शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

काँग्रेसला मोठा धक्का! नेतृत्‍वावर प्रश्न उपस्थित करत 4 माजी मंत्र्यांसह अनेक नेत्यांचे राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 16:04 IST

सोनिया गांधींशिवाय या नेत्यांनी माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या प्रदेश प्रभारी रजनी पाटील यांनाही राजीनाम्याच्या प्रती पाठवल्या आहेत.

जम्मू :जम्मू-काश्मीरमध्येकाँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या सात नेत्यांनी एकाच वेळी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. हे सर्व नेते गुलाम नबी आझाद गटाचे असून पक्षनेतृत्व बदलाच्या निर्णयामुळे नाराज असल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर पक्षाशी संबंधित मुद्द्यांवर त्यांना आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली नाही, असा त्यांचा दावा आहे.

माजी मंत्री व आमदारांचा समावेश

हायकमांडकडे राजीनामे पाठवणाऱ्यांमध्ये चार माजी मंत्री आणि तीन आमदारांचा समावेश आहे. ते माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या जवळचे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या काँग्रेस नेत्यांच्या राजीनाम्याच्या काही दिवसांपूर्वी आझाद जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते.राजीनामा देणाऱ्या नेत्यांमध्ये जीएम सरोरी, जुगल किशोर शर्मा, विकार रसूल, नरेश कुमार गुप्ता, अन्वर भट यांचा समावेश आहे. सोनिया गांधींशिवाय या नेत्यांनी माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या प्रदेश प्रभारी रजनी पाटील यांनाही राजीनाम्याच्या प्रती पाठवल्या आहेत.

हायकमांड ऐकत नाही

आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या नेत्यांनी प्रदेश काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधी वृत्तीमुळे हे पाऊल उचलले असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गुलाम अहमद मीर यांच्यावर निशाणा साधला आहे. माजी उपमुख्यमंत्री तारा चंद यांच्यासह आझाद यांच्या जवळच्या काही नेत्यांनी राजीनामा दिलेल्या नेत्यांपासून दुरावल्याचेही सूत्रांनी सांगितले. या नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्यात म्हटले की, त्यांनी त्यांच्या प्रश्नांकडे पक्षप्रमुखांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना वेळ देण्यात आला नाही. गेल्या वर्षभरापासून पक्षनेतृत्वाकडे भेटीची वेळ मागितली होती, मात्र त्यांना वेळ देण्यात आला नसल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे.

पक्षाची अवस्था बिकट

मीर यांची खिल्ली उडवत ते म्हणाले की, मीर यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष अत्यंत दयनीय स्थितीकडे वाटचाल करत आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी राजीनामा देऊन इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आहे, परंतु काहींनी मौन बाळगण्याचा निर्णय घेतलाय. जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेसच्या कारभारावर काही नेत्यांनी कब्जा केल्याचा आरोपही त्यांनी केला. सूत्रांनी सांगितले की, काँग्रेस हायकमांडने आधीच स्पष्ट केले आहे की, कोणत्याही समस्यांचे पक्षीय व्यवस्थेनुसार निराकरण केले जाईल आणि माध्यमांद्वारे काहीही होणार नाही. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, या नेत्यांनी पक्षाच्या हायकमांडला लक्ष्य केल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी