शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का; आणखी एका माजी मुख्यमंत्र्याने पक्ष सोडला, भाजपमध्ये जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 19:49 IST

काँग्रेस नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर आता गोवा विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ फक्त तीनवर आले आहे.

गोवा: मागील काही महिन्यांपासून गोव्यात काँग्रेसला गळती लागलेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लुइजिन्हो फेलेरो यांनी काँग्रसमधून राजीनामा देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले होते. त्यानंतर आता आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसमधून फारकत घेतली आहे.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते रवी नाईक(ravi naik) यांनी मंगळवारी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. रवी नायक पोंडा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. रवी नाईक यांनी आज गोवा विधानसभा अध्यक्ष राजेश पाटनेकर यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता 40 सदस्य संख्या असलेल्या गोवा विधानसभेत 37 आमदार राहिले आहेत. तर काँग्रेसचे संख्याबळ तीनवर आले आहे. दरम्यान, रवी नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

पुढील वर्षी गोव्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रसने गोवा विधानसभा लढवण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लुइजिन्हो फेलेरो यांनी सप्टेंबर महिन्यात आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

पक्षाच्या कामगिरीवर टीकापक्षाला सोडचिट्ठी दिल्यानंतर फेलेरो यांनी पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. गोव्यात काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असूनही काँग्रेसचे सरकार स्थापन होऊ शकले नाही, याला दिग्विजय सिंह जबाबदार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. तसेच, फेलेरोंनी पत्रात गोवा काँग्रेसच्या अनेक बाबी उघड केल्यामुळे पक्षातील अंतर्गत कलह समोर आला होता.

टॅग्स :congressकाँग्रेसgoaगोवा