शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भीम आर्मीची दिल्लीत जोरदार निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 04:58 IST

संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद निसटले; पोलिसांच्या हातावर तुरी

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जामा मशिदीजवळ जोरदार निदर्शने केली. परवानगी नसतानाही निदर्शने केल्याबद्दल ताब्यात घेतलेले चंद्रशेखर आझाद पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटले. त्यांचा शोध सुरू आहे.

निदर्शने करणाऱ्या भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी हातात तिरंगी ध्वज घेतले होते. राज्यघटनेला वाचवा तसेच इन्किलाब झिंदाबाद अशा घोषणा ते देत होते. त्यातले काही जण सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा हे गाणे गात होते. जामा मशिदीच्या एक क्रमांकाच्या प्रवेशव्दाराजवळ जमा झालेल्या या निदर्शकांपैकी काही जणांच्या हाती डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कांशीराम, भगतसिंह यांची छायाचित्रे असलेले फलक होते. दिल्लीमध्ये लागू केलेले जमावबंदीचे आदेश मोडून हजारो विद्यार्थी, विरोधी पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनी रस्त्यावर उतरून गेल्या काही दिवसांत निदर्शने केली होती. तोेच कित्ता भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी गिरवला.

जमावबंदीचे आदेश झुगारुन निदर्शने केल्याच्या आरोपावरून अटक केलेले भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना जामा मशिदीच्या जवळ पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तिथे यश न आल्यामुळे दर्यागंज भागामध्ये पुन्हा त्यांना पकडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र त्यांच्या हातावर तुरी देऊन चंद्रशेखर आझाद तिथून निसटले असे भीम आर्मीच्या सूत्रांनी सांगितले. मात्र पोलिसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही.

४८ जणांना अटकगुजरातमधील अहमदाबाद शहरातील शहा-ए-आलम भागात गुरुवारी झालेल्या निदर्शनांनी हिंसक वळण घेतले होते. या प्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक शहजाद खान पठाण व ४८ जणांना अटक करण्यात आली आहे. शहजाद खान पठाण यांनी जमावाला भडकाविण्याचा प्रयत्न केला असाही त्यांच्यावर आरोप आहे. निदर्शकांनी केलेल्या दगडफेकीत दोन पोलीस अधिकाऱ्यांसह २६ पोलीस जखमी झाले होते.

नव्याने घुसखोरी होणार नाही : सोनोवालनागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे बांगलादेशमधून नव्याने घुसखोरी होण्यास प्रोत्साहन मिळणार नाही. या कायद्याचा आधार घेऊन बांगलादेशमधील एकही व्यक्ती आसाममध्ये येणार नाही असे आसामचे मुख्यमंत्री सवर्नंद सोनोवाल यांनी शुक्रवारी सांगितले. ते म्हणाले की, शेजारी राष्ट्रांत होणाºया धार्मिक छळाला कंटाळून तेथील जे नागरिक अनेक वर्षांपूर्वी भारतात आले त्यांनाच या कायद्याद्वारे भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. अशा लोकांची संख्या मोजकी असेल. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर आसाममधील मूळ रहिवाशांची वांशिक ओळख पुसली जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBhim Armyभीम आर्मी