शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी : आंध्र प्रदेशात राजकीय उलथापालथ; जगन मोहन रेड्डींची बहीण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 13:34 IST

वायएस शर्मिला यांच्या पक्षप्रवेशाने काँग्रेसला लोकसभा निवडणुकीसह आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीतही चांगला फायदा होऊ शकतो.

YS Sharmila to join Congress ( Marathi News ) : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाला धक्का देत सत्ता काबीज केल्यानंतर काँग्रेसने आपला मोर्चा आता आंध्र प्रदेशकडे वळवला आहे. आगामी लोकसभा निवडणूक आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने रणनीती आखण्यास सुरुवात केली असून याचाच एक भाग म्हणून आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला यांना पक्षात घेण्याचा निर्णय काँग्रेसकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. वायएस शर्मिला या आठवड्यातच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती समोर येत आहे. शर्मिला यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यास पक्षविस्तारासाठी त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

वायएस शर्मिला यांनी भाऊ जगन मोहन रेड्डी यांच्याशी राजकीय मतभेद झाल्यानंतर जुलै २०२१ मध्ये वायएसआर तेलंगणा पक्षाची स्थापना केली होती. मात्र शर्मिला यांच्या पक्षाने नुकतीच झालेली तेलंगणा विधानसभा निवडणूक लढवली नव्हती. ही निवडणूक काँग्रेस जिंकण्याच्या स्थितीत असल्यामुळे आम्ही न लढण्याचा निर्णय घेतला, असं तेव्हा त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे वायएस शर्मिला यांची काँग्रेससोबतची वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरली होती आणि त्या लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या चर्चेवर आता शिक्कामोर्तब होणार असून वायएस शर्मिला या काँग्रेसमध्ये प्रवेश करत आपला पक्षही विलीन करणार आहेत.

काँग्रेसला होणार मोठा फायदा

जगन मोहन रेड्डी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत वायएसआर काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यापासून आंध्र प्रदेशात काँग्रेसची स्थिती दिवसेंदिवस खराब होत गेली. सध्या आंध्र प्रदेशात सत्ताधारी वायएसआरसीपी विरुद्ध चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. या संघर्षात बाजूला पडलेल्या काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारी फारच कमी झाली आहे. त्यामुळे वायएस शर्मिला यांना पक्षात घेत काँग्रेसकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, वायएस शर्मिला यांच्या पक्षप्रवेशाने काँग्रेसला लोकसभा निवडणुकीसह आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीतही चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात आंध्र प्रदेशच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारण