शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
4
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
5
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
6
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
7
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
9
Viral Video: लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
10
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
11
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
12
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम
13
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
14
पैशाचा खेळ! ऑनलाईन सेलचं धक्कादायक सत्य; घाईत महागड्या वस्तुंची खरेदी, बेस्ट डील कोणती?
15
GST कपात व्यतिरिक्त नवीन गाडी घेताना १५ हजारांची करा बचत! खरेदी करण्यापूर्वी वापरा 'या' ५ स्मार्ट टिप्स!
16
इस्रायलवर भारताचे मोठे उपकार! १०० वर्षांनी समोर आलं 'हाइफा' शहराच्या इतिहासातील सत्य, काय घडलं?
17
जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
18
कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
19
Rakhi Sawant : Video - "डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील, मी तान्या मित्तलपेक्षा श्रीमंत..."; राखी सावंतचा मोठा दावा
20
लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट

'सरकारवर टीका करणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर ही मोठी चूक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 19:00 IST

देशात वेगवेगळे विचार आहेत, संस्कृती आहे. मात्र कोणत्याही विचारांवर आणि संस्कृतीवर एका समाजाची मक्तेदारी लादण्याचा प्रयत्न केला तर हे देशाच्या प्रगतीच्या दृष्टीकोनातून चुकीचे आहे

नवी दिल्ली - लोकशाहीत प्रशासन आणि सरकारवर टीका होत असते. ही टीका सहन करता आली पाहिजे. या टीका करणाऱ्यांवर आवाज दडपला जाणार असेल तर ही सर्वात मोठी चूक आहे अशा शब्दात भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गर्वनर रघुराम राजन यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. जर टीकाकरांना सरकारी अधिकाऱ्यांकडून फोन येत असतील. त्यांना गप्प बसण्यासाठी दबाव टाकत असतील. सत्ताधारी पार्टीच्या ट्रोलरकडून लक्ष्य केलं जात असेल. तर त्याने टीका करणं कमी होतं असं रघुराम राजन यांनी सांगितले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून रघुराम राजन यांनी हे भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, सरकारविरोधातील कटूसत्य समोर आलं नाही तर सरकार आनंदात असतं. आपण किती महान आहोत हे पाहण्यासाठी इतिहासात पाहिलं पाहिजे. मात्र त्या इतिहासाचे दाखले देऊन छाती बडवून घेणे अन् मोठेपणा सांगणे यातून असुरक्षिततेची भावना समोर येते असं त्यांनी सांगितले. 

तसेच देशात वेगवेगळे विचार आहेत, संस्कृती आहे. मात्र कोणत्याही विचारांवर आणि संस्कृतीवर एका समाजाची मक्तेदारी लादण्याचा प्रयत्न केला तर हे देशाच्या प्रगतीच्या दृष्टीकोनातून चुकीचे आहे. विचारांवर एका समाजाची मक्तेदारी असू शकत नाही. मतभेद आणि विचार दडपल्याने कोणतीही चुकीची धोरणे बरोबर ठरत नाही अशा शब्दात रघुराम राजन यांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर निशाणा साधला आहे. 

दरम्यान, देशात विविध विचारांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. देशासमोर आज अनेक आव्हानं आहेत. समाजात अस्थिरता आहे. अशा परिस्थितीत जर अधिकारी अथवा सरकारला त्यांच्या चुका दाखवून दिल्या नाही तर सरकार आत्मकेंद्रीत होईल. तसेच इतर देशांची स्पर्धा करत असताना आपल्या संस्कृतीला धोका निर्माण होईल हे चुकीचं असल्याचं मत रघुराम राजन यांनी मांडले आहे. 

टॅग्स :Raghuram Rajanरघुराम राजन