शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

भारत जोडो यात्रा हा राजकीय इव्हेंट नसून कोट्यवधी लोकांची भावना - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 10:14 IST

संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या टीशर्टवरून वाद निर्माण करणाऱ्यांनीही फटकारलं आहे.

नवी दिल्ली - राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यापासून शिवसेनेने स्वागत केले आहे. शेकडो शिवसैनिक भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. दिल्लीत यात्रा आल्यानंतर आमचे खासदार सहभागी झाले. काश्मीर, पंजाबमध्ये यात्रा पोहचल्यानंतर मी सहभागी होईन असं बोललो होतो. राहुल गांधी श्रीनगरमध्ये जाऊन तिरंगा फडकवणार आहेत ही ऐतिहासिक गोष्ट आहे. हजारो तरुण, वृद्ध महिला यात्रेत सहभागी झालेत. ही राजकीय इव्हेंट नाही असं कौतुक खासदार संजय राऊतांनी केले आहे. 

संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या टीशर्टवरून वाद निर्माण करणाऱ्यांनीही फटकारलं आहे. राऊतांनी म्हटलं की, कपड्यावरून कसले वाद करता? राहुल गांधी तपस्वीप्रमाणे यात्रा करतायेत अशी लोकांची भावना आहे. त्या भावनेला तडा देण्याचं काम काहीजण करतायेत. सत्ताधाऱ्यांनी धसका घ्यावा अशी भारत जोडो यात्रा आहे. राहुल गांधी यांचे नेतृत्व उजळून निघालं आहे. या यात्रेचा फायदा देशातील लोकशाहीला मजबूत करण्यासाठी होऊ शकतो. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा यशस्वी करून दाखवली. ही एका राजकीय पक्षाची यात्रा नसून देशातील लाखो कोट्यावधी लोकांची भावनेतून ही यात्रा निघाली आहे असं त्यांनी सांगितले. 

महाशक्तीनं हस्तक्षेप न केल्यास न्याय मिळेलआम्ही सत्यापलीकडे काही मागत नाही. सरकार पाडण्यासाठी पक्ष फोडण्यात आला. वारेमाप पैशांचा वापर करण्यात आला. आमदारांवर अपात्रतेची कारवाई याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आहे. या खटल्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. तारखांवर तारखा पडतायेत आणि राज्यातील घटनाबाह्य सरकार मिश्किलपणे हसतंय. महाशक्तीमागे असली तरी आमचा देशातील न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे असं राऊतांनी सांगितले. 

त्याचसोबत निकाल पहिल्याच दिवशी लागू शकला असता. घटनाबाह्य सरकार चालत असेल तर रोखणे संविधानाचं काम आहे. फेब्रुवारी शेवटापर्यंत या प्रकरणाचा निकाल लागू शकतो. सत्ताधाऱ्यांनी कानातील बोळे काढा. न्यायालयाचा निकाल फेब्रुवारीपर्यंत लागणे अपेक्षित आहे. सरकार पाडून दाखवा काय ते पडेल. हे जिवंत सरकार नाही. सरकारचा मृत्यू झालाय. कुठलेही अडथळे आले नाही तर सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. न्यायव्यवस्था स्वायत्त संस्था आहे. विश्वास असायला हवा. महाशक्तीचा हस्तक्षेप नसेल आणि सर्वकाही नियमाप्रमाणे होणार असेल तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला सत्याप्रमाणे न्याय मिळेल असंही संजय राऊत म्हणाले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा