शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

भारत जोडो यात्रा हा राजकीय इव्हेंट नसून कोट्यवधी लोकांची भावना - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 10:14 IST

संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या टीशर्टवरून वाद निर्माण करणाऱ्यांनीही फटकारलं आहे.

नवी दिल्ली - राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यापासून शिवसेनेने स्वागत केले आहे. शेकडो शिवसैनिक भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. दिल्लीत यात्रा आल्यानंतर आमचे खासदार सहभागी झाले. काश्मीर, पंजाबमध्ये यात्रा पोहचल्यानंतर मी सहभागी होईन असं बोललो होतो. राहुल गांधी श्रीनगरमध्ये जाऊन तिरंगा फडकवणार आहेत ही ऐतिहासिक गोष्ट आहे. हजारो तरुण, वृद्ध महिला यात्रेत सहभागी झालेत. ही राजकीय इव्हेंट नाही असं कौतुक खासदार संजय राऊतांनी केले आहे. 

संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या टीशर्टवरून वाद निर्माण करणाऱ्यांनीही फटकारलं आहे. राऊतांनी म्हटलं की, कपड्यावरून कसले वाद करता? राहुल गांधी तपस्वीप्रमाणे यात्रा करतायेत अशी लोकांची भावना आहे. त्या भावनेला तडा देण्याचं काम काहीजण करतायेत. सत्ताधाऱ्यांनी धसका घ्यावा अशी भारत जोडो यात्रा आहे. राहुल गांधी यांचे नेतृत्व उजळून निघालं आहे. या यात्रेचा फायदा देशातील लोकशाहीला मजबूत करण्यासाठी होऊ शकतो. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा यशस्वी करून दाखवली. ही एका राजकीय पक्षाची यात्रा नसून देशातील लाखो कोट्यावधी लोकांची भावनेतून ही यात्रा निघाली आहे असं त्यांनी सांगितले. 

महाशक्तीनं हस्तक्षेप न केल्यास न्याय मिळेलआम्ही सत्यापलीकडे काही मागत नाही. सरकार पाडण्यासाठी पक्ष फोडण्यात आला. वारेमाप पैशांचा वापर करण्यात आला. आमदारांवर अपात्रतेची कारवाई याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आहे. या खटल्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. तारखांवर तारखा पडतायेत आणि राज्यातील घटनाबाह्य सरकार मिश्किलपणे हसतंय. महाशक्तीमागे असली तरी आमचा देशातील न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे असं राऊतांनी सांगितले. 

त्याचसोबत निकाल पहिल्याच दिवशी लागू शकला असता. घटनाबाह्य सरकार चालत असेल तर रोखणे संविधानाचं काम आहे. फेब्रुवारी शेवटापर्यंत या प्रकरणाचा निकाल लागू शकतो. सत्ताधाऱ्यांनी कानातील बोळे काढा. न्यायालयाचा निकाल फेब्रुवारीपर्यंत लागणे अपेक्षित आहे. सरकार पाडून दाखवा काय ते पडेल. हे जिवंत सरकार नाही. सरकारचा मृत्यू झालाय. कुठलेही अडथळे आले नाही तर सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. न्यायव्यवस्था स्वायत्त संस्था आहे. विश्वास असायला हवा. महाशक्तीचा हस्तक्षेप नसेल आणि सर्वकाही नियमाप्रमाणे होणार असेल तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला सत्याप्रमाणे न्याय मिळेल असंही संजय राऊत म्हणाले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा