शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

India China FaceOff; लेहसोबत आता समुद्रात भारताने दाखवली ताकद; चीनला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 10:06 IST

अंदमान आणि निकोबार बेटांवर भारताचा युद्ध सराव करण्याला विशेष महत्त्व आहे. कारण याठिकाणाहून चिनी समुद्री मार्गाने जात असतात.

ठळक मुद्देलडाखमध्ये चर्चेनंतरही चिनी कुरापती सुरुच असल्याने भारत सतर्क समुद्रात भारतीय नौदलाने युद्धसराव करुन चीनला दिला इशारा चिनी व्यापारी हालचाली असणाऱ्या अंदमान व निकोबार बेटांजवळ नौदलाचा युद्धसराव

नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यातील तणाव अद्यापही पूर्णपणे संपुष्टात आला नाही. चिनी कुरापतींना उत्तर देण्यासाठी भारतीय जवान सज्ज आहेत. दुसरीकडे अरबी समुद्रात ड्रीलच्या माध्यमातून चीनला योग्य संदेश देण्याचं काम भारताने केले आहे. भारतीय नौदलाने अंदमान आणि निकोबार बेटांवर कवायती करुन भारत दडपशाहीला बळी पडणार नाही असा इशाराच चीनला दिला आहे.

अंदमान आणि निकोबार बेटांवर भारताचा युद्ध सराव करण्याला विशेष महत्त्व आहे. कारण याठिकाणाहून चिनी समुद्री मार्गाने जात असतात. अनेक व्यापारी कार्यवाही येथे केली जाते. चीनसाठी हा सराव दुहेरी हल्ल्यासारखा असू शकतो. कारण यापूर्वी अमेरिकेने दक्षिण चिनी समुद्रात दोन एअरक्राफ्ट लढाऊ विमानांसह सराव करत आहेत. चीनला त्यांना धमकी देण्याशिवाय काहीच करता येत नाही.

या बेटांवर भारतीय नौदल युद्धसराव करत आहे. यात विनाशक, पेट्रोल विमान आणि पाणबुड्यांचा समावेश आहे. या सरावाचं नेतृत्व करणारे पूर्वेकडील नौदल कमांडचे प्रमुख रियर एडमिरल संजय वत्सयन म्हणाले की, मल्लकाजवळ असणारी काही युद्धनौकाही यात सामील झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सबमरीन शोधणाऱ्या एअरक्राफ्ट Poseidon 81,ज्यात घातक ब्लॉक मिसाइल लावण्यात आलं आहे. MK 54 लाइटवेज टोरपीडोज यांचाही युद्धसरावत समावेश आहे. यापूर्वी मल्लकामध्ये भारत आणि जपानने मागील महिन्यात सराव केला होता.

गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमधील तणावपूर्ण परिस्थितीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी लेह येथे पोहोचले. त्यांच्यासमवेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे होते. पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर संरक्षणमंत्र्यांचा लेह दौरा आता खूप महत्वाचा मानला जात आहे.  पूर्व लडाखमध्ये ५ मेपासून भारतीय आणि चिनी सैन्याच्या दरम्यान संघर्ष सुरू आहे. गलवान खोऱ्यात दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले त्यानंतर हा तणाव वाढला. दरम्यान, कित्येक बैठकानंतर मुत्सद्दी व सैनिकी चर्चेनंतर दोन्ही बाजूंच्या सैन्य ६ जुलैपासून तणावग्रस्त परिसरातून मागे हटण्यास सुरुवात झाली आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावAmericaअमेरिकाIndiaभारतchinaचीन