शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

बाबरी पडण्याआधी पंतप्रधान राव यांना सतर्क केलं होतं, की...; शरद पवारांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 09:27 IST

यावेळी नीरजा चौधरी यांच्यासह अन्य पत्रकारांनी पंतप्रधान राव यांच्याशी संवाद साधत तुम्ही विवादित ढाचा पाडताना कुठे होता असा प्रश्न विचारला होता

नवी दिल्ली – रामजन्मभूमी आंदोलन वाढत चाललं होतं. तेव्हा भाजपा नेते विजयाराजे शिंदेंनी तत्कालीन पंतप्रधान पीवी नरसिम्हा राव यांना बाबरी मस्जिदला काही होणार नाही असं आश्वासन दिले होते. त्यावेळी सहकारी मंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्याविरोधात पंतप्रधान नरसिम्हा राव यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला असा खुलासा खासदार शरद पवार यांनी केला आहे.

ज्येष्ठ पत्रकार नीरज चौधरी यांचं पुस्तक हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाइड च्या प्रकाशनावेळी संरक्षण मंत्री असलेले शरद पवार म्हणाले की, मी तत्कालीन गृहमंत्री आणि गृह सचिवांसोबत त्या बैठकीत उपस्थित होतो. बाबरी मस्जिदला काही होणार नाही असं विजयाराजे शिंदे यांनी तेव्हाचे पंतप्रधान नरसिम्हा राव यांना आश्वासन दिले होते. गृहमंत्री आणि गृहसचिवांना वाटत होतं काहीतरी होऊ शकते. परंतु पंतप्रधानांनी विजयाराजे यांच्यावर विश्वास ठेवला. यावेळी नीरजा चौधरी यांच्यासह अन्य पत्रकारांनी पंतप्रधान राव यांच्याशी संवाद साधत तुम्ही विवादित ढाचा पाडताना कुठे होता असा प्रश्न विचारला होता. राव यांनी पत्रकारांना सांगितले की, मी यासाठी होऊ दिले जेणेकरून ही गंभीर मुद्दा संपून जाईल आणि भाजपा त्यांचा मुख्य निवडणूक अजेंडा गमावेल असा दावा नीरजा चौधरी यांनी केला. भाजपावर विश्वास ठेवायला नको असं मी म्हटलं होतं.  

या पुस्तक प्रकाशनावेळी शरद पवार यांच्यासोबत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, काँग्रेस नेता शशी थरुर, माजी रेल्वे मंत्री आणि भाजपा नेते दिनेश त्रिवेदी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. यावेळी दिनेश त्रिवेदी यांनी पंतप्रधान राजीव गांधी असताना त्यांच्यासोबत त्यावेळी असलेल्या प्रमुख सल्लागारांपैकी एक अरूण नेहरू यांच्या भूमिकेची आठवण केली. अरूण नेहरू कुटुंबातील एक होते असं त्यांनी म्हटलं. दरम्यान, अण्णा हजारे आंदोलनाला व्यवस्थित हाताळलं नाही. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वातील सरकार गेले, त्याचसह सरकारमधील घोटाळे, २ जी, अण्णा आंदोलन याचा परिणाम म्हणून सरकार पडले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे सर्वांना पुढे घेऊन जाणारे होते. यावेळी चव्हाणांनी अणू कराराचाही उल्लेख केला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारbabri masjidबाबरी मस्जिद