शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 11:14 IST

Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे समरीनसाठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील समरीन सध्या एका मोठ्या संकटाचा सामना करत आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे समरीनसाठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण तिची दोन लहान मुलं (सव्वा वर्षांची मुलगी जुनेरा आणि ६ वर्षांचा मुलगा शाझिल) पाकिस्तानी आहेत आणि समरीनचा पाकिस्तानी व्हिसाचा कालावधी संपला आहे.

समरीनचं लग्न ७ वर्षांपूर्वी पाकिस्तानातील सद्दामशी झालं होतं. तिच्या आईचे अनेक नातेवाईक कराची आणि इतर ठिकाणी राहतात, त्यामुळे तिचं लग्न पाकिस्तानात ठरलं. समरीन तिच्या दोन्ही मुलांसोबत पहिल्यांदाच भारतात आली होती जेणेकरून ते त्यांच्या आजीला भेटू शकतील. ती जवळपास दोन महिने भारतात आहे. तिचा पासपोर्ट डिसेंबर २०२५ मध्ये संपणार होता, तो रिन्यू करण्याच्या आणि पाकिस्तानी व्हिसाचं एक्सटेन्शन करण्याच्या प्रोसेसमध्ये होती. पण पहलगाम हल्ल्यानंतर परिस्थितीच बदलली.

दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

"इतकी लहान मुलं त्यांच्या आईपासून कशी दूर राहतील?"

'आज तक'शी बोलताना समरीन म्हणाली, "मी सहा वर्षांनी भारतात परतली आहे. मी माझ्या मुलांना पहिल्यांदाच त्यांच्या आजीला भेटण्यासाठी सोबत आणलं होतं. पण परिस्थिती इतकी बिकट होईल याची आम्हाला कल्पना नव्हती. आता असं म्हटलं जात आहे की, मुलांना परत जावं लागेल. हे माझ्यासाठी खूप वेदनादायक आहे. माझी तब्येत ठीक नाही आणि मुलंही आजारी आहेत. त्यांना एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य आहे. इतकी लहान मुलं त्यांच्या आईपासून कशी दूर राहतील?"

 हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल

"माझे पती दुबईमध्ये आहेत”

पाकिस्तानी व्हिसाची मुदत संपली आहे आणि सध्याच्या परिस्थितीत नवीन व्हिसा मिळणं कठीण वाटत आहे. पाकिस्तानमध्ये आमच्या घरी कोणी नाही, फक्त माझी आजारी आणि वृद्ध सासू आहे. माझे पती दुबईमध्ये आहेत. त्यामुळे तिथे मुलांची काळजी कोण घेईल? मी मुलांच्या व्हिसा एक्सटेंशनसाठी अर्ज केला होता, पण तो फेटाळण्यात आला आहे. मी मानवतेच्या आधारावर माझ्या मुलांचा व्हिसा वाढवण्याची सरकारला विनंती करते."

"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना

“पहलगाममध्ये घडलेली घटना निंदनीय, दोषींना शिक्षा झाली पाहिजे”

समरीनने असंही म्हटलं आहे की, तिने पाकिस्तानी नागरिकत्व घेतलं नाही कारण त्यामुळे भारतात परतणं कठीण झालं असतं. ती तिथे व्हिसा एक्सटेंशनवर राहत होती. आता भारतात परतण्यासाठी तिने एक्झिट परमिट आणि एक्सटेंशन घेतलं होतं, पण परत जाण्यासाठी नवीन व्हिसा आवश्यक आहे, जो आता मिळणं कठीण झालं आहे. "माझी फक्त एवढीच इच्छा आहे की, माझी मुलं माझ्यापासून वेगळी होऊ नयेत. पहलगाममध्ये घडलेली घटना निंदनीय आहे आणि दोषींना शिक्षा झाली पाहिजे. पण यासाठी सामान्य लोकांना का शिक्षा दिली जात आहे?" असा सवालही समरीनने केला आहे.  

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतterroristदहशतवादी