शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात मोठा वाद, बड्या नेत्याला केले पक्षातून निलंबित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 14:58 IST

BJP News: राज्यस्थान भाजपाममध्ये मोठा वाद उफाळून आला आहे. भाजपाने पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष कैलाश मेघवाल यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वापासून निलंबित केले आहे.

 राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यस्थान भाजपाममध्ये मोठा वाद उफाळून आला आहे. भाजपाने पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष कैलाश मेघवाल यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वापासून निलंबित केले आहे. कैलाश मेघवाल हे गेल्या काही काळापासून सातत्याने केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्यावर टीका करत होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आजही जयपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भाजपामध्ये गटबाजी असल्याचा दावा केला होता. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. कैलाश मेघवाल हे वसुंधरा राजे गटातील नेते मानले जातात.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्यावर सार्वजनिक मंचावरून आरोप केल्यानंतर कैलाश मेघवाल यांना पक्षाने कारणे दाखवा नोटिस बजावली होती. तसेच त्यांना दहा दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले होते.  त्यानंतर कैलाश मेघवाल यांनी आज पुन्हा प्रेस कॉन्फ्रन्स घेत अर्जुनराम मेघवाल यांच्यावर आरोप केले होते. तसेच पक्षात गटबाजी असल्याचा दावा केला होता.

कैलाश मेघवाल यांच्या निलंबनाबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी.पी. जोशी यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर प्रभारी अरुण सिंह यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेईन आणि नंतर प्रतिक्रिया देईन, असे सांगितले. कैलाश मेघवाल यांच्या निलंबनानंतर राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र कुठलाही नेता याबाबत कुठलीही प्रतिक्रिया देणे टाळत आहे.

दरम्यान, आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मेघवाल म्हणाले की, मी वसुंधराजींना काहीही बोलणार नाही. मात्र कधीकाळी मी हीरो होतो. आता झीरो झालो आहे. पक्षामध्ये माझ्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. माझ्या पक्षातील काही लोक अर्जुनराम मेघवाल यांची तुलना डॉ. आंबेडकर यांच्याशी करत आहेत. हे केवळ त्यांचं महिमामंडन करण्यासाी केलं जातंय. मी राजकारणात सक्रिय होतो आणि यापुढेही राहीन. मी सार्वजनिकपणे वसुंधरा राजे यांच्यावर कुठलाही आरोप कधीही केलेला नाही.

ते पुढे म्हणाले की, मी भाजपामध्ये आहे. मोदींवर माझी कुठलीही नाराजी नाही आहे. माझी राजकीय कारकीर्द प्रदीर्घ राहिली आहे. माझ्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. माझ्यावर अन्याय होतोय. सध्या भाजपा गटबाजीमध्ये विखुरली आहे. तसेच वसुंधरा राजे गटाला समाप्त करण्याचेही प्रयत्न होत आहेत.  

टॅग्स :BJPभाजपाRajasthanराजस्थान