शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

'सुरुवातीला भारत जोडो यात्रा अवघड वाटायची, पण एक शक्ती पाठीशी होती'- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 19:09 IST

'आमची यात्रा भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेविरोधात आहे.'

Bharat Jodo Yatra:काँग्रेसच्या भारत जोडो (Congress Bharat Jodo Yatara) यात्रेचा आज 38वा दिवस आहे. या 38 दिवसांत कर्नाटकातील बेल्लारी येथे भारत जोडो यात्रेने एकूण 1,000 किलोमीटरची पदयात्रा पूर्ण केली आहे. यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जनतेला संबोधित केले.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, 'सुरुवातीला ही पदयात्रा अवघड वाटत होती, पण नंतर काही एक शक्ती आम्हाला पुढे नेत असल्याचे दिसले. आमची ही यात्रा भाजप आणि आरएसएसच्या विभाजन करणाऱ्या विचारधारेविरोधात आहे. ही विचारधारा म्हणजे, भारतावर झालेला हल्ला आहे. त्यांची ही देशभक्ती नाही, देशविरोधातील काम आहे.'

यात्रेत द्वेष आणि हिंसा आढळणार नाहीराहुल गांधी पुढे म्हणाले की, 'आमच्या या प्रवासात तुम्हाला कुठेही द्वेष आणि हिंसा सापडणार नाही. ही विचारसरणी केवळ यात्रेची नसून ती कर्नाटक आणि भारताची विचारसरणी आहे. या लोकांना (भाजप) 24 तास अन् 50 वर्षे लागतील, हा डीएनए तुमच्याकडून काढता येणार नाही.'

पंतप्रधान मोदींमुळे रोजगार गेलाराहुल गांधी म्हणाले की, 'सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या मिळण्याचा विश्वास नाही. आज भारतात गेल्या 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी आहे. पंतप्रधानांनी दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. त्या नोकऱ्या कुठे गेल्या? नोटाबंदी, जीएसटी आणि कोरोना या पंतप्रधानांच्या धोरणांमुळे साडेबारा कोटी तरुणांचा रोजगार गेला,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ