शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Assembly Election : "कोरोनात मोदी सरकार फेल, पंतप्रधानांनी मजुरांना मदत केली नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 15:59 IST

"कोरोना काळात लाखो मजूर पायपीट करून आपल्या घरी येत होते. पण या कोरोनासंकटात मोदी आणि नितीश यांनी मजुरांची मदत केली नाही." (Bihar Assembly Election)

ठळक मुद्देपंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांनी एकत्रितपणे बिहारला लुटले आहे - राहुल गांधीराहुल म्हणाले, मजूर पायपीट करत असताना, नितीशजी आणि मोदीजी कुठे होते. बिहारमधील लोकांना बाहेर जाऊन का काम करावे लागते? येथे रोजगार का नाही? असे प्रश्नही राहुल गांधींनी यावेळी उपस्थित केले.

पाटणा -काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी बिहार निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचारार्थ कटिहार येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधन नरेंद्र मोदी यांना निशाण्यावर घेतले. राहुल म्हणाले, पंतप्रधान मोदींनी कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वप्रथम घंटी वाजवली आणि नंतर फोनची बॅटरी लावायला सांगितली. मात्र, कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला नाही.

राहुल गांधी म्हणाले, कोरोना काळात लाखो मजूर पायपीट करून आपल्या घरी येत होते. पण या कोरोनासंकटात मोदी आणि नितीश यांनी मजुरांची मदत केली नाही. मात्र, काँग्रेस म्हणाली होती, की आम्ही मजुरांची मदत करू इच्छितो. एवढेच नाही, तर पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांनी एकत्रितपणे बिहारला लुटले आहे आणि आता बिहारमधील लोक त्यांना उत्तर देतील, असेही राहुल म्हणाले.

राहुल म्हणाले, मजूर पायपीट करत असताना, नितीशजी आणि मोदीजी कुठे होते. तेव्हा मदत केली नाही आणि आता मतं मागायला येत आहेत. राहुल यांनी आरोप केला, की हे दोघेही केवळ आपल्या धनाड्य मित्रांचीच मदत करत आहेत. एवढेच नाही, तर बिहारमधील लोकांना बाहेर जाऊन का काम करावे लागते? येथे रोजगार का नाही? असे प्रश्नही राहुल गांधींनी यावेळी उपस्थित केले.

राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी म्हणाले होते, की दोन कोटी लोकांना रोजगार देणार. नितीश कुमारही असेच म्हणाले होते. मात्र, कुणीही आपले आश्वासन पूर्ण केले नाही. मोदींनी संपूर्ण देशाला लाइनमध्ये उभे केले होते. नोटाबंदीच्या काळात केवळ देशातला गरीब नागरीकच रांगेत उभा होता. पंतप्रधान मोदींनी गरिबांच्या खिशातून पैसा काढून तो आपल्या श्रीमंत मित्रांच्या खिशात घातला. एवढेच नाही, तर पूर्वी नोटाबंदी, मग जीएसटी आणि आता शेतकऱ्यांना नष्ट करणारा कायदा तयार करण्यात आला आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBiharबिहार