शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ऐकावं ते नवलच! ३४ वर्षांपूर्वी २० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलिसाला अखेर अटक होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 16:15 IST

तब्बल ३४ वर्षांनी या प्रकरणी निर्णय आल्याने याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

सोशल मीडियाच्या या जगात कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. नेहमी अनोख्या गोष्टी नेटकऱ्यांचे मनोरंजन करत असतात. बिहारमधील सहरसा येथून एक अशीच हास्यास्पद तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील सहरसा रेल्वे स्थानकावर भाजीपाल्याची टोपली घेऊन जाणाऱ्या सीतादेवी नावाच्या महिलेकडून २० रुपयांची लाच घेणाऱ्या हवालदाराला अटक करण्यात येणार आहे. ३४ वर्षे जुन्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी हवालदारला अटक करून हजर करण्याचे आदेश दिले आहेत. पण, तब्बल ३४ वर्षांनी या प्रकरणी निर्णय आल्याने याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

दरम्यान, या लाच प्रकरणात न्यायाधीश सुदेश श्रीवास्तव यांनी डीजीपीला फरार कॉन्स्टेबलला अटक करून त्याला हजर करण्यास सांगितले आहे. विशेष न्यायाधीशांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, पाटणाच्या उच्च न्यायालयाने या प्रकरणाची प्रलंबित प्रकरणे गांभीर्याने घेत अखेर निर्णय दिला. संबंधित पोलीस हवालदार १९९९ पासून फरार होता. त्याच्याविरोधातील अटक वॉरंट आणि त्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश काढण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. 

३४ वर्षांनी अखेर निर्णय आला

खरे तर आरोपी हवालदाराने हुशारीने त्याचा पत्ता चुकीचा लिहून घेतला आणि विभागाच्या अधिकाऱ्यांना फसवले होते, ज्यांनी त्याला लाच घेताना पकडले होते. जुन्या प्रलंबित खटल्यांवरील सुनावणीदरम्यान पाटणा उच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतल्यानंतर हवालदाराचा खरा चेहरा समोर आला. २१ डिसेंबर १९९९ रोजी न्यायालयाने त्याचे बाँड रद्द केले आणि अनेक तारखांना न्यायालयात हजर न राहिल्याबद्दल हवालदाराला अटक वॉरंट जारी केले. 

टॅग्स :BiharबिहारSocial Viralसोशल व्हायरलBribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिस