शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

शालेय पुस्तकांत ‘इंडिया’ऐवजी भारत; NCERT पुस्तकांसाठी शिफारस, नव्या वादाला उकळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 06:20 IST

एनसीईआरटीने ही शिफारस स्वीकारल्यास नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये तसा बदल दिसण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :भारत हे शतकानुशतके जुने नाव आहे. भारत हे नाव सात हजार वर्षे जुन्या विष्णु पुराणसारख्या प्राचीन ग्रंथात वापरले गेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) सर्व पाठ्यपुस्तकांमधील ‘इंडिया’ नाव बदलून भारत करण्याची शिफारस बुधवारी एनसीईआरटीच्या एका समितीने एकमुखाने पारित केली. एनसीईआरटीने ही शिफारस स्वीकारल्यास नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये तसा बदल दिसण्याची शक्यता आहे.

पद्मश्री सी.आय. इसाक यांच्या अध्यक्षतेखालील एनसीईआरटीच्या समाजशास्त्रावरील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत इंडियाऐवजी भारत नाव करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. दिल्लीत सप्टेंबर महिन्यात झालेल्या जी-२० देशांच्या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी इंडियाऐवजी भारत नावाचा अवलंब केला होता.

अभ्यासक्रमात काय असेल? 

सर्व अभ्यासक्रमांमध्ये ‘प्राचीन इतिहासा’ऐवजी ‘शास्त्रीय इतिहासा’चा तसेच भारतीय ज्ञानप्रणालीच्या समावेशाचीही शिफारस करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’ऐवजी भारत नाव ठेवण्याची शिफारस काही महिन्यांपूर्वीच केली होती, अशी माहिती समितीचे प्रमुख इसाक यांनी दिली.

विरोधकांची टीका; सरकार घाबरले 

केंद्र सरकारला आव्हान देण्यासाठी ‘इंडिया’ आघाडी नावारूपाला आल्यापासून सरकार घाबरले आहेत. भारत आणि इंडिया ही नावे संविधानसंमत असतानाही इंडियाला हटविण्याच्या प्रयत्नांतून ‘इंडिया’ आघाडीविषयीची त्यांची भीती स्पष्टपणे जाणवत असल्याचा टोला आपने लगावला.

शिफारस देणाऱ्या समितीत कोण?  

पद्मश्री सी.आय. इसाक यांच्या अध्यक्षतेखालील एनसीईआरटीच्या  समाजशास्त्रावरील समितीत आईसीएचआरचे अध्यक्ष रघुवेंद्र तंवर, जेएनयूच्या प्राध्यापिका वंदना मिश्रा, डेक्कन महाविद्यालय अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू वसंत शिंदे, शिक्षिका ममता यादव यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया घाईची ठरेल : एनसीइआरटी

एनसीईआरटीचा नवा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी विविध तज्ज्ञांच्या बैठकीही होऊ घातल्या आहेत. सध्या या शिफारशीवर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अशा स्थितीत यावर प्रतिक्रिया देणे घाईचे ठरेल, असे एनसीईआरटी स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :Indiaभारत