शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

बिहार निवडणूक : निकालापूर्वीच काँग्रेसला धास्ती, आमदार फुटण्याची भीती; 'हे' दोन बडे नेते पाटण्यात

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 9, 2020 10:01 IST

एक्झिटपोलनंतर सक्रीय झालेल्या काँग्रेसने मतमोजणीनंतर आमदारांना एकत्रित ठेवण्यासाठी दोन वरिष्ठ नेत्यांना पाटना येथे पाठवले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नेत्यांना खास जबाबदारी सोपवली आहे.

ठळक मुद्देबिहारमध्ये 243 विधानसभा जागांसाठी मतदान प्रक्रियी पार पडली. उद्या म्हणजेच 10 नोव्हेंबरला निवडणूक निकाल येणार आहेत.एक्झिट पोलच्या निकालामुळे आनंदात असूनही काँग्रेसची झोप उडाली असल्याचे दिसत आहे. काँग्रेसला आता आमदार फुटण्याची भीती वाटू लागली आहे.

पाटणा :बिहारमध्ये 243 विधानसभा जागांसाठी मतदान प्रक्रियी पार पडली. उद्या म्हणजेच 10 नोव्हेंबरला निवडणूक निकाल येणार आहेत. मतदानानंतर आलेल्या एक्झिटपोलमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांना टाटा-बाय-बाय होणार आणि राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) नेतृत्वाखालील सरकार येणार, असे संकेत मिळत आहेत. मात्र, या एक्झिट पोलच्या निकालामुळे आनंदात असूनही काँग्रेसची झोप उडाली असल्याचे दिसत आहे. त्यांना आता आमदार फुटण्याची भीती वाटू लागली आहे.

एक्झिटपोलनंतर सक्रीय झालेल्या काँग्रेसने मतमोजणीनंतर आमदारांना एकत्रित ठेवण्यासाठी दोन वरिष्ठ नेत्यांना पाटना येथे पाठवले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाचे महासचिव अविनाश पांडेय आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांना पाटणा येथे पाठवून, निवडणूक निकालानंतरच्या परिस्थितीचे व्यवस करण्याची जबाबदारी दिली आहे.

एक्झिट पोलनुसार, बिहार निवडणुकीत काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे. अशात घोडेबाजारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या दोन्ही नेत्यांना पाटणा येथे पाठवण्यात आले आहे. हे दोन्ही नेते बिहारमध्ये राहतील. तसेच आघाडीतील सहकाऱ्यांसोबत समन्वय ठेवण्याचे काम करतील. महा आघाडीमध्ये आरजेडीसोबत काँग्रेस आणि डावा पक्षही सहभागी आहे. तर एनडीएमध्ये जेडीयू, भारतीय जनता पक्ष (भाजप), जीतनराम मांझींचा पक्ष, मुकेश सहनी यांचा (व्हीआयपी) देखील सहभागी आहे. ही लढाई काट्याची झाली आणि आणि एनडीए बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 122 या जादूई आकड्याच्या जवळपास पोहोचला तर घोडेबाजार होऊ शकतो. यामुळे कमी जागां जिंकणारा पक्ष अधिक दुर्बल होईल. 

यामुळे काँग्रेस आधीच सतर्क झाली आहे. तसेच काँग्रेसने आपल्या सर्व उमेदवारांना, विजयानंतर विजयी मिरवणुका न काढता प्रमाणपत्र घेऊन सरळ पाटण्याला यावे, असे सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या सर्व आमदारांना पाटण्याच्या एखाद्या हॉटेलमध्ये ठेवण्याची काँग्रेसची योजना आहे. आलेल्या एक्झिटपोलनुसार, निकाल आले, तर राज्यात महा आघाडी सरकार येणे निश्चित आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीBiharबिहार