शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

BHU मध्ये नीता अंबानींची प्राध्यापक म्हणून नियुक्ती?; रिलायन्सने सांगितलं मेसेजमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 11:17 IST

Relinace Nita Ambani : नीता अंबानींची BHU मध्ये विझिटिंग प्रोफेसर म्हणून नियुक्ती केल्याचं काही ठिकाणी प्रकाशित झालं होतं वृत्त

ठळक मुद्देनीता अंबानींची BHU मध्ये विझिटिंग प्रोफेसर म्हणून नियुक्ती केल्याचं काही ठिकाणी प्रकाशित झालं होतं वृत्तया वृत्तानंतर विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता विरोध

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी आपल्याला बनारस हिंदू विद्यापीठात (BHU) प्राध्यापक म्हणून नियुक्त केल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. हे वृत्त खोटं असल्याचं रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं. तसंच यासाठी कोणताही प्रस्ताव मिळाला नसल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं. "बनारस हिंदू विद्यापीठात विझिटिंग प्रोफेसर बनवल्या जाण्याचं वृत्त हे बनावट आहे. नीता अंबानी यांना विद्यापीठातून असा कोणताही प्रस्ताव मिळाला नाही," अशी माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्यांनी एएनआयशी बोलताना दिली. बनारस हिंदू विद्यापीठात सामाजिक विद्यान विभागाकडून नीता अंबानी यांना विझिटिंग प्रोफेसर म्हणून नियुक्तीचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचं वृत्त काही माध्यमांतून प्रकाशित झालं होतं. परंतु याचं रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्यांनी खंडन केलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी मुंबई विद्यापीठातून आपलं बी.कॉमचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांची २०१४ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. नीता अंबनी यांनी २०१० मध्ये रिलायन्स फाऊंडेशनची स्थापना केली होती. दरम्यान, एक यशस्वी उद्योजिका म्हणून बनारस हिंदू विद्यापीठानं त्यांना हा प्रस्ताव दिल्याचं म्हटलं जात होतं.विद्यार्थ्यांकडून विरोधनीता अंबानी यांना बनारस हिंदू विद्यापीठात विझिटिंग प्रोफेसर म्हणून नियुक्त केल्याचं वृत्त समजल्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठात विरोध करण्यास सुरूवात केली होती. याशिवाय विद्यार्थ्यांनी कुलगुरूंवर बीएचयू उद्योजकांच्या इशाऱ्यावर चालवत असल्याचाही आरोप केला. तसंच त्यांच्यावर कारवाईची मागणीही केली होती. त्यानंतर कुलगुरूंच्या निर्देशांवरून सामाजिक विज्ञान विभागाचे प्रमुख कौशल किशोर मिश्र हे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी बाहेर आले होते. परंतु विद्यार्थी कुलगुरूंशीच चर्चा करण्यावर ठाम होते. कुलपतींनी यावर बाहेर येऊन चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचं पत्र विभाग प्रमुखांकडे सोपवलं होतं. 

टॅग्स :nita ambaniनीता अंबानीRelianceरिलायन्सStudentविद्यार्थी