शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

"आपकी नफरत को हमारा प्यार काटेगा!" भारत जोडो यात्रेची दिल्लीत एंट्री; भाजपनं खडा केला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 09:30 IST

राजधानी दिल्लीत प्रवेश करण्यापूर्वी राहुल गांधी म्हणाले, आज आपण सर्वजण भारताची राजधानी दिल्लीच्या प्रवेशद्वारावर उभे आहोत. या या यात्रेसाठी आणि देशासाठीही एक ऐतिहासिक क्षण आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाता सुरू असलेली भारत जोडो यात्रा शनिवारी राजधानी दिल्लीत दाखल झाली आहे. या यात्रेने आज सकाळी बदरपूर सीमेवरून दिल्लीत प्रवेश केला आहे. ती सकाळी साडेदहा वाजता जयदेव आश्रम, आश्रम चौकाजवळ पोहोचेल. यानंतर ही यात्रा दुपारी 4.30 वाजता लाल किल्ल्यावर जाईल. यात्रेच्या दिल्लीत आगमनावरूनही राजकारण सुरू झाले आहे. 'पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे, मात्र काँग्रेस केंद्राने जारी केलेल्या कोरोना प्रोटोकॉलचे पालन करत नाही,' असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.

राजधानी दिल्लीत प्रवेश करण्यापूर्वी राहुल गांधी म्हणाले, आज आपण सर्वजण भारताची राजधानी दिल्लीच्या प्रवेशद्वारावर उभे आहोत. या या यात्रेसाठी आणि देशासाठीही एक ऐतिहासिक क्षण आहे. या संपूर्ण यात्रेदरम्यान आपण लोकांकडून खूप काही शिकलो. आम्ही त्यांच्या वेदना अनुभवल्या आणि त्यांच्या इच्छा ऐकल्या. याच बरोबर, आता भारत जोडो यात्रा हा प्रेमाचा आवाज आणि भारतातील लोकांचा संदेश दिल्लीपर्यंत घेऊन जाईल. एवढेच नाही, तर आपण माझे शब्द लिहून ठेवा, 'आपल्या द्वेषावर आमच्या प्रेमाचा विजय होईल,' असेही राहुल गांधी म्हणाले. 

राहुल गांधी म्हणाले, आम्ही 3000 किमीचा प्रवास पूर्ण केला आहे आणि अजूनही चालत आहोत. लोकांना वाटते की हे कसे शक्य आहे? तर समजून जा, की ही लोकांची ताकद आहे, जी या यात्रेमागे उभी आहे. आम्ही ज्या-ज्या ठिकाणी यात्रा केली, तेथे तेथे मला एकच गोष्ट दिसली, ती म्हणजे प्रेम. याच वेळी आम्ही, महागाई हटवा, बेरोजगारी संपवा, द्वेष पसरवू नका, असेही म्हटले आहे. भारताचा हाच आवाज घेऊन आम्ही 'राजा'च्या सिंहासनापर्यत दिल्लीत घेऊन आलो आहोत.

बीजेपने साधला निशाणा - माध्यमांतील वृत्तांनुसार, अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे, की जगभरात अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. सरकारने जनतेच्या सुरक्षिततेसाठी योग्य पावले उचलली आहेत, मग काँग्रेस त्याला विरोध का करत आहे? कोरोना प्रोटोकॉल सर्वांसाठीच आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राdelhiदिल्लीcongressकाँग्रेसBJPभाजपा