शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मोठी बातमी : आंध्र प्रदेशात राजकीय उलथापालथ; जगन मोहन रेड्डींची बहीण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 13:34 IST

वायएस शर्मिला यांच्या पक्षप्रवेशाने काँग्रेसला लोकसभा निवडणुकीसह आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीतही चांगला फायदा होऊ शकतो.

YS Sharmila to join Congress ( Marathi News ) : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाला धक्का देत सत्ता काबीज केल्यानंतर काँग्रेसने आपला मोर्चा आता आंध्र प्रदेशकडे वळवला आहे. आगामी लोकसभा निवडणूक आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने रणनीती आखण्यास सुरुवात केली असून याचाच एक भाग म्हणून आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला यांना पक्षात घेण्याचा निर्णय काँग्रेसकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. वायएस शर्मिला या आठवड्यातच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती समोर येत आहे. शर्मिला यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यास पक्षविस्तारासाठी त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

वायएस शर्मिला यांनी भाऊ जगन मोहन रेड्डी यांच्याशी राजकीय मतभेद झाल्यानंतर जुलै २०२१ मध्ये वायएसआर तेलंगणा पक्षाची स्थापना केली होती. मात्र शर्मिला यांच्या पक्षाने नुकतीच झालेली तेलंगणा विधानसभा निवडणूक लढवली नव्हती. ही निवडणूक काँग्रेस जिंकण्याच्या स्थितीत असल्यामुळे आम्ही न लढण्याचा निर्णय घेतला, असं तेव्हा त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे वायएस शर्मिला यांची काँग्रेससोबतची वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरली होती आणि त्या लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या चर्चेवर आता शिक्कामोर्तब होणार असून वायएस शर्मिला या काँग्रेसमध्ये प्रवेश करत आपला पक्षही विलीन करणार आहेत.

काँग्रेसला होणार मोठा फायदा

जगन मोहन रेड्डी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत वायएसआर काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यापासून आंध्र प्रदेशात काँग्रेसची स्थिती दिवसेंदिवस खराब होत गेली. सध्या आंध्र प्रदेशात सत्ताधारी वायएसआरसीपी विरुद्ध चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. या संघर्षात बाजूला पडलेल्या काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारी फारच कमी झाली आहे. त्यामुळे वायएस शर्मिला यांना पक्षात घेत काँग्रेसकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, वायएस शर्मिला यांच्या पक्षप्रवेशाने काँग्रेसला लोकसभा निवडणुकीसह आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीतही चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात आंध्र प्रदेशच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारण