शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

"मित्राला लग्नासाठी मुलगी मिळत नाही"; राहुल गांधींकडे केली जलसंकट सोडवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 12:08 IST

बंगळुरूमध्ये भीषण जलसंकट पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एका व्यक्तीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पाणीटंचाईची ही समस्या सोडवावी असं म्हणत त्यांना टॅग केलं.

कर्नाटकातील बंगळुरूमध्ये भीषण जलसंकट पाहायला मिळत आहे. भारताची टेक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरातील अनेक जलसाठे उन्हाळ्यापूर्वीच कोरडे पडले आहेत. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांना पाण्याचे टँकर घेण्यासाठी अनेक पटींनी जास्त दर मोजावे लागत आहे. याच दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एका व्यक्तीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पाणीटंचाईची ही समस्या सोडवावी असं म्हणत त्यांना टॅग केलं. एवढच नाही तर त्यामागील व्यक्तीने दिलेल्या कारणामुळे ही पोस्ट व्हायरल होत आहे.

ट्विटरवरील पोस्टमध्ये नरेंद्र नावाच्या व्यक्तीने म्हटलं आहे की, "राहुल गांधीजी, कृपया बंगळुरूचं जलसंकट दूर करण्यासाठी प्राधान्याने महत्त्वाची पावलं उचला. बंगळुरूमध्ये आयटी उद्योगात काम करणाऱ्या माझ्या एका मित्राने अलीकडेच त्याचा अनुभव शेअर केला. तो म्हणाला. लग्नासाठी मुलगी शोधत आहे, पण बंगळुरूमध्ये जलसंकटामुळे कोणीही त्याच्याशी लग्न करायला तयार नाही."

बंगळुरूमध्ये तीव्र पाणीटंचाई असताना, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सोमवारी सांगितलं की, गेल्या तीन-चार दशकांत राज्यात इतका भीषण दुष्काळ पडला नाही. यापूर्वीही दुष्काळ पडला होता, मात्र एवढ्या मोठ्या संख्येने तालुके आम्ही दुष्काळग्रस्त म्हणून कधीच जाहीर केले नव्हते.

ते म्हणाले, जिथे कावेरी नदीच्या पाण्याचा पुरवठा करायचा आहे, तेथे ते पुरवले जात आहे, परंतु बंगळुरूमधील सुमारे 13,900 बोअरवेलपैकी सुमारे 6,900 बोअरवेल्स कार्यरत नाहीत. सरकारने गोष्टी आपल्याकडे घेतल्या आहेत आणि पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची व्यवस्था केली आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीwater scarcityपाणी टंचाई