शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

बिहार : ६७ लाख मतदारांची माहिती १९ पर्यंत जाहीर करा, आक्षेप असलेली नावे बोर्डावर लावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 05:24 IST

आक्षेप आहेत त्यांची नावे आयोगाने वेबसाइटवर द्यावीत किंवा जाहीरपणे बोर्डावर लावावीत

नवी दिल्ली : बिहारमधील मतदार यादी पुनरीक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निवडणूक आयोगाला निर्देश देत या याद्यांमधून वगळलेल्या ६७ लाख मतदारांची माहिती १९ ऑगस्टपर्यंत जाहीर करण्यास सांगितले आहे. २२ ऑगस्टपर्यंत याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.

'ज्या मतदारांचा मृत्यू झाला आहे, तसेच जे सध्या त्या-त्या मतदारसंघांत किंवा या राज्यात नाहीत अशा मतदारांची नावे का जाहीर केली जात नाहीत,' अशी विचारणा न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला केली. ज्या ६७ लाख नावांबद्दल आक्षेप आहेत त्यांची नावे आयोगाने वेबसाइटवर द्यावीत किंवा जाहीरपणे बोर्डावर लावावीत, असे निर्देश न्यायालयाने आयोगाला दिले.

निवडणूक आयोगाने न्यायालयासमोर बाजू मांडताना सांगितले, 'या भयंकर राजकीय द्वेषाच्या वातावरणात काम करताना एखादाच असा निर्णय असेल की ज्यावर वाद झाला नाही. या राजकीय पक्षांच्या वादात आयोग अडकला आहे. कारण, एखादा पक्ष जिंकला तर ईव्हीएम चांगले अन् हरला तर वाईट ठरते.'

'मतचोरी'सारखे शब्द हा मतदारांवर हल्ला

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधकांनी मतचोरीच्या केलेल्या आरोपांना निवडणूक आयोगाने गुरुवारी उत्तर दिले. 'मतचोरी' सारखे शब्द वापरून खोटे आरोप करणे हा कोट्यवधी भारतीय मतदारांवर, तसेच लाखो निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणावर हल्ला आहे, असे आयोगाने म्हटले आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBiharबिहार