शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

सावधान! ‘हेपॅटायटीसने राेज ३,५०० जणांचा होतोय मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 05:46 IST

जागतिक आरोग्य संघटना: भारतात २०२२ मध्ये साडेतीन कोटींपेक्षा जास्त प्रकरणे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : संसर्गामुळे होणाऱ्या अनेक आजारांमध्ये ‘हेपॅटायटीस’ या आजाराचा समावेश होतो. या आजारातूनच काविळसारखा गंभीर आजार होऊ शकतो. २०२२ मध्ये भारतात हेपॅटायटीसची ३.५ कोटींपेक्षा जास्त प्रकरणे होती, जी त्यावर्षी जागतिक स्तरावर एकूण प्रकरणांपैकी ११.६ टक्के होती. आता हे प्रमाण चीनखालोखाल दुसऱ्याच क्रमांकावर आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२४ च्या जागतिक हेपॅटायटीस अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे. या रोगाचे प्रमुख लक्षण म्हणजे यकृताला सूज येणे. दरवर्षी सुमारे १३ लाख लोकांचा मृत्यू या आजाराने होतो, असे अहवालात म्हटले आहे.

आकडेवारी बोलते...nभारतामध्ये २०२२ मध्ये २.९८ कोटी हेपॅटायटीस बी, हेपेटायटीस सी संसर्गाची संख्या ५५ लाख.nभारतात २०२२ मध्ये ९८,३०५ लोक ‘हेपॅटायटीस बी’मुळे मरण पावले, तर २६,२०६ लोक ‘हेपेटायटीस सी’ने मरण पावले.

मृत्युंची संख्या २ लाखांनी वाढलीहेपॅटायटीसमुळे झालेल्या मृत्युंची अंदाजे संख्या २०१९ मध्ये ११ लाखांवरून २०२२ मध्ये १३ लाख झाली. जगभारत हेपॅटायटीस बी आणि सी संसर्गामुळे दररोज ३,५०० लोक मृत्युमुखी पडत आहेत.

देशातील संक्रमित लोकांपैकी केवळ २.४ टक्के लोकांचे वेळेवर निदान.

हिपॅटायटीस कारणे...हेपॅटायटीस बी आणि सी असुरक्षित इंजेक्शन पद्धतींद्वारे आणि दूषित सीरिंज आणि सुया, संक्रमित रक्त आणि रक्त उत्पादने, लैंगिक संक्रमण, संक्रमित आईपासून बाळापर्यंत प्रसार होतो.

निदान होत नाही हेच मोठे कारणहेपॅटायटीस संसर्ग रोखण्यात जागतिक स्तरावर प्रगती होऊनही मृत्यूदर मात्र वाढत आहे. कारण हेपॅटायटीस असलेल्या फारच कमी लोकांचे निदान आणि उपचार वेळेवर केले जातात, असे डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस ॲधानोम गेब्रेयसस यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाMedicalवैद्यकीय