शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भारतरत्न: ते शिल्पकार होते लालकृष्ण अडवाणी; रथयात्रेमुळे राजकारणाला कलाटणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 06:15 IST

या यात्रेमुळे देशाच्या राजकारणात भाजपचा पाया मजबूत झाला आणि त्याचे शिल्पकार हाेते लालकृष्ण अडवाणी.

अयाेध्येमध्ये श्रीराम मंदिरात श्रीरामलल्ला विराजमान झाले. श्रीराम मंदिरासाठी सुरू झालेल्या आंदाेलनाने देशाच्या राजकारणाला कलाटणी दिली. त्यातही सर्वात महत्त्वाची ठरली ती रथयात्रा. लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात ही रथयात्रा काढण्यात आली. या यात्रेमुळे देशाच्या राजकारणात भाजपचा पाया मजबूत झाला आणि त्याचे शिल्पकार हाेते लालकृष्ण अडवाणी.

१९८९च्या लाेकसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. अशा वेळी भाजपने जनता दलाला श्रीराम मंदिराच्या मुद्द्यावरून बाहेरून पाठिंबा दिला. सरकार स्थापन झाल्यानंतरही श्रीराम मंदिराबाबत काेणताही ताेडगा काढण्याच्या हालचाली दिसत नव्हत्या. त्यावेळी भाजप नेत्यांनी अयाेध्येतील वादग्रस्त जागेवर कारसेवा करण्याचे जाहीर केले. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी भाजपचे अध्यक्ष हाेते. सरकारने ताेडगा न काढल्यास कारसेवा अटळ आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर देशभरात कारसेवेची तयारी सुरू झाली. समित्या स्थापन झाल्या. सप्टेंबर १९९०मध्ये अडवाणी हे पत्नी कमला यांच्यासाेबत चर्चा करीत असताना पक्षाचे सरचिटणीस प्रमाेद महाजन तेथे पाेहाेचले. त्यावेळी अडवाणी यांनी सर्वप्रथम यात्रा काढण्याचा विचार मांडला. साेमनाथ ते अयाेध्या पदयात्रा काढण्याचा मी विचार करीत असल्याचे ते म्हणाले. पदयात्रेऐवजी रथयात्रा काढण्याची कल्पना महाजन यांना सुचली.  मिनी बस किंवा मिनी ट्रकला रथाचे स्वरूप देऊन तुम्ही त्यातून जावे, असे महाजन अडवाणी यांना म्हणाले. 

अडवाणी यांनी याबाबत काहीसा विचार केला. अखेर त्यांनी रथयात्रेला हाेकार दिला. प्रमाेद महाजन यांनी रथयात्रेचे नियाेजन आणि व्यवस्थेची जबाबदारी घेतली. २५ सप्टेंबर १९९० राेजी साेमनाथ येथून रथयात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर इतिहास घडला. 

लालू प्रसाद यादव यांनी राेखली हाेती रथयात्रादेशभरात लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्त्वाखाली निघालेल्या रथयात्रेला जाेरदार प्रतिसाद मिळत हाेता. एक वेळ अशी हाेती, ज्यावेळी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी राज्यात कारसेवकांवर गाेळीबार करण्याचे आदेश दिले हाेते. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्याचदरम्यान, बिहारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी रथयात्रा समस्तीपूरमध्ये राेखली आणि अडवाणी यांना अटक केली. 

वाजपेयींशी घट्ट मैत्री

एकेकाळी लाेकसभेत भाजपचे केवळ २ खासदार हाेते. हा आकडा १९९९ मध्ये १८२वर पाेहाेचला. २ ते १८२ या प्रवासात भाजपच्या दाेन दिग्गज नेत्यांची प्रमुख भूमिका राहिली. ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी. या दाेघांची अतिशय घट्ट मैत्री हाेती. वाजपेयी हे श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासाेबत देशव्यापी दाैऱ्यावर हाेते. त्यावेळी काश्मीरला जाताना काेटा रेल्वे स्थानकावर त्यांची भेट झाली. अडवाणी हे त्यावेळी राजस्थानात संघाचे प्रचारक हाेते. वाजपेयी यांच्यासाेबत त्यांनी काही दिवस राजस्थानचा दाैरा केला हाेता. त्यांच्या वक्तृत्व काैशल्याने अडवाणी भारावून गेले हाेते. दाेन्ही नेत्यांची शैली तसेच बलस्थाने वेगळी हाेती. परंतु, दाेघांचा एकमेकांवर प्रचंड विश्वास हाेता. 

मित्रासाठी साेडले पद १९९५मध्ये नाेव्हेंबर महिन्यात भाजपचे मुंबईत अधिवेशन सुरू हाेते. त्यावेळी लाेकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी लालकृष्ण अडवाणी यांचे नाव जाहीर हाेईल, अशी चर्चा हाेती. मात्र, अडवाणींनी भाषण सुरू केले आणि म्हणाले, ‘अबकी बारी अटल बिहारी.’ या वाक्याने स्वत: वाजपेयी चकीत झाले. 

टॅग्स :Lal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीBJPभाजपाBharat Ratnaभारतरत्न