शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

भीमा-कोरेगाव हिंसाचार : तपासाची केस डायरी सुप्रीम कोर्टाने मागविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 04:37 IST

भीमा-कोरेगाव येथील हिंसाचारास चिथावणी दिल्याच्या आरोपावरून देशाच्या विविध भागांतून पुणे पोलिसांनी अटक केलेल्या पाच प्रमुख मानवी हक्क कार्यकर्त्यांना सोडून द्यावे, यासाठीच्या याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राखून ठेवला.

नवी दिल्ली : भीमा-कोरेगाव येथील हिंसाचारास चिथावणी दिल्याच्या आरोपावरून देशाच्या विविध भागांतून पुणे पोलिसांनी अटक केलेल्या पाच प्रमुख मानवी हक्क कार्यकर्त्यांना सोडून द्यावे, यासाठीच्या याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राखून ठेवला.या पाचजणांविरुद्ध अटक करण्याएवढा सबळ पुरावा आहे का, याची तपासणी करण्याच्या अनुषंगाने सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे गेले दोन दिवस सविस्तर युक्तिवाद झाले. त्यानंतर निकाल राखून ठेवला गेला. तोपर्यंत पाचहीजण त्यांच्या घरात नजरकैदेत राहतील, असे न्यायालयाने सांगितले. याचिकाकर्त्यांच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी व आनंद ग्रोव्हर या ज्येष्ठ वकिलांनी या आरोपींवरील आरोप हे निव्वळ कुभांड आहे, हे सूत्र पकडून युक्तिवाद केला. पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यात कसा दम नाही, हे दाखविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महाराष्ट्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता व मूळ फिर्यादी तुषार दामगुडे यांच्यासाठी ज्येष्ठ वकील हरीष साळवे यांनी युक्तिवाद केला व या आरोपींचा एका व्यापक गंभीर कटाशी संबंध असल्याचा ठाम दावा केला.या पाच जणांचा ताबा देऊन पोलिसांना तपास करू द्या व अटकेची योग्यायोग्यता खालच्या न्यायालयांना ठरवू द्या, असे त्यांचे आग्रही प्रतिपादन होते.>दोघे न्यायाधीश मराठीमुळात भीमा-कोरेगाव येथील हिंसाचारापासून सुरु झालेला हा तपास सरकार उलथून टाकण्याच्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कथित कटापर्यंत कसा पोहोचला, हे तपासाच्या कागदांवरून कुठेच दिसत नाही. त्यामुळे हे सर्व कुभांड असल्याचा बळकटी मिळते, यावर याचिकाकर्त्यांचा भर होता. त्या अनुषंगाने सुनावणी संपल्यावर न्यायालयाने या तपासाची संपूर्ण केस डायरी सादर करण्याचे निर्देश दिले. हे सर्व कागद मराठीत असतील, असा मुद्दा निघाला; परंतु खंडपीठावरील दोन न्यायाधीश मराठी असल्याने याची अडचण येणार नाही, असे ठरले.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय