शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

भीक मागणे गुन्हा नाही, तरी भिका-यांना पकडणे गरजेचे, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 01:38 IST

गरिबीने लाचार होऊन भीक मागणे हा गुन्हा असू नये, हे मान्य केले तरी सार्वजनिक ठिकाणी भीक मागणा-या व्यक्तीला अटक करून ताब्यात घेण्याची तरतूद कायद्यात हवी, अशी भूमिका केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात मांडली आहे.

नवी दिल्ली : गरिबीने लाचार होऊन भीक मागणे हा गुन्हा असू नये, हे मान्य केले तरी सार्वजनिक ठिकाणी भीक मागणा-या व्यक्तीला अटक करून ताब्यात घेण्याची तरतूद कायद्यात हवी, अशी भूमिका केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात मांडली आहे.भीक मागणे हा गुन्हा ठरविणारा कायदा रद्द केला जावा आणि भिकाºयांनाही मुलभूत मानवी हक्क आहेत हे मान्य करूनही त्यांच्या पोटापाण्याची व निवाºयाची व्यवस्था केली जावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका हर्ष मंदर आणि कर्णिका सहानी यांनी केली आहे. तेव्हा केंद्र सरकारने ही भूमिका मांडणारे प्रतिज्ञापत्र सादर केले.या भूमिकेवर न्यायाधीशांनी विचारले, कोणी स्वेच्छेने किंवा दुसºया कोणी जबरदस्ती केली म्हणून भीक मागतो का? इतर काही करणे शक्य असूनही ठरवून भीक मागणारा भिकारी कधी कोणी पाहिला आहे का? असा सवाल केंद्राच्या वकिलांना केला.यावर सरकारने म्हटले की, गरिबीने लाचार होऊन कोणी भीक मागत असेल तर त्याला गुन्हेगार ठरविले जाऊ नये, हे बरोबर आहे. पण त्याला भीक मागण्यास भाग पाडले का, याची शहानिशा करण्यासाठी ताब्यात घेण्याची तरतूद कायद्यात हवी. भिक्षा प्रतिबंधक कायद्यातील बदलासाठी राज्य सरकारांचे मत घेणे गरजेचे आहे. या प्रकरणावर उच्च न्यायालयात ९ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होईल.सर्वांत जुना कायदा मुंबईचादेशभर लागू होईल असा केंद्राचा भिक्षाप्रतिबंधक कायदा नाही. पूर्वीच्या मुंबई प्रांतिक सरकारने १९५९ मध्ये केलेला ‘बॉम्बे प्रीव्हेंशन आॅफ बेगिंग अ‍ॅक्ट’ हा सर्वात जुना व प्रमाणभूत कायदा आहे.बहुतांश राज्यांनी एक तर हाच कायदा स्वीकारला किंवा त्याआधारे कायदे केले. यानुसार भीक मागणे शिक्षापात्र गुन्हा आहे. त्यात पहिल्या गुन्ह्यासाठी तीन वर्षे व पुन्हा केलेल्या गुन्ह्यासाठी १० वर्षांपर्यंत कैदेची शिक्षा आहे. 

टॅग्स :GovernmentसरकारIndiaभारतSupreme Courtसर्वोच्च न्यायालय