शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 15:17 IST

India vs Pakistan War: गोळीबार सुरु होताच तिथे विखुरलेले पर्यटक गेटच्या दिशेने धावू लागले. कर्नाटकचे रहिवासी असलेले एक लष्करी अधिकारी कुटुंबासोबत तिथे फिरायला गेले होते.

पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांकडे एम ४ असॉल्ट रायफल आणि एके ४७ रायफली होत्या. जवळपास २० ते २५ मिनिटे त्यांनी हैदोस घातला होता. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या. तिथे जवळपास २००० लोक होते, एकत्र नव्हते हीच एक जमेची बाजू होती. एकत्र जमलेले असते तर आणखी मृत्यू झाले असते. या हल्ल्यावेळी नौदलाचा एक अधिकारी देखील शहीद झाला आहे. परंतू तिथे भारतीय लष्कराचा एक मोठा अधिकारी देखील होता असे समोर आले आहे. 

एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा

गोळीबार सुरु होताच तिथे विखुरलेले पर्यटक गेटच्या दिशेने धावू लागले. कर्नाटकचे रहिवासी असलेले एक लष्करी अधिकारी कुटुंबासोबत तिथे फिरायला गेले होते. त्यांच्या पुढील धोका लक्षात आला. गेटवर जर दहशतवादी घात लावून बसले असतील तर मोठ्या संख्येने बळी जातील, याची त्यांना कल्पना आली. त्यांनी सर्व बाजुंनी गेटकडे धावणाऱ्या लोकांना आवाज दिला, गेटकडे धावू नका आणि थांबविले व इतर मार्गांनी बाहेर जाण्यास सांगितले. 

कर्नाटकातील सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रसन्न कुमार भट यांनी ही घटना एक्सवर पोस्ट केली आहे. हा लष्करी अधिकारी त्यांचा भाऊ आहे. प्रसन्न कुमार भट्ट हे देखील त्यांच्या पत्नी, लष्करी अधिकारी भाऊ आणि मेहुण्यांसह पहलगामच्या बैसरन खोऱ्यात फिरायला आले होते. तिथे गेल्यानंतर २० मिनिटांनी गोळीबाराचा आवाज ऐकू आला. इतर मुले खेळत होती, त्यांच्या लक्षात आले नाही. परंतू, मोठ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गेटकडे धाव घेतली. भट्ट यांनी गेटपासून ४०० मीटर लांब असलेल्या एका मोबाईल टॉयलेटमागे कुटुंबाला लपविले. 

दहशतवादी हल्ला झाल्याचे लष्करी अधिकाऱ्याच्या लक्षात आहे, तो एके ४७ मधून गोळ्या सुटल्याचा आवाज होता. अधिकाऱ्याकडे कोणतेही शस्त्र नव्हते, त्यांनी लोकांना धावताना पाहून लगेचच त्यांच्याकडे धाव घेतली आणि झुंडीने जाण्याऐवजी विखुरलेल्या स्थितीत उलट्या दिशेला जाण्यास सांगितले. तसेच दुसऱ्या वाटांचा शोध घेतला. एका नाल्याच्या बाजुने कुंपण नसल्याचे दिसले, या लोकांना त्यांनी त्या दिशेने जाण्यास सांगितले आणि बाहेर काढले. माती ठिसूळ असल्याने लोक पळू शकले नाहीत, परंतू घसरत त्यांनी कुंपण पार केले. याच लष्करी अधिकाऱ्याने सैन्याच्या तुकडीला आणि श्रीनगर आर्मी हेडक्वार्टरला दहशतवादी हल्ल्याची माहिती दिली. 

दुपारी ३ वाजेपर्यंत बंदुकांचे आवाज येत होते. यानंतर जवळपास ४० मिनिटांनी हेलिकॉप्टरचे आवाज येऊ लागले. चार वाजता सैन्याची एक तुकडी कुटुंबासोबत लपलेल्या लष्करी अधिकाऱ्याकडे पोहोचली. तसेच घाबरलेल्या लोकांना विश्वास देण्यास सुरुवात करण्यात आली.  

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान