शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

पुढील १५ दिवसांत काँग्रेस पक्षसंघटनेत होणार मोठा बदल?; मल्लिकार्जुन खरगेंनी तयार केली यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 19:13 IST

२०२४ ची लोकसभा निवडणूक काँग्रेससाठी स्वत:चं राजकीय अस्तित्व वाचवण्याची लढाई आहे. त्यामुळे काँग्रेस कोणत्याही प्रकारची राजकीय जोखीम घेऊ इच्छित नाही

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुका आता ११ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसने सत्तेची रणनीती आणि पक्षीय संघटना मजबूत करण्याकडे भर दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे २०२४ निवडणुकीपूर्वी संघटनेत मोठे फेरबदल करण्याची शक्यता आहे. त्यात निम्म्याहून अधिक राज्यातील प्रदेशाध्यक्षांना डच्चू देत नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. त्याशिवाय काँग्रेस कार्यकारणी समितीतही बदल होणार आहे. अनेकांच्या खांद्यावर २०२४ ची जबाबदारी देण्यात येणार आहे. 

२०२४ ची निवडणूक काँग्रेससाठी महत्त्वाची का?२०२४ ची लोकसभा निवडणूक काँग्रेससाठी स्वत:चं राजकीय अस्तित्व वाचवण्याची लढाई आहे. त्यामुळे काँग्रेस कोणत्याही प्रकारची राजकीय जोखीम घेऊ इच्छित नाही. काँग्रेस गेल्या ९ वर्षांपासून केंद्रातील सत्तेबाहेर असून देशातील केवळ चार राज्यांत स्वबळावर सत्तेत आहे, तर तीन राज्यांत त्यांचा मित्रपक्ष म्हणून समावेश आहे. अशा स्थितीत काँग्रेस तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत हरली आणि सत्तेत परत येऊ शकली नाही, तर त्यांचा राजकीय पाया टिकवणे कठीण होईल. त्यामुळे २०२३ मध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

काँग्रेस संघटनेतील बदलाची रूपरेषा तयारविधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस संघटनेत मोठे फेरबदल होणार आहेत, जेणेकरून २०२४ च्या निवडणुकीच्या रणधुमाळीत नव्या शैलीने आणि आक्रमकपणे उतरता यावे.काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षातील फेरबदलाची अंतिम यादी तयार केली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर, खरगे त्यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर नवी यादी जाहीर करतील. ज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष ते राज्य प्रभारी आणि CWC सदस्यांची नावे असतील.

यूपी ते महाराष्ट्रापर्यंत प्रदेशाध्यक्षांना डच्चूमल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह अन्य राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना डच्चू देण्याची तयारी केली आहे. याठिकाणी त्यांच्या जागी नवीन चेहरे पुढे आणण्याची रणनीती आहे. प्रदेशाध्यक्षपदी यूपीचे ब्रिजलाल खाबरी, दिल्लीचे अनिल चौधरी, छत्तीसगडचे मोहन करकम, पश्चिम बंगालचे अधीर रंजन चौधरी, राजस्थानचे गोविंद सिंग दोतासरा, महाराष्ट्राचे नाना पटोले, झारखंडचे राजेश ठाकूर, अरुणाचलचे नबाम तुकी, केरळचे सुराकरण हे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना डच्चू मिळू शकतो. त्यांच्या जागी काँग्रेसने नव्या चेहऱ्यांकडे कमान सोपवण्याची तयारी केली आहे.

यूपीमध्ये काँग्रेस अजय राय, महाराष्ट्रात अशोक चव्हाण यांसारख्या बड्या चेहऱ्यांवर जबाबदारी सोपवू शकतात. याशिवाय बंगालमध्ये काँग्रेस अधीर रंजन चौधरी यांच्या हातून पद काढून घेत ममता यांच्याशी समन्वय साधण्याची रणनीती आहे. ममता बॅनर्जींसोबत अधीर रंजनचा छत्तीस आकडा आहे. २०२४ मध्ये विरोधी पक्षांची एकजूट आणि ममता बॅनर्जी यांच्यासोबत समतोल साधण्यासाठी काँग्रेस अधीर रंजन यांच्या जागी नवीन चेहऱ्याला संधी देणार आहेत. 

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे