शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

बाबो! कर्ज काढून, जमीन विकून बायकोला शिकवलं, शिक्षण पूर्ण होताच 'तिने' नवऱ्याला सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 14:30 IST

एका तरुणाने आपली जमीन विकून आपल्या पत्नीला शिकवलं. मात्र पतीने आरोप केला आहे की, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पत्नीचा दृष्टिकोन बदलला आहे. तिला आता पती आणि सासरच्या लोकांसोबत राहायचं नाही

बिहारमधील बेगुसरायमध्ये एका तरुणाने आपली जमीन विकून आपल्या पत्नीला शिकवलं. मात्र पतीने आरोप केला आहे की, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पत्नीचा दृष्टिकोन बदलला आहे. तिला आता पती आणि सासरच्या लोकांसोबत राहायचं नाही. १५ जून रोजी महिलेने तिचे वडील आणि भावाला बोलावलं आणि घरातील सर्व सामान घेऊन माहेरी गेल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तिच्या सासूने सून, वडील व भावाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण बेगुसरायच्या अमारी गावातील आहे. येथे राहणाऱ्या बालेश्वर महतो यांचा मुलगा प्रिन्स आनंद याचं लग्न मनीषा हिच्यासोबत २४ एप्रिल २०१९ समस्तीपूरच्या विभूतीपूर पोलीस स्टेशन परिसरात झाला होता. मनीषा बारावी पास होती. सासरच्या घरी आल्यावर तिने पती आणि सासू-सासऱ्यांसमोर पुढचा कोर्स करण्याची इच्छा व्यक्त केली.

पती आणि सासरच्या मंडळींनी यानंतर कर्ज घेऊन सुनेला २०१९ साली पंजाबच्या अजित नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊन दिला. मनीषा कधी घरी तर कधी माहेरी राहायची. ती फक्त परीक्षा देण्यासाठी पंजाबला जात असे. याच दरम्यान, १४ नोव्हेंबर २०२१ रोजी तिला मुलगीही झाली. यानंतर मनीषाने समस्तीपूर आणि खगरिया येथे काम केलं.

डिसेंबर २०२३ मध्ये मनीषाने तिचे शिक्षण पूर्ण करताच आपल्या पतीसोबत राहण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये मोठा वाद सुरू झाला. अनेकवेळा पंचायत झाली, पण तोडगा निघाला नाही. त्यानंतर याप्रकरणी मनीषाची सासू सुलेखा यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

सुलेखा यांनी आरोप केला आहे की, १५ जून रोजी मनीषा तिचे वडील राजेंद्र महतो आणि भाऊ रोशन यांच्यासह ५-७ शस्त्रधारी लोकांसह आली होती. तिचं सामान घेण्यासोबतच माझ्याकडील २ लाख २५ हजार व ५० हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन ती निघून गेली.

१ जुलै रोजी पत्नीने प्रिन्सला फोन करून बोलावून त्याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिलं. याची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून प्रिन्सला पोलिसांच्या ताब्यातून सोडवलं. प्रिन्सच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की त्यांनी १० जुलै रोजी छोराही पोलीस ठाण्यात सून आणि तिचे वडील आणि भावाविरुद्ध तक्रार दाखल केली होती, परंतु पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. 

टॅग्स :marriageलग्नEducationशिक्षणBiharबिहार