एक्झिटपोलनंतर सक्रीय झालेल्या काँग्रेसने मतमोजणीनंतर आमदारांना एकत्रित ठेवण्यासाठी दोन वरिष्ठ नेत्यांना पाटना येथे पाठवले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाचे महासचिव अविनाश पांडेय आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांना पाटणा येथे पाठवून, निवडणूक निकालानंतरच्या परिस्थितीचे व्यवस करण्याची जबाबदारी दिली आहे.

एक्झिट पोलनुसार, बिहार निवडणुकीत काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे. अशात घोडेबाजारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या दोन्ही नेत्यांना पाटणा येथे पाठवण्यात आले आहे. हे दोन्ही नेते बिहारमध्ये राहतील. तसेच आघाडीतील सहकाऱ्यांसोबत समन्वय ठेवण्याचे काम करतील. महा आघाडीमध्ये आरजेडीसोबत काँग्रेस आणि डावा पक्षही सहभागी आहे. तर एनडीएमध्ये जेडीयू, भारतीय जनता पक्ष (भाजप), जीतनराम मांझींचा पक्ष, मुकेश सहनी यांचा (व्हीआयपी) देखील सहभागी आहे. ही लढाई काट्याची झाली आणि आणि एनडीए बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 122 या जादूई आकड्याच्या जवळपास पोहोचला तर घोडेबाजार होऊ शकतो. यामुळे कमी जागां जिंकणारा पक्ष अधिक दुर्बल होईल. 

यामुळे काँग्रेस आधीच सतर्क झाली आहे. तसेच काँग्रेसने आपल्या सर्व उमेदवारांना, विजयानंतर विजयी मिरवणुका न काढता प्रमाणपत्र घेऊन सरळ पाटण्याला यावे, असे सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या सर्व आमदारांना पाटण्याच्या एखाद्या हॉटेलमध्ये ठेवण्याची काँग्रेसची योजना आहे. आलेल्या एक्झिटपोलनुसार, निकाल आले, तर राज्यात महा आघाडी सरकार येणे निश्चित आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीBiharबिहार