शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

शालेय पुस्तकांत ‘इंडिया’ऐवजी भारत; NCERT पुस्तकांसाठी शिफारस, नव्या वादाला उकळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 06:20 IST

एनसीईआरटीने ही शिफारस स्वीकारल्यास नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये तसा बदल दिसण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :भारत हे शतकानुशतके जुने नाव आहे. भारत हे नाव सात हजार वर्षे जुन्या विष्णु पुराणसारख्या प्राचीन ग्रंथात वापरले गेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) सर्व पाठ्यपुस्तकांमधील ‘इंडिया’ नाव बदलून भारत करण्याची शिफारस बुधवारी एनसीईआरटीच्या एका समितीने एकमुखाने पारित केली. एनसीईआरटीने ही शिफारस स्वीकारल्यास नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये तसा बदल दिसण्याची शक्यता आहे.

पद्मश्री सी.आय. इसाक यांच्या अध्यक्षतेखालील एनसीईआरटीच्या समाजशास्त्रावरील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत इंडियाऐवजी भारत नाव करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. दिल्लीत सप्टेंबर महिन्यात झालेल्या जी-२० देशांच्या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी इंडियाऐवजी भारत नावाचा अवलंब केला होता.

अभ्यासक्रमात काय असेल? 

सर्व अभ्यासक्रमांमध्ये ‘प्राचीन इतिहासा’ऐवजी ‘शास्त्रीय इतिहासा’चा तसेच भारतीय ज्ञानप्रणालीच्या समावेशाचीही शिफारस करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’ऐवजी भारत नाव ठेवण्याची शिफारस काही महिन्यांपूर्वीच केली होती, अशी माहिती समितीचे प्रमुख इसाक यांनी दिली.

विरोधकांची टीका; सरकार घाबरले 

केंद्र सरकारला आव्हान देण्यासाठी ‘इंडिया’ आघाडी नावारूपाला आल्यापासून सरकार घाबरले आहेत. भारत आणि इंडिया ही नावे संविधानसंमत असतानाही इंडियाला हटविण्याच्या प्रयत्नांतून ‘इंडिया’ आघाडीविषयीची त्यांची भीती स्पष्टपणे जाणवत असल्याचा टोला आपने लगावला.

शिफारस देणाऱ्या समितीत कोण?  

पद्मश्री सी.आय. इसाक यांच्या अध्यक्षतेखालील एनसीईआरटीच्या  समाजशास्त्रावरील समितीत आईसीएचआरचे अध्यक्ष रघुवेंद्र तंवर, जेएनयूच्या प्राध्यापिका वंदना मिश्रा, डेक्कन महाविद्यालय अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू वसंत शिंदे, शिक्षिका ममता यादव यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया घाईची ठरेल : एनसीइआरटी

एनसीईआरटीचा नवा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी विविध तज्ज्ञांच्या बैठकीही होऊ घातल्या आहेत. सध्या या शिफारशीवर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अशा स्थितीत यावर प्रतिक्रिया देणे घाईचे ठरेल, असे एनसीईआरटी स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :Indiaभारत