शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 12:47 IST

भागलपूर जिल्ह्यात बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहे.

ठळक मुद्देभागलपूर जिल्ह्यात बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहे. आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

भागलपूर - बलात्काराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. बिहारमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भागलपूर जिल्ह्यात बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील भागलपूरमध्ये एका 22 वर्षीय बलात्कार करण्यात आला. त्यानंतर आरोपीने पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहे. आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

भागलपूल जिल्ह्यातील शिवनारायणपूर पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली. बुधवारी (5 जून) नवटोलिया गावात 22 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर आरोपीने केलेल्या गुन्ह्याचा पुरावा मागे राहू नये यासाठी पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे संबंधित तरुणीच्या भाऊजीनेच हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये तरुणी 65 टक्के भाजली आहे. तरुणीला तातडीने उपचारासाठी जेएलएनएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 

बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका तरुणाला जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला होता. विवाहीत महिलेशी लग्न केलं म्हणून एका तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली होती. ओरलहिया गावात ही घटना घडली. श्रवण महतो असे मृत तरुणाचे नाव असून तो ओरलहिया गावाचा रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, श्रवणचे एका महिलेशी लग्न झाले होते. मात्र गावातील दुसऱ्या एका विवाहीत महिलेशी त्याचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे श्रवणने आपल्या पहिल्या पत्नीला सोडून विवाहीत महिलेशी पळून जावून लग्न केलं होतं. काही दिवस ते दोघेही फरार होते. मात्र काही दिवसांनी ते पुन्हा गावात परतले आणि पंचायतीकडे त्यांना गावात परत घेण्याची विनंती केली होती. श्रवणने पळून जाऊन लग्न केल्यामुळे तिच्या पहिल्या पत्नीचे नातेवाईक नाराज झाले होते. संतापाच्या भरात त्यांनी श्रवणला बेदम मारहाण करत पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये 70 टक्क्यांहून अधिक भाजल्याने श्रवणचा मृत्यू झाला होता. 

 

टॅग्स :Biharबिहारfireआग