शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधींच्या सांगण्यावरून सावरकरांनी इंग्रजांकडे दया याचिका केली; इतिहासकार संपत यांनी शेअर केलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 18:52 IST

गांधी सेवाग्राम आश्रमाच्या वेबसाइटवर महात्मा गांधी यांच्या कामांसंदर्भात देण्यात आलेल्या माहितीचे कलेक्शन (Gandhi Literature: Collected Works of Mahatma Gandhi)मध्ये महात्मा गांधींनी एनडी सावरकर अर्थात सावरकरांच्या भावाला लिहिलेल्या पत्राचा उल्लेख आहे.

नवी दिल्ली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सावरकर आणि महात्मा गांधी यांच्यासंदर्भात केलेल्या एका वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर, आता इतिहासकार विक्रम संपत यांनी यासंदर्भात पुरावा दिला आहे. एवढेच नाही, तर त्यांनी पुस्तकातील काही पानंही शेअर केली आहेत. ज्यावरून महात्मा गांधी यांनी सावरकरांना दया याचिका दाखल करण्यासाठी सांगितले होते, हे स्पष्ट होते. संपत यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यानंतर उपस्थित करण्यात येत असलेल्या प्रश्नांना पुराव्यांसह उत्तर दिले आहे.

गांधी सेवाग्राम आश्रमाच्या वेबसाइटवर महात्मा गांधी यांच्या कामांसंदर्भात देण्यात आलेल्या माहितीचे कलेक्शन (Gandhi Literature: Collected Works of Mahatma Gandhi)मध्ये महात्मा गांधींनी एनडी सावरकर अर्थात सावरकरांच्या भावाला लिहिलेल्या पत्राचा उल्लेख आहे. महात्मा गांधींचे हे पत्र ‘कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी’च्या व्हॉल्यूम 19 मधील पान क्रमांक 348 वर आहे.

या पत्रात महात्मा गांधी यांनी एनडी सावरकरांना लिहिले आहे, की ‘प्रिय सावरकर, माझ्याकडे आपले पत्र आहे. आपल्याला सल्ला देणे कठीण आहे. पण, माझा सल्ला आहे, की आपण प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट करत एक संक्षिप्त याचिका तयार करा, ज्यातून हे स्पष्ट होऊ शकेल, की आपल्या भावाने केलेला गुन्हा हा पूर्णपणे राजकीय होता. या प्रकरणाकडे जनतेचे लक्ष आकर्षित करता यावे यासाठी मी हा सल्ला देत आहे. दरम्यान, मी आपल्याला आधीच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे, या प्रकरणात मी, आपल्या पद्धतीने पुढे पावले टाकत आहे.’

यानंतर महात्मा गांधींनी या प्रकरणाला मुद्दा बनविण्यासाठी ‘यंग इंडिया’मध्ये 26 मे 1920 रोजी एक लेखही लिहिला होता. इतिहासकार विक्रम संपत यांचे म्हणणे आहे, की जेव्हा गांधींचे पत्र आधीपासूनच उपलब्ध आहे, तर मग राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्यावर एवढा बवाल कशासाठी आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये सर्व पुरावे देत लिहिले आहे, की ‘मला आशा आहे, की गांधी आश्रमाने या पत्रांना चुकीच्या पद्धतीने सादर केले आहे, असे आपण म्हणणार नाही.'

सावरकरांसंदर्भात काय म्हणाले होते, राजनाथ सिंह?राजनाथ सिंह उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांच्या ‘वीर सावरकर हु कुड हॅव प्रीव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात म्हणाले होते, महात्मा गांधींच्या सांगण्यावरूनच तुरुंगात असताना सावरकरांनी इंग्रजांना दया याचिका लिहिली होती. ते म्हणाले, सावरकरांसंदर्भात विविध प्रकारच्या खोट्या गोष्टी पसरवल्या गेल्या. म्हटले गेले, की सावरकरांनी इंग्रजांकडे अनेक वेळा दयेसाठी याचिका लिहिल्या होत्या. मात्र, सत्य तर असे आहे, की सावरकरांनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरूनच दया याचिका दाखल केली होती. 

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरMahatma Gandhiमहात्मा गांधीRajnath Singhराजनाथ सिंहMohan Bhagwatमोहन भागवत