शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

महात्मा गांधींच्या सांगण्यावरून सावरकरांनी इंग्रजांकडे दया याचिका केली; इतिहासकार संपत यांनी शेअर केलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 18:52 IST

गांधी सेवाग्राम आश्रमाच्या वेबसाइटवर महात्मा गांधी यांच्या कामांसंदर्भात देण्यात आलेल्या माहितीचे कलेक्शन (Gandhi Literature: Collected Works of Mahatma Gandhi)मध्ये महात्मा गांधींनी एनडी सावरकर अर्थात सावरकरांच्या भावाला लिहिलेल्या पत्राचा उल्लेख आहे.

नवी दिल्ली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सावरकर आणि महात्मा गांधी यांच्यासंदर्भात केलेल्या एका वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर, आता इतिहासकार विक्रम संपत यांनी यासंदर्भात पुरावा दिला आहे. एवढेच नाही, तर त्यांनी पुस्तकातील काही पानंही शेअर केली आहेत. ज्यावरून महात्मा गांधी यांनी सावरकरांना दया याचिका दाखल करण्यासाठी सांगितले होते, हे स्पष्ट होते. संपत यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यानंतर उपस्थित करण्यात येत असलेल्या प्रश्नांना पुराव्यांसह उत्तर दिले आहे.

गांधी सेवाग्राम आश्रमाच्या वेबसाइटवर महात्मा गांधी यांच्या कामांसंदर्भात देण्यात आलेल्या माहितीचे कलेक्शन (Gandhi Literature: Collected Works of Mahatma Gandhi)मध्ये महात्मा गांधींनी एनडी सावरकर अर्थात सावरकरांच्या भावाला लिहिलेल्या पत्राचा उल्लेख आहे. महात्मा गांधींचे हे पत्र ‘कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी’च्या व्हॉल्यूम 19 मधील पान क्रमांक 348 वर आहे.

या पत्रात महात्मा गांधी यांनी एनडी सावरकरांना लिहिले आहे, की ‘प्रिय सावरकर, माझ्याकडे आपले पत्र आहे. आपल्याला सल्ला देणे कठीण आहे. पण, माझा सल्ला आहे, की आपण प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट करत एक संक्षिप्त याचिका तयार करा, ज्यातून हे स्पष्ट होऊ शकेल, की आपल्या भावाने केलेला गुन्हा हा पूर्णपणे राजकीय होता. या प्रकरणाकडे जनतेचे लक्ष आकर्षित करता यावे यासाठी मी हा सल्ला देत आहे. दरम्यान, मी आपल्याला आधीच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे, या प्रकरणात मी, आपल्या पद्धतीने पुढे पावले टाकत आहे.’

यानंतर महात्मा गांधींनी या प्रकरणाला मुद्दा बनविण्यासाठी ‘यंग इंडिया’मध्ये 26 मे 1920 रोजी एक लेखही लिहिला होता. इतिहासकार विक्रम संपत यांचे म्हणणे आहे, की जेव्हा गांधींचे पत्र आधीपासूनच उपलब्ध आहे, तर मग राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्यावर एवढा बवाल कशासाठी आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये सर्व पुरावे देत लिहिले आहे, की ‘मला आशा आहे, की गांधी आश्रमाने या पत्रांना चुकीच्या पद्धतीने सादर केले आहे, असे आपण म्हणणार नाही.'

सावरकरांसंदर्भात काय म्हणाले होते, राजनाथ सिंह?राजनाथ सिंह उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांच्या ‘वीर सावरकर हु कुड हॅव प्रीव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात म्हणाले होते, महात्मा गांधींच्या सांगण्यावरूनच तुरुंगात असताना सावरकरांनी इंग्रजांना दया याचिका लिहिली होती. ते म्हणाले, सावरकरांसंदर्भात विविध प्रकारच्या खोट्या गोष्टी पसरवल्या गेल्या. म्हटले गेले, की सावरकरांनी इंग्रजांकडे अनेक वेळा दयेसाठी याचिका लिहिल्या होत्या. मात्र, सत्य तर असे आहे, की सावरकरांनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरूनच दया याचिका दाखल केली होती. 

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरMahatma Gandhiमहात्मा गांधीRajnath Singhराजनाथ सिंहMohan Bhagwatमोहन भागवत