शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Assembly Election Results: सीमांचलमध्ये ओवेसी फॅक्टरनं बदललं महाआघाडीचं गणित; बिहारमध्ये 'Non-बिहारी पार्टी'ची एन्ट्री!

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 10, 2020 16:09 IST

येत असलेल्या निवडणूक निकालांचा विचार करता, येथे केवळ एनडीए आणि महाआघाडी यांच्यातच लढाई बघायला मिळत आहे. मात्र...

ठळक मुद्देसीमांचल मधील 24 जागांवर असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमने महाआघाडीचे संपूर्ण गणितच बिघडवले आहे.बिहारमध्ये केवळ एनडीए आणि महाआघाडी यांच्यातच लढाई बघायला मिळत आहे.सीमांचलमध्ये एकूण 24 जागांपैकी महा आघाडी केवळ 5 तर एनडीए 11 जागांवर पुढे आहे.

पाटणा - नेपाळ आणि पश्चिम बंगालच्या सीमेला लागून इशांन्य भारताला जोडल्या जाणाऱ्या भागाला बिहारमधील सीमांचल भाग म्हणून ओळखले जाते. राजकारणाच्या दृष्टीने हा भाग अत्यंत महत्वाचा मानला जातो. कारण येथील पूर्णियामध्ये 35 टक्के, कटिहारमध्ये 45 टक्के, अररियामध्ये 51 टक्के आणि किशनगंजमध्ये 70 टक्के मुस्लीम मतदार आहेत. आता जे निवडणूक निकाल समोर येत आहेत, त्यानुसार सीमांचल मधील 24 जागांवर असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमने महाआघाडीचे संपूर्ण गणितच बिघडवले आहे. परिणामी येथील या 24 जागांपैकी महा आघाडी केवळ 5 तर एनडीए 11 जागांवर पुढे आहे. तर 8 जागा इतरांना मिळत आहेत. यात ओवेसी यांचा एआयएमआयएम पक्ष तीन जागांवर पुढे आहे. 

येत असलेल्या निवडणूक निकालांचा विचार करता, येथे केवळ एनडीए आणि महाआघाडी यांच्यातच लढाई बघायला मिळत आहे. मात्र या निवडणुकीत ओवेसी फॅक्टर एनडीएच्या फायद्याचा ठरत आहे. ओवेसींचा पक्षही महाआघाडी आणि आणि एनडीएला आव्हान देत आहे. गत विधानसभा निवडणुकीचा विचार करता, सीमांचलमधील 19 पैकी 12 जागा आरजेडी आणि काँग्रेसने जिंकल्या होत्या.

Bihar Assembly Election Results : बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष, NDA बहुमताच्या पुढे

या तीन जागांवर एआयएमआयएम आघाडीवर -सध्या ओवेसी यांचा पक्ष एआयएमआयएम अमौर, बहादुरगंज आणि कोचाधामन या तीन जागांवर पुढे आहे. सीमांचलमधील 24 जागांवर, महाआघाडीकडून आरजेडी 11, काँग्रेस 11, भाकपा-माले 1 आणि सीपीएम एका जागेवर निवडणूक लढवत आहेत. तर, एनडीएकडून भाजपा 12, जेडीयू 11 तर हम एका जागेवर नशीब आजमावत आहेत.

सीमांचल भागात 2015च्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. येथे एकट्या काँग्रेसने 9 जागांवर विजय मिळवला होता. तर जेडीयूने 6 आणि आरजेडीने 3 जागा जिंकल्या होत्या.

मोदींचा करिष्मा संपला, नितीश कुमारांना भाजपच्या 'या' रणनीतीचा फटका बसला; भुजबळांचा मोठा दावा

कोरोना काळातील ही देशातील पहिलीच निवडणूक आहे. हिंदी बेल्टमधील निवडणुकीच्या दृष्टीने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर बिहारमधील निवडणूक तिसऱ्या क्रमांकाची सर्वात महत्वाची निवडणूक मानली जाते.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहारAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपा