बेळगाव शहराला पुन्हा अशांततेचे ग्रहण, तुफान दगडफेक हानीमारीनंतर जनजीवन पूर्व पदावर दोन्ही गटातील २९ जणांना अटक
By Admin | Updated: June 10, 2014 01:50 IST2014-06-10T00:55:54+5:302014-06-10T01:50:29+5:30
बेळगाव : रविवारी रात्री साडे अकरा वाजता खडक गल्ली, चांदू गल्ली आणि जालगार गल्लीत समाजकंटकानी दगडफेक आणि सोड्याच्या बाटल्या फोडल्याने संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला असून दगडफेकीत काही लोक आणि पोलीसही जखमी झाले आहेत. तणाव निर्माण झालेल्या परिसरात दोन दिवस जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे . सार्वजनिक शांतता भंग केल्या प्रकरणी दोन्ही गातील मिळून २९ जणांना पोलिसांनी अटक करून कारागृहात रवानगी केली आहे

बेळगाव शहराला पुन्हा अशांततेचे ग्रहण, तुफान दगडफेक हानीमारीनंतर जनजीवन पूर्व पदावर दोन्ही गटातील २९ जणांना अटक
बेळगाव : रविवारी रात्री साडे अकरा वाजता खडक गल्ली, चांदू गल्ली आणि जालगार गल्लीत समाजकंटकानी दगडफेक आणि सोड्याच्या बाटल्या फोडल्याने संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला असून दगडफेकीत काही लोक आणि पोलीसही जखमी झाले आहेत. तणाव निर्माण झालेल्या परिसरात दोन दिवस जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे . सार्वजनिक शांतता भंग केल्या प्रकरणी दोन्ही गातील मिळून २९ जणांना पोलिसांनी अटक करून कारागृहात रवानगी केली आहे
सोमवारी सकाळी खडक गल्ली परिसरात मोठ्याप्रमणात पोलिस बंदोबास्त लावण्यात आला होता. या भगात ये जा करणार्यांची कसून तपासणी करण्यात येत होती. या भागातील दंगलीचे परिणाम म्हणून शहरातील अर्ध्याहून अधिक दुकाने बंद होती. दुपारनंतर जास्त लोक बाहेर न पडल्यामुळे बाजारपेठेत अनेक व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेवणेच पसंद केले होते. बेळगाव शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. खाजगी आणि सरकारी शाळातूनही अर्धी मुले गैरहजर होती. त्यामुळे दुपारनंतर सर्वच शाळांना देखील सुी देण्यात आली मात्र तणाव हा शहरात जाणवत होता.
या घटनेत वीसहून अधिक वाहनांची समाजकंटकानी मोडतोड केली असून तीसहून अधिक व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उत्तर विभागाचे आय. जी. पी. भास्कर राव यांनी जनतेला अफवावर विश्वास ठेवू नये. आपापले दैनंदिन व्यवहार सुरळीत पार पाडावेत, असे आवाहन केले आहे . खडेबाजार अिाण मार्केट पोलिस स्थानकाच्या हद्दीत १४४ कलम लागू करण्यात आले आहे.
सदर परिसर अत्यंत संवेदनशील मानला असल्यामुळे घटनेचे वृत्त समजताच जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. चंद्रगुप्त आणि अधिकार्यांनी तेथे घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. यावेळी पोलिसांनी दरवाजे मोडून घरात झोपलेल्या तरु णांना अटक केली. पोलिसांचा धुडगूस महिला तर बेशुद्धच पडली. अनेकांना पोलिसांनी झोडपून काढले. पोलिसांच्या धरपकड सत्रामुळे संतापलेल्या महिलांनी जिल्हा पोलिस प्रमुखावर प्रश्नांचा भडीमार केला संतापलेल्या जिल्हा पोलिस प्रमुखांनी निरपराध असतील तर चौकशी करून सोडू. पोलिसांना त्यांचे काम करू द्या असे सांगितले .
सोमवारी सकाळी पोलिसांनी संपूर्ण भागाची नाकाबंदी केली असून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोमवारी दिवसभर शहरात अफवांना उत आला होता. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी वातावरणात तणाव आहे. आठवड्यापूर्वी अनगोळ भागात तणाव निर्माण झाला होता. तेव्हापासून शहरात किरकोळ घटना घडून तणाव निर्माण होत आहे.