शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

बापरे! प्रेमात धोका मिळताच उच्च शिक्षित तरुण झाला भिकारी; मग पोलिसांनी केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 17:51 IST

प्रेमात फसवणूक झाल्यानंतर तरुणाने आपले कुटुंब सोडून मुंबईत भीक मागायला सुरुवात केली.

पोलिसांनी 37 वर्षीय व्यक्तीची आपल्या कुटुंबीयांशी पुन्हा भेट घडवून आणली आहे. प्रेमात फसवणूक झाल्यानंतर तरुणाने आपले कुटुंब सोडून मुंबईत भीक मागायला सुरुवात केली. एका रिपोर्टनुसार, हा तरुण केरळमधून आपले घर आणि कुटुंब सोडून एक वर्षापूर्वी एका महिलेच्या शोधात मुंबईत पोहोचला होता. या तरुणाची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या महिलेशी ओळख झाली. पोलिसांचे म्हणणे आहे की, हा तरुण मुंबईत आल्यानंतर या महिलेला भेटला. पण पहिल्या भेटीनंतर महिलेने नातं तोडलं.

मन दुखावल्यानंतर तो तरुण डिप्रेशनमध्ये गेला आणि घरी परतलाच नाही. मिड-डेच्या रिपोर्टनुसार, त्यानंतर हा तरुण घरी परतला नाही आणि मुंबईत भीक मागू लागला. मुंबई पोलिसांनी भीकविरोधी मोहिमेदरम्यान त्याला पकडले. आधार कार्डद्वारे त्याची संपूर्ण माहिती काढण्यात आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील कोल्लम करुणागप्पल्ली येथील रहिवासी असलेल्या 37 वर्षीय व्यक्तीचं नाव अनूप राजशेखरन असं  आहे. 

अनूपने एक्वा कल्चर आणि फिशरीज सायन्समध्ये मास्टर्स पूर्ण केले आहे. तो जानेवारी 2022 पासून बेपत्ता होता. नोकरीच्या शोधात जात असल्याचे पालकांना सांगून हा तरुण मुंबईत आला, मात्र परत आलाच नाही. 18 मार्च रोजी जुहू पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने एका भिकाऱ्याला पोलीस ठाण्यात आणले. तेथे पोलिसांनी त्याला पत्ता विचारला. त्यानंतर त्याने पोलिसांना आपले कुटुंब नसल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या बॅगची झडती घेतली असता एक आधारकार्ड आणि मल्याळममध्ये लिहिलेले पत्र सापडलं.

पत्रात लिहिलेला पत्ता तपासल्यानंतर पोलिसांनी केरळमधील करुणागपल्ली पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीचे रेकॉर्ड तपासले. मिड-डेच्या रिपोर्टनुसार, जुहू पोलिसांनी केरळ पोलिसांना अनूपचा फोटोही पाठवला होता. जुहू पोलिस स्टेशनमधील पोलिस उपनिरीक्षकाने अनूपच्या कुटुंबाचा शोध घेतला आणि त्यांचे तपशील त्याचे वडील राजशेखरन कुटपन यांच्याशी शेअर केले. यानंतर कुटुंबीयांशी भेट झाली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :KeralaकेरळMumbaiमुंबईPoliceपोलिस