शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Bhagwant Mann: भगवंत पावले... पंजाब सरकारचा आणखी एक निर्णय, गरिबांना घरपोच रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 13:41 IST

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी रेशन दुकानांवर लागणाऱ्या रांगांची झंडटच संपुष्टात आणली आहे.

चंडीगड - आम आदमी पक्षाचा (AAP) पंजाब विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय झाला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Maan) यांनी सत्तेवर येताच मोठ-मोठे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. पंजाबमध्ये 35,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी नोकरीवर घेण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी मंगळवारी केली. त्यानंतर, माजी आमदारांना केवळ एकच टर्मची पेन्शन, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, असे एका पाठोपाठ एक निर्णय आप सरकारने घेतले. त्यानंतर, आता गरीब व सर्वसामान्यांसाठीचा निर्णय पंजाब सरकारने जाहीर केला.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी रेशन दुकानांवर लागणाऱ्या रांगांची झंडटच संपुष्टात आणली आहे. गरिबांना रेशन दुकानावर रांग लावून धान्य घ्यावं लागत होतं. मात्र, आता रेशन दुकानदारांकडूनच घरपोच धान्य देण्यात येणार आहे. घरपोच रेशन देण्याचा मोठा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे पुरवठा खात्यातील अधिकाऱ्यांवरच ही जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी दिल्लीतील केजरीवाल सरकारनेही या योजनेची घोषणा केली होती. मात्र, केंद्र सरकारने दिल्लीत या योजनेला स्थगिती दिली होती. आता, पंजाबमध्ये आप सरकारने ही योजना घोषित केली असून याची अंमलबजावणी करण्याचे काम मान सरकारला करायचं आहे. विशेष म्हणजे सरकारच्या या योजनेत रेशन कार्डधारकांना गव्हाच्या ऐवजी गव्हाचे पीठ देण्यात येणार आहे. तसेच, पूर्वीपेक्षा स्वच्छ आणि चांगला तांदुळ लोकांना घरपोच मिळणार आहे. त्यासाठी, बायोमेट्रीक पद्धतीचा अवलंब होणार असून केवळ लाभार्थ्यांनाच हे धान्य मिळेल.   दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच, दिल्लीत या योजनेला केंद्रातील भाजप सरकारने स्थिगिती दिल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. तसेच, घोषणेनंतर आता पंजाब सरकारला या योजनेवरील अंमलबजावणीसाठी काम करायचं आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :AAPआपBhagwant Mannभगवंत मानBJPभाजपाPunjabपंजाबchandigarh-pcचंडीगढ़