शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

सत्तेत आल्यास दारुबंदीबाबत पुनर्विचार करणार, बिहारी जनतेला काँग्रेसचं आश्वासन

By बाळकृष्ण परब | Updated: October 21, 2020 17:56 IST

Bihar Assembly Election 2020 News : बिहारमधील निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आणि प्रमुख विरोधी आघाडी असलेल्या महाआघाडीमध्ये मुख्य लढत होत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून जाहीरनाम्यामधून अनेक आश्वासने दिली जात आहेत.

ठळक मुद्देसत्तेत आल्यास दारुबंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करू, काँग्रेसने दिले आश्वासन दारुबंदीमुळे राज्या्च्या महसुलाचे मोठ्या प्रमाणावर झाले नुकसान राज्य सरकार दारुबंदीबाबतच्या सकारात्मक हेतूपासून भरकटले आहे

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आता ऐन रंगात आला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आणि प्रमुख विरोधी आघाडी असलेल्या महाआघाडीमध्ये मुख्य लढत होत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून जाहीरनाम्यामधून अनेक आश्वासने दिली जात आहेत. दरम्यान, काँग्रेसनेही बदलावपत्र या नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या बदलावपत्रामधून काँग्रेसचे बिहारी जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत. त्यापैकी एक आश्वासन हे दारुबंदीबाबतही दिले आहे. सत्तेत आल्यास दारुबंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करू असे आश्वासन काँग्रेसने बिहारमधील जनतेला या जाहीरनाम्यामधून दिले आहे.काँग्रेसने सांगितले की, दारुबंदीमुळे राज्या्च्या महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच राज्य सरकार दारुबंदीबाबतच्या सकारात्मक हेतूपासून भरकटले आहे. त्यामुळे राज्यात अवैध व्यापार होत आहे आणि पोलिसांना लाभ पोहोचवला जात आहे. मात्र जनता अजूनही त्रस्त आहे. अशा परिस्थित काँग्रेस सत्तेवर आल्यावर या निर्णयाचा योग्य तो पुनर्विचार करणार आहे.२०१५ मध्ये सत्तेत आल्यानंतर नितीश कुमार यांनी दारुबंदीचा निर्णय घेतला होता. तसेच हा एक मोठा निर्णय असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र निवडणुकीच्या काळात बिहारमध्ये अनेक ठिकाणी अवैध दारू पकडण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.याशिवाय काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामधून अनेक महत्त्वपूर्ण आश्वसने दिली आहेत. यामध्ये १०० युनिटपर्यंत निम्मे वीजबिल, मुलींना स्कूटी, तरुणांना बेरोजगारी भत्ता, विधवांना पेन्शन, अशी आश्वासने देण्यात आली आहेत.दरम्यान, काँग्रेस प्रमाणेच लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनीही दारुबंदीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. केवळ दारुबंदी केल्याने महिला सशक्तीकरण झाले आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच दारुबंदीच्या निर्णयाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाली नाही, असा दावाही त्यांनी केला होता.काँग्रेस बिहारमध्ये महाआघाडीचा घटक पक्ष आहे. या निवडणुकीत काँग्रेस एकूण ७० जागांवर निवडणूक लढवत आहे. बिहारमध्ये २८ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान, तीन टप्पांमधील मतदान आटोपल्यानंतर १० नोव्हेंबररोजी मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसliquor banदारूबंदी