शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा भारतीय लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 15:07 IST

India vs Pakistan War: गोळीबार सुरु होताच तिथे विखुरलेले पर्यटक गेटच्या दिशेने धावू लागले. कर्नाटकचे रहिवासी असलेले एक लष्करी अधिकारी कुटुंबासोबत तिथे फिरायला गेले होते.

पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांकडे एम ४ असॉल्ट रायफल आणि एके ४७ रायफली होत्या. जवळपास २० ते २५ मिनिटे त्यांनी हैदोस घातला होता. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या. तिथे जवळपास २००० लोक होते, एकत्र नव्हते हीच एक जमेची बाजू होती. एकत्र जमलेले असते तर आणखी मृत्यू झाले असते. या हल्ल्यावेळी नौदलाचा एक अधिकारी देखील शहीद झाला आहे. परंतू तिथे भारतीय लष्कराचा एक मोठा अधिकारी देखील होता असे समोर आले आहे. 

एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा

गोळीबार सुरु होताच तिथे विखुरलेले पर्यटक गेटच्या दिशेने धावू लागले. कर्नाटकचे रहिवासी असलेले एक लष्करी अधिकारी कुटुंबासोबत तिथे फिरायला गेले होते. त्यांच्या पुढील धोका लक्षात आला. गेटवर जर दहशतवादी घात लावून बसले असतील तर मोठ्या संख्येने बळी जातील, याची त्यांना कल्पना आली. त्यांनी सर्व बाजुंनी गेटकडे धावणाऱ्या लोकांना आवाज दिला, गेटकडे धावू नका आणि थांबविले व इतर मार्गांनी बाहेर जाण्यास सांगितले. 

कर्नाटकातील सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रसन्न कुमार भट यांनी ही घटना एक्सवर पोस्ट केली आहे. हा लष्करी अधिकारी त्यांचा भाऊ आहे. प्रसन्न कुमार भट्ट हे देखील त्यांच्या पत्नी, लष्करी अधिकारी भाऊ आणि मेहुण्यांसह पहलगामच्या बैसरन खोऱ्यात फिरायला आले होते. तिथे गेल्यानंतर २० मिनिटांनी गोळीबाराचा आवाज ऐकू आला. इतर मुले खेळत होती, त्यांच्या लक्षात आले नाही. परंतू, मोठ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गेटकडे धाव घेतली. भट्ट यांनी गेटपासून ४०० मीटर लांब असलेल्या एका मोबाईल टॉयलेटमागे कुटुंबाला लपविले. 

दहशतवादी हल्ला झाल्याचे लष्करी अधिकाऱ्याच्या लक्षात आहे, तो एके ४७ मधून गोळ्या सुटल्याचा आवाज होता. अधिकाऱ्याकडे कोणतेही शस्त्र नव्हते, त्यांनी लोकांना धावताना पाहून लगेचच त्यांच्याकडे धाव घेतली आणि झुंडीने जाण्याऐवजी विखुरलेल्या स्थितीत उलट्या दिशेला जाण्यास सांगितले. तसेच दुसऱ्या वाटांचा शोध घेतला. एका नाल्याच्या बाजुने कुंपण नसल्याचे दिसले, या लोकांना त्यांनी त्या दिशेने जाण्यास सांगितले आणि बाहेर काढले. माती ठिसूळ असल्याने लोक पळू शकले नाहीत, परंतू घसरत त्यांनी कुंपण पार केले. याच लष्करी अधिकाऱ्याने सैन्याच्या तुकडीला आणि श्रीनगर आर्मी हेडक्वार्टरला दहशतवादी हल्ल्याची माहिती दिली. 

दुपारी ३ वाजेपर्यंत बंदुकांचे आवाज येत होते. यानंतर जवळपास ४० मिनिटांनी हेलिकॉप्टरचे आवाज येऊ लागले. चार वाजता सैन्याची एक तुकडी कुटुंबासोबत लपलेल्या लष्करी अधिकाऱ्याकडे पोहोचली. तसेच घाबरलेल्या लोकांना विश्वास देण्यास सुरुवात करण्यात आली.  

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान