शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

भारत जोडो न्याय यात्रेवर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला; काँग्रेसचा आरोप, वातावरण तापलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 17:50 IST

जयराम रमेश यांच्या वाहनाला भाजप कार्यकर्त्यांनी घेराव घालत घोषणाबाजी सुरू केली.

Bharat Jodo Nyay Yatra ( Marathi News ) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला भारत जोडो न्याय यात्रा असं नामकरण करण्यात आलं असून मणिपूरपासून हा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मात्र आता ही यात्रा आसाममध्ये पोहोचल्यानंतर भाजप आणि काँग्रेसदरम्यान संघर्ष निर्माण झाला आहे. कारण माझ्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप या यात्रेमध्ये सहभागी झालेले काँग्रेस नेते आणि माजी मंत्री जयराम रमेश यांनी केला आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ज्या मार्गावरून जाणार होती, त्याच मार्गावर भाजप कार्यकर्त्यांनी रॅली काढली होती. राहुल गांधी सदर परिसरात पोहोचण्याआधी या मार्गाची पाहणी करण्यासाठी आलेल्या जयराम रमेश यांच्या वाहनाला भाजप कार्यकर्त्यांनी घेराव घालत घोषणाबाजी सुरू केली. याबाबतचा व्हिडिओ जयराम रमेश यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे.

भाजपवर हल्लाबोल करत जयराम रमेश यांनी म्हटलं आहे की, "काही मिनिटांपूर्वी माझ्या वाहनावर सुनितपूर इथं हल्ला झाला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आमच्या गाडीवर लावलेले भारत जोडो न्याय यात्रेचे स्टिकर्सही फाडले. आमच्यावर पाणी फेकत त्यांनी आमच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा हेच असं कृत्य करत आहेत. मात्र आम्ही घाबरलेलो नसून मार्गक्रमण करतच राहू," अशा शब्दांत जयराम रमेश यांनी भाजपविरोधात हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, या घटनेबाबत अद्याप राहुल गांधींकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसBJPभाजपा