शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

भारतरत्न हा तर सवर्ण आणि ब्राह्मणांचा क्लब- ओवेसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 07:29 IST

देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानावरुन ओवेसींची मोदी सरकारवर टीका

नवी दिल्ली: एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी भारतरत्नवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारतरत्न म्हणजे सवर्ण आणि ब्राह्मणांचा क्लब असल्याचं वादग्रस्त विधान ओवेसी यांनी म्हटलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना त्यांनी हे विधान केलं. काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारनं तीन व्यक्तींना भारतरत्न देण्याची घोषणा केली. यामध्ये माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांच्या नावांचा समावेश आहे. संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव आणण्यात आला. त्यावर चर्चा सुरू असताना मोदी सरकारनं जाहीर केलेल्या भारतरत्न पुरस्कारांवर ओवेसींनी टीका केली. भारतरत्न हा तर ब्राह्मण आणि सवर्णांचा क्लब आहे. देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देताना पारदर्शकता पाळली जात नाही, असा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी चंद्रचूड समितीच्या अहवालाचा उल्लेख केला. दीन दयाळ उपाध्याय यांना भारतरत्न जाहीर झाला. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. इतिहासवर एक दृष्टीक्षेप टाकल्यास भारतरत्न म्हणजे केवळ सवर्णांचा क्लब असल्याचं तुमच्या लक्षात येईल, असं ओवेसी म्हणाले. गेल्या महिन्यातही ओवेसींनी भारतरत्नवरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. किती दलित, आदिवासी, मुस्लिम यांना आतापर्यंत भारतरत्न देण्यात आला?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आलेल्या भारतरत्न पुरस्कारावरही ओवेसींनी भाष्य केलं. आंबेडकर यांना नाखुशीनं भारतरत्न देण्यात आला. सरकारला गरज वाटली म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला, असा दावा त्यांनी केला. सरकारच्या चुकांमध्ये आज काश्मीरमधील समस्या आणखी गंभीर झाली आहे. मोदी काश्मीरमध्ये जातात. दल लेकची सफर करतात आणि बाजूला कोणीही नसताना हात दाखवत फिरतात. मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळेच आज दक्षिण आशियात भारत एकाकी पडला आहे. या देशाला चौकीदाराची गदज नाही. पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ घटनेच्या विरुद्ध काम करत आहे, अशी टीका ओवेसींनी केली. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीPranab Mukherjeeप्रणव मुखर्जी