शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

भीमा-कोरेगाव : तेलतुंबडेंच्या सुटकेविरुद्ध सरकार सुप्रीम कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 07:12 IST

भीमा-कोरेगावप्रकरणी अटक : अंतरिम संरक्षण नेमके केव्हा संपल्याचा मुद्दा

नवी दिल्ली : भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी अटक केलेले मानवाधिकार कार्यकर्ते प्रा. आनंद तेलतुंबडे यांना सोडून देण्याच्या पुणे सत्र न्यायालयाच्या गेल्या फेब्रुवारीमधील आदेशाविरुद्ध महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केलीआहे.

न्या. अरुण मिश्रा व न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने याचिका दाखल करण्यास झालेला विलंब क्षमापित करून तेलतुंबडे यांना नोटीस जारी केली आणि पुढील सुनावणी तीन आठवड्यांनी ठेवली. अटकेची शक्यता लक्षात घेऊन तेलतुंबडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, तेव्हा त्यांना अटकेपासून चार आठवडे संरक्षण देणारा आदेश त्या न्यायालयाने यंदाच्या १४ जानेवारी रोजी दिला होता. या चार आठवड्यांच्या काळात तेलतुंबडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर लगेचच २ फेब्रुवारीच्या पहाटे पुणे पोलिसांनी तेलतुंबडे यांनी मुंबई विमानतळावरून अटक केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेली चार आठवड्यांची मुदत संपण्याच्या आधीच केलेल्या या अटकेविरुद्ध तेलतुंबडे यांनी दाद मागितली असता पुणे न्यायालयाने ती अटक बेकायदा ठरवून त्यांना लगेच सोडून देण्याचा आदेश दिला. मुदत संपण्याआधी अटक करणे हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असल्याचेही त्या न्यायालयाने म्हटले होते.जामिनासाठी होते संरक्षणराज्य सरकारने आता केलेल्या याचिकेत प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाने तेलतुंबडे यांना अटकेपासून दिलेले संरक्षण नेमके केव्हा संपल्याचे मानायला हवे, हा मुद्दा मांडला आहे. सरकारचे म्हणणे असे की, तेलतुंबडे यांना नियमित न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करता यावा यासाठी हे संरक्षण दिले गेले होते.चार आठवडे ही त्यासाठी दिलेली कमाल मर्यादा होती. त्याआधीच त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला गेल्यावर ते संरक्षणही त्याचवेळी संपुष्टात आले. एकदा अटकपूर्व जामीन फेटाळला गेल्यावरही ते संरक्षण त्यानंतरही सुरू राहीलच, असे मानणे चुकीचे आहे.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMumbaiमुंबई