शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

नव्या वर्षात गोव्यातील आघाडी सरकारसमोर म्हादई, नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाचे मोठे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2017 13:18 IST

पणजी : नव्या वर्षात गोव्यातील भाजप आघाडी सरकारसमोर म्हादईचा प्रश्न धसास लावणे तसेच नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला होत असलेल्या वाढत्या विरोधाचा सामना करणे ही मोठी आव्हान आहेत.

पणजी : नव्या वर्षात गोव्यातील भाजप आघाडी सरकारसमोर म्हादईचा प्रश्न धसास लावणे तसेच नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला होत असलेल्या वाढत्या विरोधाचा सामना करणे ही मोठी आव्हान आहेत. म्हादईचे पाणी कर्नाटकला देण्याबाबत बोलणी करण्याची तयारी पर्रीकर सरकारने दाखवल्याने येथील जनमानसात तीव्र नाराजी आहे आणि या प्रश्नावर बिगर शासकीय संघटनाही एकवटल्या आहेत.झुवारी, मांडवी, शापोरा, साळ, म्हापसा, कुंभारजुवें या सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यास जोरदार विरोध होत आहे. राष्ट्रीयीकरण झाल्यास नद्यांवरील हक्क केंद्र सरकारकडे जातील. किनारी कोणतेही बांधकाम करायचे झाल्यास केंद्राकडे धांव घ्यावी लागेल, अशी भीती लोकांमध्ये आहेत. म्हादईचे पाणी कर्नाटकला देण्याच्या प्रश्नावर बोलणीसाठी तयारी दर्शविणारे पत्र मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कर्नाटकचे भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस.येडियुराप्पा यांना पाठवल्यानंतर येथील लोकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. वरील दोन महत्त्वाच्या प्रश्नांबरोबर आघाडी सरकारसमोर अनेक आव्हानेही आहेत.मांडवी नदीतून कसिनो हटविणे हेही आणखी एक आव्हान सरकारसमोर आहे. २0३0 च्या नियोजित प्रादेशिक आराखड्याच्यादृष्टिने स्पष्ट भू वापर धोरण तयार करणे, लोकांना माफक दारत घरे उपलब्ध करुन देणे ही आव्हानेही आहेत. २0१९ साली होणार असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला या सर्व आव्हानांना तोंड देण्याबरोबरच हे प्रश्न धसास लावावे लागतील. सरकारी नोकर भरतीच्याबाबतीत असलेल्या संथगतीबद्दल खुद्द काही सत्ताधारी आमदारही नाराज आहेत. नोकºयांचा प्रश्न निकालात काढणे हेही सरकारसमोर आव्हान असेल.भाजप, मगोप, गोवा फॉरवर्ड व अपक्षांचे मिळून स्थापन झालेल्या या आघाडी सरकारने किमान समान कार्यक्रमातील काही आश्वासनांची पूर्तता केलेली आहे. कृषी कूळ कायद्यात लोकभावनेची कदर करुन केलेली फेरदुरुस्ती, माडाला राज्य वृक्ष म्हणून दर्जा देणे, गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने मंजूर केलेल्या सर्व प्रकल्पांचा फेरआढावा, शाळांमध्ये मूल्याधारित शिक्षण, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, गृह आधार, लाडली लक्ष्मी, दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना यांचा फेराआढावा आदी बाबींचा यात समावेश आहे तसेच कालबध्द सेवा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीही पावले उचलली आहेत.