शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 11:14 IST

Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे समरीनसाठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील समरीन सध्या एका मोठ्या संकटाचा सामना करत आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे समरीनसाठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण तिची दोन लहान मुलं (सव्वा वर्षांची मुलगी जुनेरा आणि ६ वर्षांचा मुलगा शाझिल) पाकिस्तानी आहेत आणि समरीनचा पाकिस्तानी व्हिसाचा कालावधी संपला आहे.

समरीनचं लग्न ७ वर्षांपूर्वी पाकिस्तानातील सद्दामशी झालं होतं. तिच्या आईचे अनेक नातेवाईक कराची आणि इतर ठिकाणी राहतात, त्यामुळे तिचं लग्न पाकिस्तानात ठरलं. समरीन तिच्या दोन्ही मुलांसोबत पहिल्यांदाच भारतात आली होती जेणेकरून ते त्यांच्या आजीला भेटू शकतील. ती जवळपास दोन महिने भारतात आहे. तिचा पासपोर्ट डिसेंबर २०२५ मध्ये संपणार होता, तो रिन्यू करण्याच्या आणि पाकिस्तानी व्हिसाचं एक्सटेन्शन करण्याच्या प्रोसेसमध्ये होती. पण पहलगाम हल्ल्यानंतर परिस्थितीच बदलली.

दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

"इतकी लहान मुलं त्यांच्या आईपासून कशी दूर राहतील?"

'आज तक'शी बोलताना समरीन म्हणाली, "मी सहा वर्षांनी भारतात परतली आहे. मी माझ्या मुलांना पहिल्यांदाच त्यांच्या आजीला भेटण्यासाठी सोबत आणलं होतं. पण परिस्थिती इतकी बिकट होईल याची आम्हाला कल्पना नव्हती. आता असं म्हटलं जात आहे की, मुलांना परत जावं लागेल. हे माझ्यासाठी खूप वेदनादायक आहे. माझी तब्येत ठीक नाही आणि मुलंही आजारी आहेत. त्यांना एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य आहे. इतकी लहान मुलं त्यांच्या आईपासून कशी दूर राहतील?"

 हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल

"माझे पती दुबईमध्ये आहेत”

पाकिस्तानी व्हिसाची मुदत संपली आहे आणि सध्याच्या परिस्थितीत नवीन व्हिसा मिळणं कठीण वाटत आहे. पाकिस्तानमध्ये आमच्या घरी कोणी नाही, फक्त माझी आजारी आणि वृद्ध सासू आहे. माझे पती दुबईमध्ये आहेत. त्यामुळे तिथे मुलांची काळजी कोण घेईल? मी मुलांच्या व्हिसा एक्सटेंशनसाठी अर्ज केला होता, पण तो फेटाळण्यात आला आहे. मी मानवतेच्या आधारावर माझ्या मुलांचा व्हिसा वाढवण्याची सरकारला विनंती करते."

"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना

“पहलगाममध्ये घडलेली घटना निंदनीय, दोषींना शिक्षा झाली पाहिजे”

समरीनने असंही म्हटलं आहे की, तिने पाकिस्तानी नागरिकत्व घेतलं नाही कारण त्यामुळे भारतात परतणं कठीण झालं असतं. ती तिथे व्हिसा एक्सटेंशनवर राहत होती. आता भारतात परतण्यासाठी तिने एक्झिट परमिट आणि एक्सटेंशन घेतलं होतं, पण परत जाण्यासाठी नवीन व्हिसा आवश्यक आहे, जो आता मिळणं कठीण झालं आहे. "माझी फक्त एवढीच इच्छा आहे की, माझी मुलं माझ्यापासून वेगळी होऊ नयेत. पहलगाममध्ये घडलेली घटना निंदनीय आहे आणि दोषींना शिक्षा झाली पाहिजे. पण यासाठी सामान्य लोकांना का शिक्षा दिली जात आहे?" असा सवालही समरीनने केला आहे.  

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतterroristदहशतवादी