शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

लालूप्रसाद यादव यांना मोठा धक्का, पाच आमदारांनी पक्ष सोडला, उपाध्यक्षांनी राजीनामा दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 14:21 IST

आज पाच आमदारांनी राष्ट्रीय जनता दलाला सोडचिठ्ठी दिल्याने तसेच उपाध्यक्षांनी राजीनामा दिल्याने लालूंना मोठा धक्का बसला आहे.

ठळक मुद्देराजदच्या विधान परिषदेतील पाच आमदारांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली ज्येष्ठ नेते आणि राजदचे उपाध्यक्ष रधुवंश प्रसाद सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला राजदमधील घराणेशाही आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वामुळे हे नेते होते त्रस्त

पाटणा - बिहार विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आल्याने सध्या राजकीय वातावरण हळुहळू तापू लागले आहे. दरम्यान, राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र आज पाच आमदारांनी राष्ट्रीय जनता दलाला सोडचिठ्ठी दिल्याने तसेच उपाध्यक्षांनी राजीनामा दिल्याने लालूंना मोठा धक्का बसला आहे.

राजदच्या विधान परिषदेतील पाच आमदारांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तसेच ज्येष्ठ नेते आणि राजदचे उपाध्यक्ष रधुवंश प्रसाद सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संजय प्रसाद, कमरे आलम, राधाचरण सेठ, रणविजय सिंह आणि दिलीप राय या पाच आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती अवधेश नारायण सिंह यांनी याला दुजोरा दिला आहे. दरम्यान, हे पाचही नेते आता जेडीयूमध्ये प्रवेश करणार आहेत.  

राजीनामा देणारे सर्व आमदार हे लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच राष्ट्रीय जनता दलामध्ये सध्या सुरू असलेली घराणेशाही आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वामुळे हे नेते त्रस्त असल्याचे वृत्त आहे.  

बिहार विधानसभा निव़डणुकीपूर्वी बिहारच्या विधान परिषदेच्या ९ जागांसाठी ७ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आरजेडीकडून तेजप्रताप यादव यांना उमेदवार बनवण्यात येण्याची शक्यता आहे. सध्याच्या सदस्यसंख्येनुसार आरजेडीला नऊपैकी तीन जागांवर विजय मिळू शकतो. अशा परिस्थितीत तेजप्रताप यादव यांचा विजय निश्चित आहे. मात्र तेजप्रताप यादव यांना विधान परिषदेत पाठवण्याबाबत अनेक नेते नाराज आहेत. या नाराज नेत्यांमध्ये विधान परिषदेतील या पाच आमदारांचाही समावेश आहे.   

इतर महत्त्वाच्या बातम्या 

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

"आमची बांधिलकी जनतेशी, ती मातोश्री ते सिल्व्हर ओक अशा अस्वस्थ येरझाऱ्या घालत नाही"

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBiharबिहारPoliticsराजकारण