शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

पीएम किसान योजनेचे महाराष्ट्रातील लाभार्थी घटले; निकषात नाहीत, २२.४० लाख शेतकरी वगळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 06:31 IST

पीएम किसानअंतर्गत महाराष्ट्रात १.०८ कोटीपेक्षा जास्त लाभार्थी होते. ज्यांना दरवर्षी केंद्र सरकारकडून ६००० रुपये प्रति वर्ष मिळत होते.

- हरीश गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पीएम किसान योजनेंतर्गत लाभार्थींची सर्वाधिक घट महाराष्ट्रात झाली आहे. राज्यात चार वर्षांच्या कालावधीत २२.४० लाख शेतकरी या योजनेच्या यादीतून वगळण्यात आले आहेत. 

अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसानअंतर्गत महाराष्ट्रात १.०८ कोटीपेक्षा जास्त लाभार्थी होते. ज्यांना दरवर्षी केंद्र सरकारकडून ६००० रुपये प्रति वर्ष मिळत होते. तथापि, लाभार्थ्यांची संख्या वेगाने घसरू लागली आणि ८५.६० लाखांवर आली. २०२३-२४ मध्ये जुलै २०२३ पर्यंत ही घसरण वाढत गेली. लाभार्थ्यांची संख्या २२.४० लाखांनी कमी झाली आहे. 

या योजनेअंतर्गत ६००० रुपये २००० च्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केले जातात. जमीन, बँक खात्यांशी आधार लिंक असणे आणि इतर निकष तपासल्यानंतर ही संख्या खाली आली आहे. महाराष्ट्रात ही संख्या २०२०-२१ मध्ये १.०८ कोटींवरून २०२२-२३ मध्ये १.०४ कोटी आणि जुलै २०२३ पर्यंत ८५.४० लाखांवर आली आहे. 

सर्वाधिक लाभार्थी अहमदनगरमध्ये आकडेवारीनुसार पीएम किसान योजनेअंतर्गत सर्वांत जास्त लाभार्थी अहमदनगरमध्ये ५.१७ लाख आहेत. त्यानंतर सोलापूरमध्ये ४.५४ लाख, कोल्हापूर ४.०६ लाख, बीड व पुण्यात ३.८९ लाख, नागपूर १.५० लाख, नाशिक ३.८५ लाख, छत्रपती संभाजीनगर ३.२६ लाख आणि यवतमाळमध्ये २.७७ लाख लाभार्थी आहेत. या योजनेचे ३४ जिल्ह्यांत लाभार्थी आहेत.  

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना