शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांची उमेदवारी हे भाजपचेच कारस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 08:16 IST

बसपच्या मायावती यांचा आरोप

लखनऊ : दलितांच्या मतांची विभागणी व्हावी म्हणून भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून भाजपनेच उभे केल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी रविवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतून निवडणूक लढविणार असल्याचे चंद्रशेखर यांनी या महिन्याच्या प्रारंभी जाहीर केले होते. याबाबत मायावतींनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, दलितांच्या मतांची विभागणी व्हावी या दुष्ट हेतूनेच भाजपाने चंद्रशेखर यांना पुढे केले आहे. भाजपाने रचलेल्या कटकारस्थानाचा भाग म्हणूनच भीम आर्मीची स्थापना झाली होती. दलितविरोधी भाजपने आता घाणेरडे राजकारण सुरू केले आहे.

मायावती म्हणाल्या की, चंद्रशेखर यांनी बसपामध्ये प्रवेश करावा असेही भाजपाकडून झालेले प्रयत्न आम्ही हाणून पाडले. दलित, अन्य मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांच्या विरोधात असलेल्या व सरंजामशाही वृत्तीच्या भाजपला सत्तेतून खाली खेचणे देशहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. तसा विचार करून आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक दलिताने मतदान केले पाहिजे. त्यांचे एकही मत फुकट जाता कामा नये. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास या गोष्टीचा मतदारांना भविष्यात पश्चाताप करण्याची पाळी येईल.भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांनी शनिवारी वाराणसीत आपल्या प्रचाराला सुरूवात केली. मोदी हे फक्त श्रीमंतांनाच मदत करतात. कमी रकमेची कर्जे घेतलेल्यांना व गरिबांना ते छळतात असाही आरोप त्यांनी केला होता.

टॅग्स :mayawatiमायावतीChandrashekhar Azadचंद्रशेखर आझादBhim Armyभीम आर्मी