शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

बिहार : ६७ लाख मतदारांची माहिती १९ पर्यंत जाहीर करा, आक्षेप असलेली नावे बोर्डावर लावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 05:24 IST

आक्षेप आहेत त्यांची नावे आयोगाने वेबसाइटवर द्यावीत किंवा जाहीरपणे बोर्डावर लावावीत

नवी दिल्ली : बिहारमधील मतदार यादी पुनरीक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निवडणूक आयोगाला निर्देश देत या याद्यांमधून वगळलेल्या ६७ लाख मतदारांची माहिती १९ ऑगस्टपर्यंत जाहीर करण्यास सांगितले आहे. २२ ऑगस्टपर्यंत याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.

'ज्या मतदारांचा मृत्यू झाला आहे, तसेच जे सध्या त्या-त्या मतदारसंघांत किंवा या राज्यात नाहीत अशा मतदारांची नावे का जाहीर केली जात नाहीत,' अशी विचारणा न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला केली. ज्या ६७ लाख नावांबद्दल आक्षेप आहेत त्यांची नावे आयोगाने वेबसाइटवर द्यावीत किंवा जाहीरपणे बोर्डावर लावावीत, असे निर्देश न्यायालयाने आयोगाला दिले.

निवडणूक आयोगाने न्यायालयासमोर बाजू मांडताना सांगितले, 'या भयंकर राजकीय द्वेषाच्या वातावरणात काम करताना एखादाच असा निर्णय असेल की ज्यावर वाद झाला नाही. या राजकीय पक्षांच्या वादात आयोग अडकला आहे. कारण, एखादा पक्ष जिंकला तर ईव्हीएम चांगले अन् हरला तर वाईट ठरते.'

'मतचोरी'सारखे शब्द हा मतदारांवर हल्ला

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधकांनी मतचोरीच्या केलेल्या आरोपांना निवडणूक आयोगाने गुरुवारी उत्तर दिले. 'मतचोरी' सारखे शब्द वापरून खोटे आरोप करणे हा कोट्यवधी भारतीय मतदारांवर, तसेच लाखो निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणावर हल्ला आहे, असे आयोगाने म्हटले आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBiharबिहार