शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्यांनाही सांगतायत राजकीय हत्या; अमित शाह यांना ममतांचं थेट प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 18:02 IST

ममता बॅनर्जी यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला. त्या म्हणाल्या, भाजप बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत मोठ-मोठ्या गप्पा मारते. मात्र, बंगालला सर्वात सुरक्षित शहराचा दर्जा मिळाला आहे.

कोलकाता -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. "बंगाल दौऱ्यावेळी गृह मंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालचे चुकीचे चित्र दर्शवले असल्याचे म्हणत, राज्यातील राजकीय हिंसाचार आता कमी झाला आहे. मात्र, आत्महत्यानादेखील राजकीय हत्या असल्याचे म्हटले जात आहे. एवढेच नाही, तर भाजप पती-पत्नीच्या भांडणांनाही राजकीय भांडण असल्याचे म्हणत आहे," असे ममतांनी म्हटले आहे.

ममता म्हणाल्या, पश्चिम बंगाल अनेक मानकांवर केंद्रापेक्षा अधिक चांगले काम करत आहे. बंगाल 100 दिवसांचे काम देण्यात, ग्रामीण भागातील गृहनिर्माण, ग्रामीण भागातील रस्ते, ई टेंडरिंग आणि ई गव्हर्नन्सच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे. एवढेच नाही, तर बंगालचा जीडीपी त्यांच्या कार्यकाळात 2.6 पट वाढला असून बंगालमध्ये 1 कोटी नोकऱ्या  तयार करण्यात आल्या आहेत.

आत्महत्यांनाही राजकीय हत्या म्हणतात - ममताममता बॅनर्जी यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला. त्या म्हणाल्या, भाजप बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत मोठ-मोठ्या गप्पा मारते. मात्र, बंगालला सर्वात सुरक्षित शहराचा दर्जा मिळाला आहे. मात्र, बंगाल दौऱ्यावर आलेले गृह मंत्री आत्महत्यांनाही राजकीय हत्या सांगत आहेत. एवढेच नाही, तर भाजप पती-पत्नीच्या भांडणांनाही राजकीय रंग देत आहे. 

ममतांनी राज्य सरकारची आकडेवारी सादर करत सांगितले, की राज्यात 383 माओवाद्यांनी सरेंडर केले आहे. केएलओशी संबंधित 370 जणांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. नक्षल प्रभावित भागांत आणि जंगलमहलमध्ये शांतता आहे. तसेच राज्यात शांततामयरित्या सण-उत्सव साजरे होत आहेत. याशिवाय राज्यातील शाळांचा ड्रॉपआऊट दर कमी झाला आहे. तसेच शिशू मृत्यू दरही 34 टक्यांवरून 22 टक्क्यांवर आला आहे.

अमित शाहंनी मी दिलेले आकडे खोटे सिद्ध करावेत -गृहमंत्री अमित शाह यांनी मी सांगितलेले आकडे खोटे सिद्ध करून दाखवावेत. बंगालमध्ये 99 टक्के शाळांत टॉयलेटची व्यवस्था आहे. अमित शाह यांना त्यांचा दौरा करायची इच्छा आहे? असेल तर आम्ही त्या शाळा आधी सॅनिटाईझ करून देऊ, असा टोलाही ममता यांनी यावेळी लगावला.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालAmit Shahअमित शहाBJPभाजपा