शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

पुढील १५ दिवसांत काँग्रेस पक्षसंघटनेत होणार मोठा बदल?; मल्लिकार्जुन खरगेंनी तयार केली यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 19:13 IST

२०२४ ची लोकसभा निवडणूक काँग्रेससाठी स्वत:चं राजकीय अस्तित्व वाचवण्याची लढाई आहे. त्यामुळे काँग्रेस कोणत्याही प्रकारची राजकीय जोखीम घेऊ इच्छित नाही

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुका आता ११ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसने सत्तेची रणनीती आणि पक्षीय संघटना मजबूत करण्याकडे भर दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे २०२४ निवडणुकीपूर्वी संघटनेत मोठे फेरबदल करण्याची शक्यता आहे. त्यात निम्म्याहून अधिक राज्यातील प्रदेशाध्यक्षांना डच्चू देत नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. त्याशिवाय काँग्रेस कार्यकारणी समितीतही बदल होणार आहे. अनेकांच्या खांद्यावर २०२४ ची जबाबदारी देण्यात येणार आहे. 

२०२४ ची निवडणूक काँग्रेससाठी महत्त्वाची का?२०२४ ची लोकसभा निवडणूक काँग्रेससाठी स्वत:चं राजकीय अस्तित्व वाचवण्याची लढाई आहे. त्यामुळे काँग्रेस कोणत्याही प्रकारची राजकीय जोखीम घेऊ इच्छित नाही. काँग्रेस गेल्या ९ वर्षांपासून केंद्रातील सत्तेबाहेर असून देशातील केवळ चार राज्यांत स्वबळावर सत्तेत आहे, तर तीन राज्यांत त्यांचा मित्रपक्ष म्हणून समावेश आहे. अशा स्थितीत काँग्रेस तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत हरली आणि सत्तेत परत येऊ शकली नाही, तर त्यांचा राजकीय पाया टिकवणे कठीण होईल. त्यामुळे २०२३ मध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

काँग्रेस संघटनेतील बदलाची रूपरेषा तयारविधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस संघटनेत मोठे फेरबदल होणार आहेत, जेणेकरून २०२४ च्या निवडणुकीच्या रणधुमाळीत नव्या शैलीने आणि आक्रमकपणे उतरता यावे.काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षातील फेरबदलाची अंतिम यादी तयार केली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर, खरगे त्यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर नवी यादी जाहीर करतील. ज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष ते राज्य प्रभारी आणि CWC सदस्यांची नावे असतील.

यूपी ते महाराष्ट्रापर्यंत प्रदेशाध्यक्षांना डच्चूमल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह अन्य राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना डच्चू देण्याची तयारी केली आहे. याठिकाणी त्यांच्या जागी नवीन चेहरे पुढे आणण्याची रणनीती आहे. प्रदेशाध्यक्षपदी यूपीचे ब्रिजलाल खाबरी, दिल्लीचे अनिल चौधरी, छत्तीसगडचे मोहन करकम, पश्चिम बंगालचे अधीर रंजन चौधरी, राजस्थानचे गोविंद सिंग दोतासरा, महाराष्ट्राचे नाना पटोले, झारखंडचे राजेश ठाकूर, अरुणाचलचे नबाम तुकी, केरळचे सुराकरण हे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना डच्चू मिळू शकतो. त्यांच्या जागी काँग्रेसने नव्या चेहऱ्यांकडे कमान सोपवण्याची तयारी केली आहे.

यूपीमध्ये काँग्रेस अजय राय, महाराष्ट्रात अशोक चव्हाण यांसारख्या बड्या चेहऱ्यांवर जबाबदारी सोपवू शकतात. याशिवाय बंगालमध्ये काँग्रेस अधीर रंजन चौधरी यांच्या हातून पद काढून घेत ममता यांच्याशी समन्वय साधण्याची रणनीती आहे. ममता बॅनर्जींसोबत अधीर रंजनचा छत्तीस आकडा आहे. २०२४ मध्ये विरोधी पक्षांची एकजूट आणि ममता बॅनर्जी यांच्यासोबत समतोल साधण्यासाठी काँग्रेस अधीर रंजन यांच्या जागी नवीन चेहऱ्याला संधी देणार आहेत. 

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे