शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
3
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
4
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
5
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
6
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
8
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
9
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
10
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
11
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
12
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
13
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
14
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
15
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
16
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
19
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द

भारतरत्न: ते शिल्पकार होते लालकृष्ण अडवाणी; रथयात्रेमुळे राजकारणाला कलाटणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 06:15 IST

या यात्रेमुळे देशाच्या राजकारणात भाजपचा पाया मजबूत झाला आणि त्याचे शिल्पकार हाेते लालकृष्ण अडवाणी.

अयाेध्येमध्ये श्रीराम मंदिरात श्रीरामलल्ला विराजमान झाले. श्रीराम मंदिरासाठी सुरू झालेल्या आंदाेलनाने देशाच्या राजकारणाला कलाटणी दिली. त्यातही सर्वात महत्त्वाची ठरली ती रथयात्रा. लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात ही रथयात्रा काढण्यात आली. या यात्रेमुळे देशाच्या राजकारणात भाजपचा पाया मजबूत झाला आणि त्याचे शिल्पकार हाेते लालकृष्ण अडवाणी.

१९८९च्या लाेकसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. अशा वेळी भाजपने जनता दलाला श्रीराम मंदिराच्या मुद्द्यावरून बाहेरून पाठिंबा दिला. सरकार स्थापन झाल्यानंतरही श्रीराम मंदिराबाबत काेणताही ताेडगा काढण्याच्या हालचाली दिसत नव्हत्या. त्यावेळी भाजप नेत्यांनी अयाेध्येतील वादग्रस्त जागेवर कारसेवा करण्याचे जाहीर केले. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी भाजपचे अध्यक्ष हाेते. सरकारने ताेडगा न काढल्यास कारसेवा अटळ आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर देशभरात कारसेवेची तयारी सुरू झाली. समित्या स्थापन झाल्या. सप्टेंबर १९९०मध्ये अडवाणी हे पत्नी कमला यांच्यासाेबत चर्चा करीत असताना पक्षाचे सरचिटणीस प्रमाेद महाजन तेथे पाेहाेचले. त्यावेळी अडवाणी यांनी सर्वप्रथम यात्रा काढण्याचा विचार मांडला. साेमनाथ ते अयाेध्या पदयात्रा काढण्याचा मी विचार करीत असल्याचे ते म्हणाले. पदयात्रेऐवजी रथयात्रा काढण्याची कल्पना महाजन यांना सुचली.  मिनी बस किंवा मिनी ट्रकला रथाचे स्वरूप देऊन तुम्ही त्यातून जावे, असे महाजन अडवाणी यांना म्हणाले. 

अडवाणी यांनी याबाबत काहीसा विचार केला. अखेर त्यांनी रथयात्रेला हाेकार दिला. प्रमाेद महाजन यांनी रथयात्रेचे नियाेजन आणि व्यवस्थेची जबाबदारी घेतली. २५ सप्टेंबर १९९० राेजी साेमनाथ येथून रथयात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर इतिहास घडला. 

लालू प्रसाद यादव यांनी राेखली हाेती रथयात्रादेशभरात लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्त्वाखाली निघालेल्या रथयात्रेला जाेरदार प्रतिसाद मिळत हाेता. एक वेळ अशी हाेती, ज्यावेळी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी राज्यात कारसेवकांवर गाेळीबार करण्याचे आदेश दिले हाेते. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्याचदरम्यान, बिहारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी रथयात्रा समस्तीपूरमध्ये राेखली आणि अडवाणी यांना अटक केली. 

वाजपेयींशी घट्ट मैत्री

एकेकाळी लाेकसभेत भाजपचे केवळ २ खासदार हाेते. हा आकडा १९९९ मध्ये १८२वर पाेहाेचला. २ ते १८२ या प्रवासात भाजपच्या दाेन दिग्गज नेत्यांची प्रमुख भूमिका राहिली. ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी. या दाेघांची अतिशय घट्ट मैत्री हाेती. वाजपेयी हे श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासाेबत देशव्यापी दाैऱ्यावर हाेते. त्यावेळी काश्मीरला जाताना काेटा रेल्वे स्थानकावर त्यांची भेट झाली. अडवाणी हे त्यावेळी राजस्थानात संघाचे प्रचारक हाेते. वाजपेयी यांच्यासाेबत त्यांनी काही दिवस राजस्थानचा दाैरा केला हाेता. त्यांच्या वक्तृत्व काैशल्याने अडवाणी भारावून गेले हाेते. दाेन्ही नेत्यांची शैली तसेच बलस्थाने वेगळी हाेती. परंतु, दाेघांचा एकमेकांवर प्रचंड विश्वास हाेता. 

मित्रासाठी साेडले पद १९९५मध्ये नाेव्हेंबर महिन्यात भाजपचे मुंबईत अधिवेशन सुरू हाेते. त्यावेळी लाेकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी लालकृष्ण अडवाणी यांचे नाव जाहीर हाेईल, अशी चर्चा हाेती. मात्र, अडवाणींनी भाषण सुरू केले आणि म्हणाले, ‘अबकी बारी अटल बिहारी.’ या वाक्याने स्वत: वाजपेयी चकीत झाले. 

टॅग्स :Lal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीBJPभाजपाBharat Ratnaभारतरत्न