शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Bandh : "शेतकरी घर सोडून 10 महिन्यांपासून रस्त्यावर पण आंधळ्या, बहिऱ्या सरकारला काहीच दिसत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 20:33 IST

Bharat Bandh And Rakesh Tikait : "हे तीन राज्यांचे आंदोलन असल्याचे म्हणणाऱ्यांनी डोळे उघडून पाहावं. पूर्ण देश शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. सरकारने शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा"

नवी दिल्ली - भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेला आजचा भारत बंद (Bharat Bandh) पूर्णपणे यशस्वी झाला. आपला संताप व्यक्त करण्यासाठी देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरले. देशातील हजारो ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. शेतकऱ्यांबरोबरच कामगार, व्यापारी, कर्मचारी संघटनांचाही पाठिंबा मिळाला. देशातील राजकीय पक्षांनीही बंदला पाठिंबा दिला असा दावा  केला आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत शेतकरी बंदला पाठिंबा मिळाला. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कुठेही हिंसक झडप झाली नाही. यासाठी देशातील शेतकरी, मजूर आणि नागरिकांचे राकेश टिकैत यांनी आभार मानले.

"हे तीन राज्यांचे आंदोलन असल्याचे म्हणणाऱ्यांनी डोळे उघडून पाहावं. पूर्ण देश शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. सरकारने शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा. उत्तर प्रदेशात वाढवलेले ऊसाचे दर हे शेतकऱ्यांची चेष्टा करणारे आहेत. त्याविरोधातही लवकरच रस्त्यावर आंदोलन करण्यात येईल" असा इशारा राकेश टिकैत यांनी दिला आहे. "भारत बंद दरम्यान स्वाभाविकपणे नागरिकांना त्रास झाला असेल. पण एक दिवस शेतकऱ्यांच्या नावे, असं समजून त्यांनी विसरून जावं. शेतकरी आपली घरे सोडून 10 महिन्यांपासून रस्त्यावर उतरले आहेत. पण आंधळ्या आणि बहिऱ्या सरकारला काहीच दिसत नाही किंवा ऐकायला येत नाही. लोकशाहीत निषेध करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही."

"शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत"

"शेतकरी रिकाम्या हाताने घरी परततील, या भ्रमात त्यांनी राहू नये. आजूनही शेतकरी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत" असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारतीय किसान युनियनच्या भानु गटाने राकेश टिकैत (Rakesh Tikait) आणि भारत बंद करणाऱ्या शेतकरी नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भारतीय किसान युनियन भानु गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष भानु प्रताप सिंह (Bhanu Pratap Singh) यांनी राकेश टिकैत यांनी पुकारलेल्या आजच्या भारत बंदवर निशाणा साधत हा तालिबानी बंद असल्याचं म्हटलं आहे. 

"भारत बंद करून राकेश टिकैत यांना दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन द्यायचे आहे का?"

"शेतकरी नेत्यांच्या या भारत बंदचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. भारत बंद करून राकेश टिकैत यांना दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन द्यायचे आहे का? तालिबान या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानवर कब्जा केला. राकेश टिकैत यांनाही भारतात अशाच प्रकारच्या कारवाया वाढवायच्या आहेत. त्यांचा हेतू योग्य वाटत नाही" असा गंभीर आरोप अध्यक्ष भानु प्रताप सिंह यांनी केला आहे. तसेच "राकेश टिकैत स्वतःला शेतकरी नेता म्हणवतात आणि नंतर भारत बंदची घोषणा करतात. मात्र, यामुळे अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांवर परिणाम होतो. याचा कोणाला फायदा होईल? अशा प्रकारचे आंदोलनं सुरू ठेवून ते तालिबानच्या पावलावर पाऊल टाकत आहेत" असंही म्हटलं आहे. 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलनIndiaभारतBharat Bandhभारत बंद