शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff; लेहसोबत आता समुद्रात भारताने दाखवली ताकद; चीनला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 10:06 IST

अंदमान आणि निकोबार बेटांवर भारताचा युद्ध सराव करण्याला विशेष महत्त्व आहे. कारण याठिकाणाहून चिनी समुद्री मार्गाने जात असतात.

ठळक मुद्देलडाखमध्ये चर्चेनंतरही चिनी कुरापती सुरुच असल्याने भारत सतर्क समुद्रात भारतीय नौदलाने युद्धसराव करुन चीनला दिला इशारा चिनी व्यापारी हालचाली असणाऱ्या अंदमान व निकोबार बेटांजवळ नौदलाचा युद्धसराव

नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यातील तणाव अद्यापही पूर्णपणे संपुष्टात आला नाही. चिनी कुरापतींना उत्तर देण्यासाठी भारतीय जवान सज्ज आहेत. दुसरीकडे अरबी समुद्रात ड्रीलच्या माध्यमातून चीनला योग्य संदेश देण्याचं काम भारताने केले आहे. भारतीय नौदलाने अंदमान आणि निकोबार बेटांवर कवायती करुन भारत दडपशाहीला बळी पडणार नाही असा इशाराच चीनला दिला आहे.

अंदमान आणि निकोबार बेटांवर भारताचा युद्ध सराव करण्याला विशेष महत्त्व आहे. कारण याठिकाणाहून चिनी समुद्री मार्गाने जात असतात. अनेक व्यापारी कार्यवाही येथे केली जाते. चीनसाठी हा सराव दुहेरी हल्ल्यासारखा असू शकतो. कारण यापूर्वी अमेरिकेने दक्षिण चिनी समुद्रात दोन एअरक्राफ्ट लढाऊ विमानांसह सराव करत आहेत. चीनला त्यांना धमकी देण्याशिवाय काहीच करता येत नाही.

या बेटांवर भारतीय नौदल युद्धसराव करत आहे. यात विनाशक, पेट्रोल विमान आणि पाणबुड्यांचा समावेश आहे. या सरावाचं नेतृत्व करणारे पूर्वेकडील नौदल कमांडचे प्रमुख रियर एडमिरल संजय वत्सयन म्हणाले की, मल्लकाजवळ असणारी काही युद्धनौकाही यात सामील झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सबमरीन शोधणाऱ्या एअरक्राफ्ट Poseidon 81,ज्यात घातक ब्लॉक मिसाइल लावण्यात आलं आहे. MK 54 लाइटवेज टोरपीडोज यांचाही युद्धसरावत समावेश आहे. यापूर्वी मल्लकामध्ये भारत आणि जपानने मागील महिन्यात सराव केला होता.

गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमधील तणावपूर्ण परिस्थितीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी लेह येथे पोहोचले. त्यांच्यासमवेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे होते. पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर संरक्षणमंत्र्यांचा लेह दौरा आता खूप महत्वाचा मानला जात आहे.  पूर्व लडाखमध्ये ५ मेपासून भारतीय आणि चिनी सैन्याच्या दरम्यान संघर्ष सुरू आहे. गलवान खोऱ्यात दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले त्यानंतर हा तणाव वाढला. दरम्यान, कित्येक बैठकानंतर मुत्सद्दी व सैनिकी चर्चेनंतर दोन्ही बाजूंच्या सैन्य ६ जुलैपासून तणावग्रस्त परिसरातून मागे हटण्यास सुरुवात झाली आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावAmericaअमेरिकाIndiaभारतchinaचीन