शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, केंद्राने MSP दरात केली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 16:10 IST

सरकारद्वारे वाढविण्यात आलेली एमएसपी नवीन ऊस हंगामापासून लागू होणार आहे.

नवी दिल्ली - देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. २८ जून रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊसाची किमान आधारभूत किंमत म्हणजेच एमएसपी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ऊसावरील एमएसपी प्रति क्विंटल १० रुपयांनी वाढविण्यात आली आहे. कृषि लागत आणि मुल्य आयोगाने यापूर्वीच सरकारकडे यासंदर्भात शिफारस केली होती. आता, कॅबिनेटच्या बैठकीनंतर सरकारने यास मंजुरीही दिली आहे. 

सरकारद्वारे वाढविण्यात आलेली एमएसपी नवीन ऊस हंगामापासून लागू होणार आहे. १ ऑक्टोबर २०२३ च्या हंगामानुसार ही सुरुवात होत आहे. ३० डिसेंबर २०२४ पर्यंत यंदाचा हंगाम सुरू राहिल. सन २०२१ मध्ये ऊसाच्या एमएसपीमध्ये ५ रुपयांची वाढ करुन ती २९० रुपये करण्यात आली होती. त्यानंतर, २०२२ मध्ये त्यात १५ रुपयांची वाढ करुन ती ३०५ पर्यंत पोहोचवण्यात आली. आता, त्यात आणखी १० रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे, ऊसाच्या यंदाच्या नवीन हंगामात एमएसपी ३१५ रुपये करण्यात आली आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात ऊसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात असून साखर कारखान्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे, राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ होईल.  

टॅग्स :sugarcaneऊसNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी