शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

प्रत्यक्ष अन् अंतिम मतदानाच्या आकडेवारीत मोठे अंतर, मतदार चिंतेत असल्याने शंका दूर करण्याची काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 14:02 IST

काँग्रेस नेते आणि पक्षाच्या माध्यम आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी सांगितले की, फरक सुमारे १.७ कोटी मतांचा होता आणि ही खूप मोठी संख्या आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने बुधवारी रिअल-टाइम मतदान डेटा आणि निवडणूक आयोगाने जाहीर केलेला अंतिम डेटा यांच्यातील प्रचंड तफावतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की, मतदार या विचित्र घडामोडीमुळे खूप चिंतेत आहेत. काँग्रेस नेते आणि पक्षाच्या माध्यम आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी सांगितले की, फरक सुमारे १.७ कोटी मतांचा होता आणि ही खूप मोठी संख्या आहे.

१०-११ दिवसांचा कालावधी का?‘मतदानाच्या चार टप्प्यांदरम्यान निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेल्या कामाबद्दलच्या विचित्र हालचालींमुळे मतदार चिंतेत आहेत. प्रथम, अंतिम मतदानाची आकडेवारी समोर आणण्यासाठी निवडणूक आयोगाला १०-११ दिवसांचा कालावधी लागतो आणि त्यानंतर वास्तविक मतदान आणि आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीमध्ये १.७ कोटी मतांचे अंतर असते. हे खरोखरच अभूतपूर्व आहे, तसेच ईव्हीएम गहाळ झाल्याबद्दल अनुत्तरित प्रश्नदेखील खूप चिंताजनक आहेत,’ खेडा सामाजिक माध्यम एक्सवर एका पोस्टमध्ये म्हणाले.

प्रत्येक लोकसभा जागेवर २८,००० मतांची वाढ- पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश याबाबत म्हणाले की, ‘एकंदरीत १.७ कोटी मतांचा हा फरक प्रत्येक लोकसभा जागेवर २८,००० मतांच्या वाढीइतका आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. - भाजपच्या मोठ्या जागा गमावण्याचा अंदाज असलेल्या राज्यांमध्ये ही तफावत सर्वाधिक आहे.’ काँग्रेसबरोबरच इतर विरोधी पक्षांनीही अंतिम मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यास झालेल्या विलंबावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान