शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

लालूप्रसाद यादव यांना मोठा धक्का, पाच आमदारांनी पक्ष सोडला, उपाध्यक्षांनी राजीनामा दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 14:21 IST

आज पाच आमदारांनी राष्ट्रीय जनता दलाला सोडचिठ्ठी दिल्याने तसेच उपाध्यक्षांनी राजीनामा दिल्याने लालूंना मोठा धक्का बसला आहे.

ठळक मुद्देराजदच्या विधान परिषदेतील पाच आमदारांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली ज्येष्ठ नेते आणि राजदचे उपाध्यक्ष रधुवंश प्रसाद सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला राजदमधील घराणेशाही आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वामुळे हे नेते होते त्रस्त

पाटणा - बिहार विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आल्याने सध्या राजकीय वातावरण हळुहळू तापू लागले आहे. दरम्यान, राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र आज पाच आमदारांनी राष्ट्रीय जनता दलाला सोडचिठ्ठी दिल्याने तसेच उपाध्यक्षांनी राजीनामा दिल्याने लालूंना मोठा धक्का बसला आहे.

राजदच्या विधान परिषदेतील पाच आमदारांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तसेच ज्येष्ठ नेते आणि राजदचे उपाध्यक्ष रधुवंश प्रसाद सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संजय प्रसाद, कमरे आलम, राधाचरण सेठ, रणविजय सिंह आणि दिलीप राय या पाच आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती अवधेश नारायण सिंह यांनी याला दुजोरा दिला आहे. दरम्यान, हे पाचही नेते आता जेडीयूमध्ये प्रवेश करणार आहेत.  

राजीनामा देणारे सर्व आमदार हे लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच राष्ट्रीय जनता दलामध्ये सध्या सुरू असलेली घराणेशाही आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वामुळे हे नेते त्रस्त असल्याचे वृत्त आहे.  

बिहार विधानसभा निव़डणुकीपूर्वी बिहारच्या विधान परिषदेच्या ९ जागांसाठी ७ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आरजेडीकडून तेजप्रताप यादव यांना उमेदवार बनवण्यात येण्याची शक्यता आहे. सध्याच्या सदस्यसंख्येनुसार आरजेडीला नऊपैकी तीन जागांवर विजय मिळू शकतो. अशा परिस्थितीत तेजप्रताप यादव यांचा विजय निश्चित आहे. मात्र तेजप्रताप यादव यांना विधान परिषदेत पाठवण्याबाबत अनेक नेते नाराज आहेत. या नाराज नेत्यांमध्ये विधान परिषदेतील या पाच आमदारांचाही समावेश आहे.   

इतर महत्त्वाच्या बातम्या 

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

"आमची बांधिलकी जनतेशी, ती मातोश्री ते सिल्व्हर ओक अशा अस्वस्थ येरझाऱ्या घालत नाही"

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBiharबिहारPoliticsराजकारण