शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Jodo Yatra: 'हे योग्य नाही...', राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत काँग्रेसचे दुसऱ्यांदा अमित शहांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 16:43 IST

Rahul Gandhi Security Breach: भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत काँग्रेसने दुसऱ्यांना गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

Bharat Jodo Yatra Security Breach: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सुरक्षेवरुन नवीन राजकारण सुरू झाले आहे. यातच सीआरपीएफच्या दाव्यानंतर दोन दिवसांनी काँग्रेसने शनिवारी (31 डिसेंबर) पुन्हा भारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. सुरक्षा व्यवस्थेबाबत काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दुसऱ्यांदा पत्र लिहिले आहे. यापूर्वी, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने म्हटले होते की राहुल गांधी यांनी अनेक प्रसंगी मार्गदर्शक तत्त्वांचे "उल्लंघन" केले होते.

काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, सीआरपीएफकडून मिळालेल्या प्रतिसादाविरोधात आम्ही चिंता व्यक्त करत आहोत. हे अस्वीकार्य आहे, कारण यामुळे समस्या सुटत नाही तर ती मोठी होते. पहिल्या पत्रात काँग्रेसने यात्रेच्या दिल्ली टप्प्यात सुरक्षेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. यानंतर सीआरपीएफने त्यावर प्रत्युत्तरही दिले. 

काय म्हणाले सीआरपीएफ?सीआरपीएफ राहुल गांधींना झेड प्लस श्रेणीची सुरक्षा पुरवते. सुरक्षा एजन्सीने काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांच्या आरोपांना उत्तर दिले होते की, राहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे मार्गदर्शक तत्त्वांनुसार केल्या गेल्या आहेत. यात्रे दरम्यान राहुल गांधींनी 113 वेळा नियमांचे उल्लंघन केल्याची माहिती सीआरपीएफने दिली. 

काँग्रेसने पुन्हा पत्र लिहिलेसीआरपीएफच्या दाव्यानंतर आपल्या ताज्या पत्रात, काँग्रेसने पुन्हा एकदा सोहना, हरियाणातील घरफोडीचा मुद्दा उपस्थित केला आणि सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांमधील समन्वयाच्या अभावावरही भर दिला. मात्र, यापूर्वी शहर पोलिसांशी चर्चा झाल्याचे स्पष्टीकरण सुरक्षा यंत्रणेने दिले होते.

"अज्ञात लोक राहुल गांधींच्या खूप जवळ आले"

काँग्रेस नेते जयराम रमेश आणि पवन खेडा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या नवीन पत्रात असे लिहिले आहे की, "अनेकदा अज्ञात लोक राहुल गांधींच्या खूप जवळ आले होते. त्याचे व्हिडिओ आणि फोटोग्राफिक पुरावे शेअर केले जाऊ शकतात." हरियाणा पोलिसांच्या इंटेलिजन्स युनिटच्या कर्मचार्‍यांनी यात्रेत घुसखोरी केल्याचे पक्षाने म्हटले आहे.  भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, या विश्वासाने भारत जोडो यात्रेत आम्ही पुढे जात आहोत, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसAmit Shahअमित शाह