शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

भारतरत्न: ते शिल्पकार होते लालकृष्ण अडवाणी; रथयात्रेमुळे राजकारणाला कलाटणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 06:15 IST

या यात्रेमुळे देशाच्या राजकारणात भाजपचा पाया मजबूत झाला आणि त्याचे शिल्पकार हाेते लालकृष्ण अडवाणी.

अयाेध्येमध्ये श्रीराम मंदिरात श्रीरामलल्ला विराजमान झाले. श्रीराम मंदिरासाठी सुरू झालेल्या आंदाेलनाने देशाच्या राजकारणाला कलाटणी दिली. त्यातही सर्वात महत्त्वाची ठरली ती रथयात्रा. लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात ही रथयात्रा काढण्यात आली. या यात्रेमुळे देशाच्या राजकारणात भाजपचा पाया मजबूत झाला आणि त्याचे शिल्पकार हाेते लालकृष्ण अडवाणी.

१९८९च्या लाेकसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. अशा वेळी भाजपने जनता दलाला श्रीराम मंदिराच्या मुद्द्यावरून बाहेरून पाठिंबा दिला. सरकार स्थापन झाल्यानंतरही श्रीराम मंदिराबाबत काेणताही ताेडगा काढण्याच्या हालचाली दिसत नव्हत्या. त्यावेळी भाजप नेत्यांनी अयाेध्येतील वादग्रस्त जागेवर कारसेवा करण्याचे जाहीर केले. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी भाजपचे अध्यक्ष हाेते. सरकारने ताेडगा न काढल्यास कारसेवा अटळ आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर देशभरात कारसेवेची तयारी सुरू झाली. समित्या स्थापन झाल्या. सप्टेंबर १९९०मध्ये अडवाणी हे पत्नी कमला यांच्यासाेबत चर्चा करीत असताना पक्षाचे सरचिटणीस प्रमाेद महाजन तेथे पाेहाेचले. त्यावेळी अडवाणी यांनी सर्वप्रथम यात्रा काढण्याचा विचार मांडला. साेमनाथ ते अयाेध्या पदयात्रा काढण्याचा मी विचार करीत असल्याचे ते म्हणाले. पदयात्रेऐवजी रथयात्रा काढण्याची कल्पना महाजन यांना सुचली.  मिनी बस किंवा मिनी ट्रकला रथाचे स्वरूप देऊन तुम्ही त्यातून जावे, असे महाजन अडवाणी यांना म्हणाले. 

अडवाणी यांनी याबाबत काहीसा विचार केला. अखेर त्यांनी रथयात्रेला हाेकार दिला. प्रमाेद महाजन यांनी रथयात्रेचे नियाेजन आणि व्यवस्थेची जबाबदारी घेतली. २५ सप्टेंबर १९९० राेजी साेमनाथ येथून रथयात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर इतिहास घडला. 

लालू प्रसाद यादव यांनी राेखली हाेती रथयात्रादेशभरात लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्त्वाखाली निघालेल्या रथयात्रेला जाेरदार प्रतिसाद मिळत हाेता. एक वेळ अशी हाेती, ज्यावेळी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी राज्यात कारसेवकांवर गाेळीबार करण्याचे आदेश दिले हाेते. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्याचदरम्यान, बिहारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी रथयात्रा समस्तीपूरमध्ये राेखली आणि अडवाणी यांना अटक केली. 

वाजपेयींशी घट्ट मैत्री

एकेकाळी लाेकसभेत भाजपचे केवळ २ खासदार हाेते. हा आकडा १९९९ मध्ये १८२वर पाेहाेचला. २ ते १८२ या प्रवासात भाजपच्या दाेन दिग्गज नेत्यांची प्रमुख भूमिका राहिली. ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी. या दाेघांची अतिशय घट्ट मैत्री हाेती. वाजपेयी हे श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासाेबत देशव्यापी दाैऱ्यावर हाेते. त्यावेळी काश्मीरला जाताना काेटा रेल्वे स्थानकावर त्यांची भेट झाली. अडवाणी हे त्यावेळी राजस्थानात संघाचे प्रचारक हाेते. वाजपेयी यांच्यासाेबत त्यांनी काही दिवस राजस्थानचा दाैरा केला हाेता. त्यांच्या वक्तृत्व काैशल्याने अडवाणी भारावून गेले हाेते. दाेन्ही नेत्यांची शैली तसेच बलस्थाने वेगळी हाेती. परंतु, दाेघांचा एकमेकांवर प्रचंड विश्वास हाेता. 

मित्रासाठी साेडले पद १९९५मध्ये नाेव्हेंबर महिन्यात भाजपचे मुंबईत अधिवेशन सुरू हाेते. त्यावेळी लाेकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी लालकृष्ण अडवाणी यांचे नाव जाहीर हाेईल, अशी चर्चा हाेती. मात्र, अडवाणींनी भाषण सुरू केले आणि म्हणाले, ‘अबकी बारी अटल बिहारी.’ या वाक्याने स्वत: वाजपेयी चकीत झाले. 

टॅग्स :Lal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीBJPभाजपाBharat Ratnaभारतरत्न