शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

राहुल गांधींच्या पदयात्रा 2.0 चे नाव असणार 'भारत जोडो न्याय यात्रा', जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 16:26 IST

bharat jodo nyay yatra : उत्तर प्रदेशात राहुल गांधी 1074 किलोमीटरचा प्रवास करतील. या यात्रेच्या कालावधीत राहुल गांधी 11 दिवसांत उत्तर प्रदेशातील 20 जिल्हे कव्हर करणार आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नव्या पदयात्रेची सविस्तर माहिती समोर आली आहे. या यात्रेचे नाव "भारत जोडो न्याय यात्रा" असे असणार आहे. ही यात्रा देशातील एकूण 15 राज्यांमधून जाणार आहे. यादरम्यान राहुल गांधी हे जवळपास 6700 किलोमीटरचा पायी प्रवास करतील. सर्वात लांबचा प्रवास हा उत्तर प्रदेशमधील असणार आहे. उत्तर प्रदेशात राहुल गांधी 1074 किलोमीटरचा प्रवास करतील. या यात्रेच्या कालावधीत राहुल गांधी 11 दिवसांत उत्तर प्रदेशातील 20 जिल्हे कव्हर करणार आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा प्रवास 14 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता मणिपूरमधील इंफाळ येथून सुरू होईल.  मणिपूरनंतर ही भारत जोडो न्याय यात्रा नागालँड, त्यानंतर आसाम, अरुणाचल प्रदेश आणि परत आसाममधून मेघालयमध्ये जाणार आहे. यानंतर भारत जोडो न्याय यात्रा ही बंगाल आणि नंतर बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात जाणार आहेत. या यात्रेसाठी काँग्रेस पक्षाने भारत आघाडीतील सर्व पक्षांना निमंत्रित केले आहे.

आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची 3 तास बैठक झाली. या बैठकीला आज सर्व प्रदेशाध्यक्ष आणि सीएलपी नेते उपस्थित होते. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच, पहिल्यांदा निघालेली भारत जोडो यात्रा ही आपल्या देशाच्या आणि पक्षाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरली. भारत जोडो यात्रा ही परिवर्तनाची पदयात्रा होती. देशात मोठा बदल झाला, संघटनेत नवसंजीवनी आली, असे बैठकीनंतर सांगण्यात आले. 

भारत जोडो न्याय यात्रेचे संपूर्ण शेड्यूल...- पश्चिम बंगालमध्ये 5 दिवस आणि 7 जिल्हे.- बिहारमध्ये 4 दिवस आणि 7 जिल्हे.- झारखंडमध्ये 8 दिवस आणि 13 जिल्हे.- छत्तीसगडमध्ये 536 किमी, 5 दिवस आणि मधील 7 जिल्हे.- उत्तर प्रदेशमध्ये 1074 किमी, 20 जिल्ह्यांमध्ये 11 दिवसांचा मुक्काम.- राजस्थानमध्ये 128 किमी, 1 दिवस आणि 2 जिल्हे.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेश