शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

BHU मध्ये नीता अंबानींची प्राध्यापक म्हणून नियुक्ती?; रिलायन्सने सांगितलं मेसेजमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 11:17 IST

Relinace Nita Ambani : नीता अंबानींची BHU मध्ये विझिटिंग प्रोफेसर म्हणून नियुक्ती केल्याचं काही ठिकाणी प्रकाशित झालं होतं वृत्त

ठळक मुद्देनीता अंबानींची BHU मध्ये विझिटिंग प्रोफेसर म्हणून नियुक्ती केल्याचं काही ठिकाणी प्रकाशित झालं होतं वृत्तया वृत्तानंतर विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता विरोध

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी आपल्याला बनारस हिंदू विद्यापीठात (BHU) प्राध्यापक म्हणून नियुक्त केल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. हे वृत्त खोटं असल्याचं रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं. तसंच यासाठी कोणताही प्रस्ताव मिळाला नसल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं. "बनारस हिंदू विद्यापीठात विझिटिंग प्रोफेसर बनवल्या जाण्याचं वृत्त हे बनावट आहे. नीता अंबानी यांना विद्यापीठातून असा कोणताही प्रस्ताव मिळाला नाही," अशी माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्यांनी एएनआयशी बोलताना दिली. बनारस हिंदू विद्यापीठात सामाजिक विद्यान विभागाकडून नीता अंबानी यांना विझिटिंग प्रोफेसर म्हणून नियुक्तीचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचं वृत्त काही माध्यमांतून प्रकाशित झालं होतं. परंतु याचं रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्यांनी खंडन केलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी मुंबई विद्यापीठातून आपलं बी.कॉमचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांची २०१४ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. नीता अंबनी यांनी २०१० मध्ये रिलायन्स फाऊंडेशनची स्थापना केली होती. दरम्यान, एक यशस्वी उद्योजिका म्हणून बनारस हिंदू विद्यापीठानं त्यांना हा प्रस्ताव दिल्याचं म्हटलं जात होतं.विद्यार्थ्यांकडून विरोधनीता अंबानी यांना बनारस हिंदू विद्यापीठात विझिटिंग प्रोफेसर म्हणून नियुक्त केल्याचं वृत्त समजल्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठात विरोध करण्यास सुरूवात केली होती. याशिवाय विद्यार्थ्यांनी कुलगुरूंवर बीएचयू उद्योजकांच्या इशाऱ्यावर चालवत असल्याचाही आरोप केला. तसंच त्यांच्यावर कारवाईची मागणीही केली होती. त्यानंतर कुलगुरूंच्या निर्देशांवरून सामाजिक विज्ञान विभागाचे प्रमुख कौशल किशोर मिश्र हे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी बाहेर आले होते. परंतु विद्यार्थी कुलगुरूंशीच चर्चा करण्यावर ठाम होते. कुलपतींनी यावर बाहेर येऊन चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचं पत्र विभाग प्रमुखांकडे सोपवलं होतं. 

टॅग्स :nita ambaniनीता अंबानीRelianceरिलायन्सStudentविद्यार्थी