शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोठी बातमी : आंध्र प्रदेशात राजकीय उलथापालथ; जगन मोहन रेड्डींची बहीण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 13:34 IST

वायएस शर्मिला यांच्या पक्षप्रवेशाने काँग्रेसला लोकसभा निवडणुकीसह आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीतही चांगला फायदा होऊ शकतो.

YS Sharmila to join Congress ( Marathi News ) : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाला धक्का देत सत्ता काबीज केल्यानंतर काँग्रेसने आपला मोर्चा आता आंध्र प्रदेशकडे वळवला आहे. आगामी लोकसभा निवडणूक आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने रणनीती आखण्यास सुरुवात केली असून याचाच एक भाग म्हणून आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला यांना पक्षात घेण्याचा निर्णय काँग्रेसकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. वायएस शर्मिला या आठवड्यातच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती समोर येत आहे. शर्मिला यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यास पक्षविस्तारासाठी त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

वायएस शर्मिला यांनी भाऊ जगन मोहन रेड्डी यांच्याशी राजकीय मतभेद झाल्यानंतर जुलै २०२१ मध्ये वायएसआर तेलंगणा पक्षाची स्थापना केली होती. मात्र शर्मिला यांच्या पक्षाने नुकतीच झालेली तेलंगणा विधानसभा निवडणूक लढवली नव्हती. ही निवडणूक काँग्रेस जिंकण्याच्या स्थितीत असल्यामुळे आम्ही न लढण्याचा निर्णय घेतला, असं तेव्हा त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे वायएस शर्मिला यांची काँग्रेससोबतची वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरली होती आणि त्या लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या चर्चेवर आता शिक्कामोर्तब होणार असून वायएस शर्मिला या काँग्रेसमध्ये प्रवेश करत आपला पक्षही विलीन करणार आहेत.

काँग्रेसला होणार मोठा फायदा

जगन मोहन रेड्डी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत वायएसआर काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यापासून आंध्र प्रदेशात काँग्रेसची स्थिती दिवसेंदिवस खराब होत गेली. सध्या आंध्र प्रदेशात सत्ताधारी वायएसआरसीपी विरुद्ध चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. या संघर्षात बाजूला पडलेल्या काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारी फारच कमी झाली आहे. त्यामुळे वायएस शर्मिला यांना पक्षात घेत काँग्रेसकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, वायएस शर्मिला यांच्या पक्षप्रवेशाने काँग्रेसला लोकसभा निवडणुकीसह आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीतही चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात आंध्र प्रदेशच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारण