शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

काँग्रेसच्या आमदारांचे धरणे आंदोलन मागे; मुख्यमंत्र्यांनी घेतला आक्रमक पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 02:14 IST

विधानसभा अधिवेशनाचा करणार ठराव

जयपूर : राजस्थानच्या राजकारणात शुक्रवारचा दिवस नाट्यमय घडामोडींनी गजबजून गेला. विधानसभेचे अधिवेशन राज्यपालांनी तातडीने बोलवावे व आपल्याला बहुमत सिद्ध करू द्यावे, या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत व काँग्रेस आमदारांनी राजभवनात दिवसभर ठिय्या आंदोलन केले.

तंबू ठोकून रात्रभर आमदार तेथेच ठिय्या धरण्याच्या तयारीत होते. पण राज्यपाल कविराज मिश्रा यांनी अधवेशन बोलावण्यास तयार आहोत, पण सरकारने काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्यात आणि आपल्या शंजांचे निराकरण करावे, असे सांगितल्यानंतर हे आंदोलन संध्याकाळी मागे घेण्यात आले.

विधानसभा अधिवेशनाचा ठराव करण्यासाठी, अन्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि राज्यपालांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर तयार करण्यासाठी मुख्यमंत्री गेहलोत यांनी शनिवारी सकाळी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. पक्ष प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली.

राष्ट्रपती राजवटीची चर्चा

नवी दिल्ली : राज्यपालांनी अधिवेशन न बोलावल्यास जनता रस्त्यावर उतरली आणि लोकांनी राज भवनाला घेराव घातल्यास त्यास आपण जबाबदार नसू, या अशोक गेहलोत यांचे विधान म्हणजे राज्यपालांना दिलेली धमकीच आहे, असे केंद्र सरकार व भाजप नेते यांना वाटते आहे.

गेहलोत यांच्याशी विधानामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, हे कारण दाखवून, राष्ट्रपती राजवट आणण्याचा विचार दिल्लीत सुरू असल्याचे कळते. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी आपला अहवाल केंद्राला पाठवला आहे. मात्र त्यात काय म्हटले आहे, हे समजू शकले नाही.

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोत