शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
2
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
3
बँक, आधार ते GST पर्यंत..., आजपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; तुमच्या खिशावर अन् जीवनावर थेट परिणाम होणार!
4
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
5
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
6
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
7
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
8
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
9
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
10
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
11
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
12
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
13
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
14
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
15
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
16
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
17
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
18
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
19
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
20
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम

भीमा-कोरेगाव : तेलतुंबडेंच्या सुटकेविरुद्ध सरकार सुप्रीम कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 07:12 IST

भीमा-कोरेगावप्रकरणी अटक : अंतरिम संरक्षण नेमके केव्हा संपल्याचा मुद्दा

नवी दिल्ली : भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी अटक केलेले मानवाधिकार कार्यकर्ते प्रा. आनंद तेलतुंबडे यांना सोडून देण्याच्या पुणे सत्र न्यायालयाच्या गेल्या फेब्रुवारीमधील आदेशाविरुद्ध महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केलीआहे.

न्या. अरुण मिश्रा व न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने याचिका दाखल करण्यास झालेला विलंब क्षमापित करून तेलतुंबडे यांना नोटीस जारी केली आणि पुढील सुनावणी तीन आठवड्यांनी ठेवली. अटकेची शक्यता लक्षात घेऊन तेलतुंबडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, तेव्हा त्यांना अटकेपासून चार आठवडे संरक्षण देणारा आदेश त्या न्यायालयाने यंदाच्या १४ जानेवारी रोजी दिला होता. या चार आठवड्यांच्या काळात तेलतुंबडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर लगेचच २ फेब्रुवारीच्या पहाटे पुणे पोलिसांनी तेलतुंबडे यांनी मुंबई विमानतळावरून अटक केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेली चार आठवड्यांची मुदत संपण्याच्या आधीच केलेल्या या अटकेविरुद्ध तेलतुंबडे यांनी दाद मागितली असता पुणे न्यायालयाने ती अटक बेकायदा ठरवून त्यांना लगेच सोडून देण्याचा आदेश दिला. मुदत संपण्याआधी अटक करणे हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असल्याचेही त्या न्यायालयाने म्हटले होते.जामिनासाठी होते संरक्षणराज्य सरकारने आता केलेल्या याचिकेत प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाने तेलतुंबडे यांना अटकेपासून दिलेले संरक्षण नेमके केव्हा संपल्याचे मानायला हवे, हा मुद्दा मांडला आहे. सरकारचे म्हणणे असे की, तेलतुंबडे यांना नियमित न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करता यावा यासाठी हे संरक्षण दिले गेले होते.चार आठवडे ही त्यासाठी दिलेली कमाल मर्यादा होती. त्याआधीच त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला गेल्यावर ते संरक्षणही त्याचवेळी संपुष्टात आले. एकदा अटकपूर्व जामीन फेटाळला गेल्यावरही ते संरक्षण त्यानंतरही सुरू राहीलच, असे मानणे चुकीचे आहे.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMumbaiमुंबई