शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

बाबो! कर्ज काढून, जमीन विकून बायकोला शिकवलं, शिक्षण पूर्ण होताच 'तिने' नवऱ्याला सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 14:30 IST

एका तरुणाने आपली जमीन विकून आपल्या पत्नीला शिकवलं. मात्र पतीने आरोप केला आहे की, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पत्नीचा दृष्टिकोन बदलला आहे. तिला आता पती आणि सासरच्या लोकांसोबत राहायचं नाही

बिहारमधील बेगुसरायमध्ये एका तरुणाने आपली जमीन विकून आपल्या पत्नीला शिकवलं. मात्र पतीने आरोप केला आहे की, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पत्नीचा दृष्टिकोन बदलला आहे. तिला आता पती आणि सासरच्या लोकांसोबत राहायचं नाही. १५ जून रोजी महिलेने तिचे वडील आणि भावाला बोलावलं आणि घरातील सर्व सामान घेऊन माहेरी गेल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तिच्या सासूने सून, वडील व भावाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण बेगुसरायच्या अमारी गावातील आहे. येथे राहणाऱ्या बालेश्वर महतो यांचा मुलगा प्रिन्स आनंद याचं लग्न मनीषा हिच्यासोबत २४ एप्रिल २०१९ समस्तीपूरच्या विभूतीपूर पोलीस स्टेशन परिसरात झाला होता. मनीषा बारावी पास होती. सासरच्या घरी आल्यावर तिने पती आणि सासू-सासऱ्यांसमोर पुढचा कोर्स करण्याची इच्छा व्यक्त केली.

पती आणि सासरच्या मंडळींनी यानंतर कर्ज घेऊन सुनेला २०१९ साली पंजाबच्या अजित नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊन दिला. मनीषा कधी घरी तर कधी माहेरी राहायची. ती फक्त परीक्षा देण्यासाठी पंजाबला जात असे. याच दरम्यान, १४ नोव्हेंबर २०२१ रोजी तिला मुलगीही झाली. यानंतर मनीषाने समस्तीपूर आणि खगरिया येथे काम केलं.

डिसेंबर २०२३ मध्ये मनीषाने तिचे शिक्षण पूर्ण करताच आपल्या पतीसोबत राहण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये मोठा वाद सुरू झाला. अनेकवेळा पंचायत झाली, पण तोडगा निघाला नाही. त्यानंतर याप्रकरणी मनीषाची सासू सुलेखा यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

सुलेखा यांनी आरोप केला आहे की, १५ जून रोजी मनीषा तिचे वडील राजेंद्र महतो आणि भाऊ रोशन यांच्यासह ५-७ शस्त्रधारी लोकांसह आली होती. तिचं सामान घेण्यासोबतच माझ्याकडील २ लाख २५ हजार व ५० हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन ती निघून गेली.

१ जुलै रोजी पत्नीने प्रिन्सला फोन करून बोलावून त्याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिलं. याची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून प्रिन्सला पोलिसांच्या ताब्यातून सोडवलं. प्रिन्सच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की त्यांनी १० जुलै रोजी छोराही पोलीस ठाण्यात सून आणि तिचे वडील आणि भावाविरुद्ध तक्रार दाखल केली होती, परंतु पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. 

टॅग्स :marriageलग्नEducationशिक्षणBiharबिहार