शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

लालूप्रसाद यादव यांना मोठा धक्का, पाच आमदारांनी पक्ष सोडला, उपाध्यक्षांनी राजीनामा दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 14:21 IST

आज पाच आमदारांनी राष्ट्रीय जनता दलाला सोडचिठ्ठी दिल्याने तसेच उपाध्यक्षांनी राजीनामा दिल्याने लालूंना मोठा धक्का बसला आहे.

ठळक मुद्देराजदच्या विधान परिषदेतील पाच आमदारांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली ज्येष्ठ नेते आणि राजदचे उपाध्यक्ष रधुवंश प्रसाद सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला राजदमधील घराणेशाही आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वामुळे हे नेते होते त्रस्त

पाटणा - बिहार विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आल्याने सध्या राजकीय वातावरण हळुहळू तापू लागले आहे. दरम्यान, राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र आज पाच आमदारांनी राष्ट्रीय जनता दलाला सोडचिठ्ठी दिल्याने तसेच उपाध्यक्षांनी राजीनामा दिल्याने लालूंना मोठा धक्का बसला आहे.

राजदच्या विधान परिषदेतील पाच आमदारांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तसेच ज्येष्ठ नेते आणि राजदचे उपाध्यक्ष रधुवंश प्रसाद सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संजय प्रसाद, कमरे आलम, राधाचरण सेठ, रणविजय सिंह आणि दिलीप राय या पाच आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती अवधेश नारायण सिंह यांनी याला दुजोरा दिला आहे. दरम्यान, हे पाचही नेते आता जेडीयूमध्ये प्रवेश करणार आहेत.  

राजीनामा देणारे सर्व आमदार हे लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच राष्ट्रीय जनता दलामध्ये सध्या सुरू असलेली घराणेशाही आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वामुळे हे नेते त्रस्त असल्याचे वृत्त आहे.  

बिहार विधानसभा निव़डणुकीपूर्वी बिहारच्या विधान परिषदेच्या ९ जागांसाठी ७ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आरजेडीकडून तेजप्रताप यादव यांना उमेदवार बनवण्यात येण्याची शक्यता आहे. सध्याच्या सदस्यसंख्येनुसार आरजेडीला नऊपैकी तीन जागांवर विजय मिळू शकतो. अशा परिस्थितीत तेजप्रताप यादव यांचा विजय निश्चित आहे. मात्र तेजप्रताप यादव यांना विधान परिषदेत पाठवण्याबाबत अनेक नेते नाराज आहेत. या नाराज नेत्यांमध्ये विधान परिषदेतील या पाच आमदारांचाही समावेश आहे.   

इतर महत्त्वाच्या बातम्या 

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

"आमची बांधिलकी जनतेशी, ती मातोश्री ते सिल्व्हर ओक अशा अस्वस्थ येरझाऱ्या घालत नाही"

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBiharबिहारPoliticsराजकारण