शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

"आपकी नफरत को हमारा प्यार काटेगा!" भारत जोडो यात्रेची दिल्लीत एंट्री; भाजपनं खडा केला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 09:30 IST

राजधानी दिल्लीत प्रवेश करण्यापूर्वी राहुल गांधी म्हणाले, आज आपण सर्वजण भारताची राजधानी दिल्लीच्या प्रवेशद्वारावर उभे आहोत. या या यात्रेसाठी आणि देशासाठीही एक ऐतिहासिक क्षण आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाता सुरू असलेली भारत जोडो यात्रा शनिवारी राजधानी दिल्लीत दाखल झाली आहे. या यात्रेने आज सकाळी बदरपूर सीमेवरून दिल्लीत प्रवेश केला आहे. ती सकाळी साडेदहा वाजता जयदेव आश्रम, आश्रम चौकाजवळ पोहोचेल. यानंतर ही यात्रा दुपारी 4.30 वाजता लाल किल्ल्यावर जाईल. यात्रेच्या दिल्लीत आगमनावरूनही राजकारण सुरू झाले आहे. 'पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे, मात्र काँग्रेस केंद्राने जारी केलेल्या कोरोना प्रोटोकॉलचे पालन करत नाही,' असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.

राजधानी दिल्लीत प्रवेश करण्यापूर्वी राहुल गांधी म्हणाले, आज आपण सर्वजण भारताची राजधानी दिल्लीच्या प्रवेशद्वारावर उभे आहोत. या या यात्रेसाठी आणि देशासाठीही एक ऐतिहासिक क्षण आहे. या संपूर्ण यात्रेदरम्यान आपण लोकांकडून खूप काही शिकलो. आम्ही त्यांच्या वेदना अनुभवल्या आणि त्यांच्या इच्छा ऐकल्या. याच बरोबर, आता भारत जोडो यात्रा हा प्रेमाचा आवाज आणि भारतातील लोकांचा संदेश दिल्लीपर्यंत घेऊन जाईल. एवढेच नाही, तर आपण माझे शब्द लिहून ठेवा, 'आपल्या द्वेषावर आमच्या प्रेमाचा विजय होईल,' असेही राहुल गांधी म्हणाले. 

राहुल गांधी म्हणाले, आम्ही 3000 किमीचा प्रवास पूर्ण केला आहे आणि अजूनही चालत आहोत. लोकांना वाटते की हे कसे शक्य आहे? तर समजून जा, की ही लोकांची ताकद आहे, जी या यात्रेमागे उभी आहे. आम्ही ज्या-ज्या ठिकाणी यात्रा केली, तेथे तेथे मला एकच गोष्ट दिसली, ती म्हणजे प्रेम. याच वेळी आम्ही, महागाई हटवा, बेरोजगारी संपवा, द्वेष पसरवू नका, असेही म्हटले आहे. भारताचा हाच आवाज घेऊन आम्ही 'राजा'च्या सिंहासनापर्यत दिल्लीत घेऊन आलो आहोत.

बीजेपने साधला निशाणा - माध्यमांतील वृत्तांनुसार, अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे, की जगभरात अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. सरकारने जनतेच्या सुरक्षिततेसाठी योग्य पावले उचलली आहेत, मग काँग्रेस त्याला विरोध का करत आहे? कोरोना प्रोटोकॉल सर्वांसाठीच आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राdelhiदिल्लीcongressकाँग्रेसBJPभाजपा