शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

उत्तर प्रदेशात बसपाला मोठा धक्का, हरिशंकर तिवारी सहकुटुंब करणार समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 09:58 IST

Uttar Pradesh Vidhan sabha Election 20022: उत्तर प्रदेशमधील पूर्वांचलमध्ये BSPला मोठा धक्का बसला आहे. पूर्वांचलच्या राजकारणातील ब्राह्मण चेहरा म्हणून ओखळ असलेल्या Harishankar Tiwari यांचे कुटुंब आज Samajwadi Partyमध्ये प्रवेश करणार आहेत.

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना सर्वच राजकीय पक्षांमध्या आयाराम, गयारामांची ये जा सुरू झाली आहे. याचदरम्यान, उत्तर प्रदेशमधील पूर्वांचलमध्ये बसपाला मोठा धक्का बसला आहे. पूर्वांचलच्या राजकारणातील ब्राह्मण चेहरा म्हणून ओखळ असलेल्या हरिशंकर तिवारी यांचे कुटुंब आज समाजवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. हरिशंकर तिवारी यांचे दोन्ही पुत्र विनय शंकर आणि कुशल तिवारी हे लखनौमध्ये दाखल झाले आहेत. त्याशिवाय संत कबीरनगर-खलिलाबाद येथील भाजपा आमदार दिग्विजय नारायण चौबे ऊर्फ जय चौबे, करनैलगंज येथून भाजपा उमेदवार असलेले संतोष तिवारी, विधान परिषदेचे माजी सभापती गणेश शंकर पांडे आणि कुशीनगर येथील भाजपा खासदारांचे पुतणे हेसुद्धा आज समाजवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.

गोरखपूरच्या शेजारी असलेल्या बस्ती परिसरात मतांचे समिकरण बांधण्यासाठी आणि भाजपाला धक्का देण्यासाठी दिग्विजय नारायण चौबे यांना सपामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तर हरिशंकत तिवारी यांचा धाकटा मुलगा आमदारा विनयशंकर तिवारी, मोठा मुलगा आणि माजी खासदार कुशल तिवारी आणि भाचा गणेशशंकर पांडे आज समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहे. ब्राह्मण विरुद्ध ठाकूर राजकारणामध्ये हरिशंकर तिवारी यांचे कुटुंब समाजवादी पक्षात दाखल झाल्याने पूर्वांचलमधील राजकीय समिकरणे बदलणार आहेत. हा भाग ब्राह्मण बहुल असून, हरिशंकर तिवारी पूर्वांचलमधील सर्वात मोठा ब्राह्मण चेहरा आहे.

उत्तर प्रदेशमध्ये ठाकूर आणि ब्राह्मणांमध्ये वर्चस्वाची लढाई ही गोरखपूरमधूनच सुरू झाली होती. वीरेंद्र शाही आणि हरिशंकर तिवारी यांच्यादरम्यानच्या लढाईमुळे पूर्वांचलच्या राजकारणामध्ये दबंग नेत्यांसाठी दरवाजे उघडले होते. हरिशंकत तिवारी चिल्लूपार विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा आमदार राहिले आहेत. मात्र २००७ मध्ये येथे त्यांचा पराभव झाला होता. हरिशंकर तिवारी कल्याण सिंह, राजनाथ सिंह आणि मुलायम सिंह यादव यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री राहिले होते. या ब्राह्मण कुटुंबाचा समाजवादी पक्षामधील प्रवेश हा बसपासाठी धक्का आहेच, सोबतच भाजपासाठीही मोठे आव्हान आहे. कारण ब्राह्मणांच्या नाराजीचा मुद्दा योगी सरकारमध्ये तापलेला आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी